शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

७० वर्षानंतर प्रधानबोरीत प्रथमच एसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:13 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७० वर्षांचा कालावधी लोटला. परंतु गाव-खेड्यात अजुनही ‘विकास’ काही पोहचलेला नाही.

ठळक मुद्देगावकºयांनी केला जल्लोष : अद्यापही अनेक गावांमध्ये बससेवा नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७० वर्षांचा कालावधी लोटला. परंतु गाव-खेड्यात अजुनही ‘विकास’ काही पोहचलेला नाही. कळंब तालुक्यातील प्रधानबोरी या गावात तर स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर प्रथमच बसचे दर्शन झाले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी एकच जल्लोष केला. कळंब तालुक्यातील इतर अनेक गावांना मात्र अजुनही बसची प्रतिक्षा आहे.कळंब तालुका हा डोंगराळ भागांनी वेढलेला आहे. जवळपास १४० गावांचा मिळून तालुका बनलेला आहे. परंतु यातील काही गावांना अजुनही बसचे दर्शन झालेले नाही. प्रधानबोरी हेही गाव त्यातीलच एक़ या गावातील नागरिकांना प्रवासासाठी खाजगी वाहन अथवा पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर रुग्णांना खाटेवरुन प्रवास करावा लागायचा. शिक्षणासाठी येथील विद्यार्थी काय पायपीट करीत असतील, हे तर विचारायची सोय नाही. त्यामुळे अनेकांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. प्रवासाची साधनेच नसल्यामुळे हे गाव विकासापासून कोसो दूर आहे. आता या गावात दळणवळणाची सोय झाल्याने नागरिकांच्या पुढील भविष्यासाठी सोयीचे होणार आहे.बस सुरु झाल्याने या गावात उत्साह संचारला आहे. पहिल्यांदा आलेल्या बसची संपूर्ण गावकºयांवतीने मोठ्या भक्तीभावाने पूजाअर्चा करण्यात आली. चालक गोविंदा मडावी व वाहक संगीता टाक यांचा जंगी सत्कार करण्यात आला. हा दिवस तर गावासाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता. गावात बस आल्यानंतर प्रत्येकाने बसमध्ये चढून आनंद साजरा केला. यवतमाळहून सुटणारी ही बस सकाळी १० व सायंकाळी ५ वाजता येणार आहे. सध्या दोन टाईम सुरु करण्यात आले आहे. बस सुरू करण्यात मुख्यमंत्री दूत नीलेश पाटील, ग्रामपंचायत सचिव गजानन घोरदडे, सरपंच चंद्रशेखर कोटनाके, उपसरपंच रामंचद्र भिसे, पोलीस पाटील गंगाधर भिसे यांची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. दुर्गम भागात बससेवा सुरु करण्यात यश आले याचा आनंद आहे. बससेवेचा इतरही गावांना लाभ मिळाला. मिशनमार्फत सुुरु झालेल्या कामाची ही सुरुवात आहे. येत्या काळात बरीच कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करुन असे मनोगत नीलेश पाटील यांनी व्यक्त केले. तर मुख्यमंत्री मिशनमध्ये गावाची निवड करण्यात आली आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सचिव गजानन घोरदडे यांनी दिली.