लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आशिया खंडात पहिल्यांदाच होत असलेल्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले आहे. त्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या ‘मिशन वन मिलियन’ या उपक्रमात जिल्ह्यातील तब्बल साडेपाचशे शाळा सहभागी होणार आहेत. तर १५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रत्येक व्यक्तीसाठी फुटबॉलचा खेळ रंगणार आहे.६ ते २४ आॅक्टोबर दरम्यान भारतात फुटबॉल वर्ल्डकप होत आहे. या निमित्ताने राज्यातील मुला-मुलींमध्ये फुटबॉलची आवड निर्माण करण्यासाठी ‘मिशन वन मिलियन’ हा उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत फुटबॉलची टीम निर्माण करण्यात येणार आहे.१३ वर्षाखालील मुला-मुलींची चमू तयार करून एकाच दिवशी जिल्ह्या-जिल्ह्यात आणि गावा-गावात फुटबॉल स्पर्धा घेतली जाणार आहे.याबाबत जिल्ह्यातील ११७ शाळांनी शासनाकडे आॅनलाईन नोंदणीही केली आहे. या शाळांसोबतच १५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक गावात फुटबॉल स्पर्धा घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, यात मुले, प्रौढ, अधिकारी, कर्मचारी अशा कोणत्याही व्यक्तीला खेळता येणार आहे.प्रत्येकाने फुटबॉल खेळावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. आॅनलाईन नोंदणी करणाºया शाळांसोबतच पुरेसे मैदान असणाºया शाळांचाही शोध घेतला जात आहे. त्यासाठी जिल्हा क्रीडाधिकाºयांनी शासनाकडे जिल्ह्यातील ५५० शाळांची यादी सादर करण्याची तयारी केली आहे.जिल्ह्यात यवतमाळ, पुसद, वणी, पांढरकवडा, दारव्हा, दिग्रस आदी ठिकाणी फुटबॉलच्या दृष्टीने पोषक वातावरण आहे. मात्र शासनातर्फे आता प्रत्येक शाळेत टीम तयार करून, फुटबॉल देऊन स्पर्धा घेणार आहे.
निवड झालेल्या शाळांना फुटबॉल मिळेल. शालेय स्पर्धांसोबतच जिल्ह्यात आमदार चषक स्पर्धाही घेतली जाणार आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. आजवर कोणत्याही शालेय स्पर्धेत जिल्ह्यातून ४०-४५ पेक्षा अधिक चमू सहभागी झाल्या नाही. मात्र आता साडेपाचशे शाळांनी तयारी दर्शविली आहे.- प्रदीप शेट्ये, जिल्हा क्रीडाधिकारी, यवतमाळ