शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
3
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
4
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
5
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
6
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
7
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
8
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
9
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
11
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
12
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
13
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
14
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
15
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
16
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
17
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
18
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
19
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
20
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार

पहिल्या निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसची सरशी

By admin | Updated: September 6, 2014 02:25 IST

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर विधानसभेची पहिली निवडणूक १९६२ साली पार पडली. या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी...

यवतमाळ : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर विधानसभेची पहिली निवडणूक १९६२ साली पार पडली. या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी चार ठिकाणी काँग्रेसने तर एका ठिकाणी अपक्षाने विजय संपादित केला होता. या निवडणुकीत पुसदमधून वसंतराव नाईक, उमरखेडमधून रामचंद्र शिंगणकर, दिग्रसमधून माधवराव महिंद्रे, दारव्हा येथून अली हसन जीवाभाई ममदानी हे काँग्रेसच्या तिकिटावर तर यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून जांबुवंतराव धोटे अपक्ष विजयी झाले होते. यवतमाळ जिल्ह्यात झालेली ही निवडणूक अतिशय रंगतदार झाली होती. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सहा उमेदवार उभे होते. काँग्रेसच्या तिकीटावर छबूताई डहाके, जनसंघाकडून नारायण रानडे आणि अपक्ष म्हणून जांबुवंतराव धोटे, बाबूराव येरावार, रामनारायण चमेडिया आणि उद्धवराव वाघमारे रिंगणात होते. या निवडणुकीत अपक्ष जांबुवंतराव धोटे यांनी १९ हजार १३७ मते घेत काँग्रेसच्या छबूताई डहाके यांचा पराभव केला होता. दारव्हा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अलीहसन जीवाभाई ममदानी २७ हजार ५८२ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी हनुमंतगिर महादेवगिर (अपक्ष), हिरामन सोनडवले (रिपाइं) आणि महादेव भोवते यांचा पराभव केला. दिग्रस विधानसभा मतदारसंघात केवळ चार उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसचे माधवराव महिंद्रे यांनी शेकापचे गोविंदराव पुंजाजी बुचके यांचा पराभव केला. या निवडणुकीत जनसंघाचे नामदेवराव चव्हाण आणि अपक्ष झियाउद्दीन इसाक सईद रिंगणात होते. नाईक घराण्याचा परंपरागत गड असलेल्या पुसद विधानसभा मतदारसंघात १९६२ च्या निवडणुकीत वसंतराव नाईक काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. पुढे ते मुख्यमंत्री पदीही विराजमान झाले. वसंतराव नाईकांनी नलिनीबाई मुखरे (अपक्ष), बाबाराव लोखंडे (रिपाइं), किसन पाईकराव (अपक्ष) यांचा पराभव केला. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजतागायत या मतदारसंघावर नाईक घराण्याचेच वर्चस्व आहे.उमरखेड हा १९६२ साली अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ होता. या मतदारसंघात रामचंद्र नामदेवराव शिंगणकर हे काँग्रेसच्या तिकिटीवर विजयी झाले. त्यांनी विश्वासराव कांबळे (अपक्ष) आणि साहेबराव शिरसाट (रिपाइं) यांचा पराभव केला. महाराष्ट्र स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. काही निवडणुकांचा अपवाद वगळता हा जिल्हा सदैव काँग्रेसच्याच पाठीशी दिसत आहे. ( नगर प्रतिनिधी)