शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसची सरशी

By admin | Updated: September 6, 2014 02:25 IST

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर विधानसभेची पहिली निवडणूक १९६२ साली पार पडली. या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी...

यवतमाळ : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर विधानसभेची पहिली निवडणूक १९६२ साली पार पडली. या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी चार ठिकाणी काँग्रेसने तर एका ठिकाणी अपक्षाने विजय संपादित केला होता. या निवडणुकीत पुसदमधून वसंतराव नाईक, उमरखेडमधून रामचंद्र शिंगणकर, दिग्रसमधून माधवराव महिंद्रे, दारव्हा येथून अली हसन जीवाभाई ममदानी हे काँग्रेसच्या तिकिटावर तर यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून जांबुवंतराव धोटे अपक्ष विजयी झाले होते. यवतमाळ जिल्ह्यात झालेली ही निवडणूक अतिशय रंगतदार झाली होती. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सहा उमेदवार उभे होते. काँग्रेसच्या तिकीटावर छबूताई डहाके, जनसंघाकडून नारायण रानडे आणि अपक्ष म्हणून जांबुवंतराव धोटे, बाबूराव येरावार, रामनारायण चमेडिया आणि उद्धवराव वाघमारे रिंगणात होते. या निवडणुकीत अपक्ष जांबुवंतराव धोटे यांनी १९ हजार १३७ मते घेत काँग्रेसच्या छबूताई डहाके यांचा पराभव केला होता. दारव्हा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अलीहसन जीवाभाई ममदानी २७ हजार ५८२ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी हनुमंतगिर महादेवगिर (अपक्ष), हिरामन सोनडवले (रिपाइं) आणि महादेव भोवते यांचा पराभव केला. दिग्रस विधानसभा मतदारसंघात केवळ चार उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसचे माधवराव महिंद्रे यांनी शेकापचे गोविंदराव पुंजाजी बुचके यांचा पराभव केला. या निवडणुकीत जनसंघाचे नामदेवराव चव्हाण आणि अपक्ष झियाउद्दीन इसाक सईद रिंगणात होते. नाईक घराण्याचा परंपरागत गड असलेल्या पुसद विधानसभा मतदारसंघात १९६२ च्या निवडणुकीत वसंतराव नाईक काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. पुढे ते मुख्यमंत्री पदीही विराजमान झाले. वसंतराव नाईकांनी नलिनीबाई मुखरे (अपक्ष), बाबाराव लोखंडे (रिपाइं), किसन पाईकराव (अपक्ष) यांचा पराभव केला. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजतागायत या मतदारसंघावर नाईक घराण्याचेच वर्चस्व आहे.उमरखेड हा १९६२ साली अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ होता. या मतदारसंघात रामचंद्र नामदेवराव शिंगणकर हे काँग्रेसच्या तिकिटीवर विजयी झाले. त्यांनी विश्वासराव कांबळे (अपक्ष) आणि साहेबराव शिरसाट (रिपाइं) यांचा पराभव केला. महाराष्ट्र स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. काही निवडणुकांचा अपवाद वगळता हा जिल्हा सदैव काँग्रेसच्याच पाठीशी दिसत आहे. ( नगर प्रतिनिधी)