शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

जिल्ह्यात होणार देशी ‘बिटी’चा पहिला प्रयोग

By admin | Updated: August 19, 2016 01:12 IST

बिटी वानाचे पेटंट पूर्णत: विदेशी कंपन्यांकडे आहे. यामुळे बिटी वानाचा पुरवठा विदेशी कंपन्याच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे.

एक हजार हेक्टरात लागवड : आवळगावात २०० हेक्टरमध्ये सामूहिक शेती यवतमाळ : बिटी वानाचे पेटंट पूर्णत: विदेशी कंपन्यांकडे आहे. यामुळे बिटी वानाचा पुरवठा विदेशी कंपन्याच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. यामुळे दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे देशी चलन विदेशात जाते. विदेशी कंपन्या मालामाल झाल्या आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी देशी बिटी वान विकसित करण्यात भारतीय कृषी शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. हे देशी वान विकसित करण्याचे पहिले पाऊल जिल्ह्यात उचलण्यात आले आहे. जिल्ह्यात एक हजार हेक्टरवर याची लागवड करण्यात आली. अवळगावात २०० हेक्टरचा संयुक्त प्रयोग हाती घेण्यात आला आहे. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबण्यास पूर्णत: मदत होणार आहे. जिल्ह्यात दरवर्षी २२ लाख बिटी पॅकेट्स आयात करण्यात येतात. ही उलाढाल ८० ते १२० कोटींच्या घरात आहे. राज्यातील ही उलाढाल १२०० कोटींच्या घरात आहे. बोंड अळीवर मात करणारे तंत्रज्ञान विकसित करून विदेशी तंत्रज्ञानाने बिटी वान आणले. यामुळे देशी वान नष्ट झाले. याचा फायदा आता विदेशी कंपन्या घेत आहे. भरमसाट दर आकारून कोट्यवधी रूपयांची लूट केली जात आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशी वानाच्या काही जाती विकसित केल्या आहेत. यामध्ये एके ०८४ वानाचा जिल्ह्यात प्रयोग हाती घेण्यात आला आहे. हे देशी बिटी वान एक वेळा विकसित केल्यानंतर शेतकऱ्यांना तीन वर्ष बियाणे खरेदी करण्याची गरज राहणार नाही. यातून शेतकऱ्यांचे पैसे वाचतील. सोबतच शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन देशी वानातून मिळेल. हे वान रसशोषक किडीसह बोंडअळीवर मात करणार आहे. यामुळे फवारणीचा खर्चही वाचणार असल्याने हे वान फायद्याचे ठरणार आहे. (शहर वार्ताहर)