शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पहिल्या निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसची सरशी

By admin | Updated: September 6, 2014 02:25 IST

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर विधानसभेची पहिली निवडणूक १९६२ साली पार पडली. या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी...

यवतमाळ : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर विधानसभेची पहिली निवडणूक १९६२ साली पार पडली. या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी चार ठिकाणी काँग्रेसने तर एका ठिकाणी अपक्षाने विजय संपादित केला होता. या निवडणुकीत पुसदमधून वसंतराव नाईक, उमरखेडमधून रामचंद्र शिंगणकर, दिग्रसमधून माधवराव महिंद्रे, दारव्हा येथून अली हसन जीवाभाई ममदानी हे काँग्रेसच्या तिकिटावर तर यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून जांबुवंतराव धोटे अपक्ष विजयी झाले होते. यवतमाळ जिल्ह्यात झालेली ही निवडणूक अतिशय रंगतदार झाली होती. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सहा उमेदवार उभे होते. काँग्रेसच्या तिकीटावर छबूताई डहाके, जनसंघाकडून नारायण रानडे आणि अपक्ष म्हणून जांबुवंतराव धोटे, बाबूराव येरावार, रामनारायण चमेडिया आणि उद्धवराव वाघमारे रिंगणात होते. या निवडणुकीत अपक्ष जांबुवंतराव धोटे यांनी १९ हजार १३७ मते घेत काँग्रेसच्या छबूताई डहाके यांचा पराभव केला होता. दारव्हा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अलीहसन जीवाभाई ममदानी २७ हजार ५८२ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी हनुमंतगिर महादेवगिर (अपक्ष), हिरामन सोनडवले (रिपाइं) आणि महादेव भोवते यांचा पराभव केला. दिग्रस विधानसभा मतदारसंघात केवळ चार उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसचे माधवराव महिंद्रे यांनी शेकापचे गोविंदराव पुंजाजी बुचके यांचा पराभव केला. या निवडणुकीत जनसंघाचे नामदेवराव चव्हाण आणि अपक्ष झियाउद्दीन इसाक सईद रिंगणात होते. नाईक घराण्याचा परंपरागत गड असलेल्या पुसद विधानसभा मतदारसंघात १९६२ च्या निवडणुकीत वसंतराव नाईक काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. पुढे ते मुख्यमंत्री पदीही विराजमान झाले. वसंतराव नाईकांनी नलिनीबाई मुखरे (अपक्ष), बाबाराव लोखंडे (रिपाइं), किसन पाईकराव (अपक्ष) यांचा पराभव केला. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजतागायत या मतदारसंघावर नाईक घराण्याचेच वर्चस्व आहे.उमरखेड हा १९६२ साली अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ होता. या मतदारसंघात रामचंद्र नामदेवराव शिंगणकर हे काँग्रेसच्या तिकिटीवर विजयी झाले. त्यांनी विश्वासराव कांबळे (अपक्ष) आणि साहेबराव शिरसाट (रिपाइं) यांचा पराभव केला. महाराष्ट्र स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. काही निवडणुकांचा अपवाद वगळता हा जिल्हा सदैव काँग्रेसच्याच पाठीशी दिसत आहे. ( नगर प्रतिनिधी)