शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

प्रेमीयुगुलांना लुटणारे पाच अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 21:51 IST

एकांताच्या शोधात येथील आर्णी-दारव्हा बायपासवर पोहोचलेल्या दोन प्रेमीयुगुलांना पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून लुटले. वाहतूक शाखेचे गस्ती वाहन येथे पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देआर्णी-दारव्हा बायपासची घटना : पोलीस पेट्रोलिंगने अनर्थ टळला

यवतमाळ : एकांताच्या शोधात येथील आर्णी-दारव्हा बायपासवर पोहोचलेल्या दोन प्रेमीयुगुलांना पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून लुटले. वाहतूक शाखेचे गस्ती वाहन येथे पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी रात्रीच शोधमोहीम राबवून वाघाडी परिसरातून पाच जणांना ताब्यात घेतले.विक्की उर्फ ढक्कन ज्ञानेश्वर पवार (१८), शांताराम तुकाराम चिंचकार (२४), राहुल उर्फ गोलू सुरेश गाडेकर (२०), अक्षय दादाराव तोडसाम (१८), नंदू अशोक शेळके (२३) सर्व रा. वाघाडी (यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध दरोड्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या मैत्रिणींना घेऊन आर्णी-दारव्हा बायपासवर सोमवारी सायंकाळच्या सुमारास गेले. आर्णी मुख्य मार्गापासून ३०० फूट आतमध्ये एकांत शोधला. त्याच वेळी पाच जणांचे टोळके त्या ठिकाणी आले. त्यांनी या दोन तरुणांना बेदम मारहाण केली. तसेच मुलींच्या अंगावरील कपडे फाडण्यास सुरुवात केली. मुलींनी जीवाच्या आकांताने आरडाओरडा सुरू केला. त्यातील एका तरुणाने बायपासने धाव घेतली. त्याच वेळी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अभय आष्टेकर वाहन घेऊन जात होते. त्यांना हा प्रकार दिसताच वाहन थांबविले. पोलीस दिसताच आरोपींनी पळ काढला. या चौघांना वडगाव रोड ठाण्यात आणण्यात आले. रात्रीच पोलिसांनी धरपकड सुरू केली असता वाघाडी परिसरातून पाचही जणांना अटक करण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, शोध पथकाचे सहायक निरीक्षक सुगत पुंडगे, गोरख चौधरी, टोळी विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक प्रशांत गिते, उपनिरीक्षक संतोष मनवर, जमादार सुरेश मेश्राम, रावसाहेब शेंडे, आशिष चौबे, गौरव नागलकर, गजानन दुधकवडे, संजय राठोड, जमादार ऋषी ठाकूर, संजय दुबे, गजानन धात्रक, किरण पडघण, अमोल चौधरी, विनोद राठोड, बंडू मेश्राम यांनी केली.पालकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहनशिकवणी क्लासच्या नावाखाली मुले-मुली सायंकाळी उशिरापर्यंत घराबाहेर राहतात. याबाबत पालकांनी सतर्कता बाळगावी. आपले पाल्य नेमके कुठे आहेत याची माहिती घ्यावी तसेच प्रेमीयुगुलांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन वडगाव रोडचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी केले आहे.