शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुलांना लुटणारे पाच अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 21:51 IST

एकांताच्या शोधात येथील आर्णी-दारव्हा बायपासवर पोहोचलेल्या दोन प्रेमीयुगुलांना पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून लुटले. वाहतूक शाखेचे गस्ती वाहन येथे पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देआर्णी-दारव्हा बायपासची घटना : पोलीस पेट्रोलिंगने अनर्थ टळला

यवतमाळ : एकांताच्या शोधात येथील आर्णी-दारव्हा बायपासवर पोहोचलेल्या दोन प्रेमीयुगुलांना पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून लुटले. वाहतूक शाखेचे गस्ती वाहन येथे पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी रात्रीच शोधमोहीम राबवून वाघाडी परिसरातून पाच जणांना ताब्यात घेतले.विक्की उर्फ ढक्कन ज्ञानेश्वर पवार (१८), शांताराम तुकाराम चिंचकार (२४), राहुल उर्फ गोलू सुरेश गाडेकर (२०), अक्षय दादाराव तोडसाम (१८), नंदू अशोक शेळके (२३) सर्व रा. वाघाडी (यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध दरोड्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या मैत्रिणींना घेऊन आर्णी-दारव्हा बायपासवर सोमवारी सायंकाळच्या सुमारास गेले. आर्णी मुख्य मार्गापासून ३०० फूट आतमध्ये एकांत शोधला. त्याच वेळी पाच जणांचे टोळके त्या ठिकाणी आले. त्यांनी या दोन तरुणांना बेदम मारहाण केली. तसेच मुलींच्या अंगावरील कपडे फाडण्यास सुरुवात केली. मुलींनी जीवाच्या आकांताने आरडाओरडा सुरू केला. त्यातील एका तरुणाने बायपासने धाव घेतली. त्याच वेळी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अभय आष्टेकर वाहन घेऊन जात होते. त्यांना हा प्रकार दिसताच वाहन थांबविले. पोलीस दिसताच आरोपींनी पळ काढला. या चौघांना वडगाव रोड ठाण्यात आणण्यात आले. रात्रीच पोलिसांनी धरपकड सुरू केली असता वाघाडी परिसरातून पाचही जणांना अटक करण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, शोध पथकाचे सहायक निरीक्षक सुगत पुंडगे, गोरख चौधरी, टोळी विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक प्रशांत गिते, उपनिरीक्षक संतोष मनवर, जमादार सुरेश मेश्राम, रावसाहेब शेंडे, आशिष चौबे, गौरव नागलकर, गजानन दुधकवडे, संजय राठोड, जमादार ऋषी ठाकूर, संजय दुबे, गजानन धात्रक, किरण पडघण, अमोल चौधरी, विनोद राठोड, बंडू मेश्राम यांनी केली.पालकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहनशिकवणी क्लासच्या नावाखाली मुले-मुली सायंकाळी उशिरापर्यंत घराबाहेर राहतात. याबाबत पालकांनी सतर्कता बाळगावी. आपले पाल्य नेमके कुठे आहेत याची माहिती घ्यावी तसेच प्रेमीयुगुलांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन वडगाव रोडचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी केले आहे.