शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

अपुºया पावसाने मत्स्य व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 21:26 IST

यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यामुळे बहुतांश तलाव कोरडे आहेत. या तलावातील मत्स्यबीज पाण्याअभावी मृत झाल्याने मत्स्य व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देप्रकल्प कोरडे : संस्था घाट्यात, मच्छीमार कुटुंबीयांवर ओढवली उपासमारीची वेळ, मदतीची अपेक्षा

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यामुळे बहुतांश तलाव कोरडे आहेत. या तलावातील मत्स्यबीज पाण्याअभावी मृत झाल्याने मत्स्य व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. हा व्यवसायच धोक्यात आला आहे.तलाव ठेका, मत्स्यबीज व इतर कामे, यापोटी मच्छीमार संस्था व सभासदांनी लाखोंचा खर्च केला. हा खर्च तर बुडालाच, मासोळीचे उत्पादनही होणार नसल्याने व्यवसाय कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला. मच्छीमारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली. जिल्ह्यात जिल्हा परिषद सिंचन विभागाचे यवतमाळ, वणी, पुसद व दारव्हा, असे चार विभाग आहे. या सर्व विभागांमध्ये ४२२ सिंचन तलाव आहे. सहायक आयुक्त मत्स्य विभाग कार्यालयाचे ९९ व स्थानिक स्तर जलसंपदा विभागाचे २०, असे एकूण ५४१ तलाव आहे.हे सर्व तलाव मच्छीमार संस्था ठेकेदारी पद्धतीने व्यवसायाकरिता घेतात. प्रत्येक संस्था सभासदांकडून तलाव ठेका, मत्स्यबीज, शेणखत, चौकीदार यासाठी खर्च गोळा करतात. नंतर तलावात मत्स्यबीज सोडले जाते. मासोळी तयार झाल्यानंतर विक्रीला सुरूवात होते. यातून एका संस्थेला साधारणत: चार ते पाच लाख रूपयांचे उत्पन्न होते. मात्र यावर्षी पुसद विभाग वगळता जिल्ह्यात इतरत्र या व्यवसायाच्या दृष्टीने कमी पाऊस पडला. त्यामुळे तलाव, प्रकल्प भरले नाही. तलावात पाणी नसल्यामुळे सोडलेले मत्स्यबीज मृत झाल्याचे सांगितले जाते. यामुळे संस्था आणि मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मच्छीमार व संस्थांची बिकट स्थिती असताना शासनाने ३० जून २०१७ ला नवा शासन निर्णय काढून त्यांच्या चिंतेत घातली. शासनाने एकाच वेळी तलाव ठेका रक्कम सहा पटीने वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मच्छीमार बांधव दुहेरी संकटात सापडले आहे.मच्छीमार बांधवांच्या मागण्यायावर्षी भीषण स्थिती निर्माण झाल्यामुळे शासनाने मदत करावी, अशी मच्छीमार बांधवांची अपेक्षा आहे. शासन, प्रशासनाने नवीन शासन निर्णय मागे घ्यावा, तलाव ठेका माफ करावा, मत्स्यबीजाकरिता अनुदान द्यावे, नुकसानीची भरपाई द्यावी, आदी मागण्यांकरिता सामूहिक प्रयत्न केले जातील असे विदर्भ भोई समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश सुरजुसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मत्स्य व्यवसायासंदर्भात बिकट स्थिती निर्माण झाल्याच्या तक्रारी आल्यास सर्व तलावांची माहिती घेण्यात येईल. पाणी पातळी एकदम कमी असल्यास एका वर्षाची तलाव ठेका रक्कम माफ करणे व मत्स्यबीज पुरविण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविता येतो.- गणेश डाकेसहायक आयुक्त, मत्स व्यवसाय विभाग, यवतमाळ