शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

७० वर्षानंतर प्रधानबोरीत प्रथमच एसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:13 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७० वर्षांचा कालावधी लोटला. परंतु गाव-खेड्यात अजुनही ‘विकास’ काही पोहचलेला नाही.

ठळक मुद्देगावकºयांनी केला जल्लोष : अद्यापही अनेक गावांमध्ये बससेवा नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७० वर्षांचा कालावधी लोटला. परंतु गाव-खेड्यात अजुनही ‘विकास’ काही पोहचलेला नाही. कळंब तालुक्यातील प्रधानबोरी या गावात तर स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर प्रथमच बसचे दर्शन झाले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी एकच जल्लोष केला. कळंब तालुक्यातील इतर अनेक गावांना मात्र अजुनही बसची प्रतिक्षा आहे.कळंब तालुका हा डोंगराळ भागांनी वेढलेला आहे. जवळपास १४० गावांचा मिळून तालुका बनलेला आहे. परंतु यातील काही गावांना अजुनही बसचे दर्शन झालेले नाही. प्रधानबोरी हेही गाव त्यातीलच एक़ या गावातील नागरिकांना प्रवासासाठी खाजगी वाहन अथवा पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर रुग्णांना खाटेवरुन प्रवास करावा लागायचा. शिक्षणासाठी येथील विद्यार्थी काय पायपीट करीत असतील, हे तर विचारायची सोय नाही. त्यामुळे अनेकांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. प्रवासाची साधनेच नसल्यामुळे हे गाव विकासापासून कोसो दूर आहे. आता या गावात दळणवळणाची सोय झाल्याने नागरिकांच्या पुढील भविष्यासाठी सोयीचे होणार आहे.बस सुरु झाल्याने या गावात उत्साह संचारला आहे. पहिल्यांदा आलेल्या बसची संपूर्ण गावकºयांवतीने मोठ्या भक्तीभावाने पूजाअर्चा करण्यात आली. चालक गोविंदा मडावी व वाहक संगीता टाक यांचा जंगी सत्कार करण्यात आला. हा दिवस तर गावासाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता. गावात बस आल्यानंतर प्रत्येकाने बसमध्ये चढून आनंद साजरा केला. यवतमाळहून सुटणारी ही बस सकाळी १० व सायंकाळी ५ वाजता येणार आहे. सध्या दोन टाईम सुरु करण्यात आले आहे. बस सुरू करण्यात मुख्यमंत्री दूत नीलेश पाटील, ग्रामपंचायत सचिव गजानन घोरदडे, सरपंच चंद्रशेखर कोटनाके, उपसरपंच रामंचद्र भिसे, पोलीस पाटील गंगाधर भिसे यांची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. दुर्गम भागात बससेवा सुरु करण्यात यश आले याचा आनंद आहे. बससेवेचा इतरही गावांना लाभ मिळाला. मिशनमार्फत सुुरु झालेल्या कामाची ही सुरुवात आहे. येत्या काळात बरीच कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करुन असे मनोगत नीलेश पाटील यांनी व्यक्त केले. तर मुख्यमंत्री मिशनमध्ये गावाची निवड करण्यात आली आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सचिव गजानन घोरदडे यांनी दिली.