शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भाजपाच्या चार उमेदवारांची पहिलीच विधानसभा वारी

By admin | Updated: October 19, 2014 23:18 IST

जिल्ह्यात उमरखेड, वणी, आर्णी आणि राळेगाव या चार मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेत जात आहे. वणी विधानसभा मतदारसंघातून अनपेक्षितरीत्या भाजपाचे संजीव रेड्डी

यवतमाळ : जिल्ह्यात उमरखेड, वणी, आर्णी आणि राळेगाव या चार मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेत जात आहे. वणी विधानसभा मतदारसंघातून अनपेक्षितरीत्या भाजपाचे संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी ४४ हजार ४५० मते मिळवून विजय संपादन केला. त्यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचे आव्हान झुगारुन पाच हजार ६७१ मते अधिक मिळविली. भाजपाने येथे काँग्रेसचे विद्यमान आमदार वामनराव कासावार यांचा पराभव केला. वणीत पहिल्यांदाच भाजपाला संधी मिळाली. राळेगाव मतदारसंघातून विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांचा भाजपाच्या प्रा.डॉ. अशोक उईके यांनी तब्बल ३८ हजार ७५० एवढ्या मताधिक्याने पराभव केला. तेथे शिवसेनेच्या उमेदवाराला अवघी पाच हजार मते मिळाली. आर्णी मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राजू तोडसाम यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांचा २० हजार ७२१ मतांनी पराभव केला. उमरखेड विधानसभा मतदारसंघात अपेक्षेनुसार भाजपाचे राजेंद्र नजरधने तब्बल ९० हजार १९० मते घेऊन विजयी झाले. २००९ च्या निवडणुकीत अवघ्या थोड्या मतांनी त्यांची विधानसभेची वारी हुकली होती. यावेळी मात्र त्यांनी ४८ हजार ५७६ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. तेथे कॉग्रेसचे विद्यमान आमदार विजय खडसे यांना ४१ हजार ६१४ मते मिळाली. शिवसेनेचे मुन्ना उर्फ शिवशंकर पांढरे हे तिसऱ्या तर राष्ट्रवादीचे मोहन मोरे चवथ्या क्रमांकावर राहिले. दिग्रस मतदारसंघात दलित, मुस्लीम व कुणबी समाजाच्या एकजुटीवर राष्ट्रवादीचे वसंत घुईखेडकर यांनी ४१ हजार ३५२ मतांपर्यंत मजल मारली. मात्र त्यांना शिवसेनेची विजयी घोडदौड रोखता आलेली नाही. मोघेंच्या विरोधाचे बक्षीस म्हणून देवानंद पवार यांना येथून काँग्रेसने उमेदवारी दिली होती. मात्र १८ हजार ८०७ मतांसह ते तिसऱ्या तर भाजपाचे अजय दुबे १० हजार ९०२ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले. आर्णी मतदारसंघात संदीप धुर्वे भाजपातून तिकीट नाकारल्याने ऐनवेळी शिवसेनेत आले होते. त्यांनी ३० हजार ९६६ मतांसह तिसरा क्रमांक गाठला. पुसदमध्ये माजी आमदार प्रकाश देवसरकर यांना २८ हजार ७९३ मते मिळाली. राष्ट्रवादीत बंड पुकारुन त्यांनी ऐनवेळी शिवसेनेशी घरठाव केला होता. पुसदमध्ये भाजपाचे वसंत पाटील १९ हजार १५५ मतांसह तिसऱ्या तर काँग्रेसचे अ‍ॅड. सचिन नाईक १५ हजार १७ मतांसह चौथ्या क्रमांकावर राहिले. काँग्रेसच्या स्थानिक व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी असहकार केल्याचा आरोप सचिन नाईक यांनी दोनच दिवसापूर्वी पत्रपरिषदेत केला होता. त्यांची मतांची संख्या पाहता या आरोपात तथ्य दिसू लागले आहे. ऐनवेळी पक्ष बदलणाऱ्या देवसरकर व धुर्वे यांना मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट होते. आर्णीतून अखेरपर्यंत भाजपाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे आणि ऐनवेळी राळेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीची घड्याळ हाती बांधणारे अपक्ष जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे हे पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. वणीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचा जोर असताना अचानक भाजपाने मुसंडी मारल्याने सर्वच अचंबित झाले आहेत. मोदींची सभा न होताही भाजपाने सात पैकी पाच जागांवर विजय मिळविला, हे विशेष. जिल्ह्यात महिला उमेदवारांची संख्या बोटावर मोजण्याएवढी होती. मात्र त्यांना टॉप फाईव्हमध्येही जागा मिळविता आली नाही. राष्ट्रवादीचे नेते संदीप बाजोरिया यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ते पाहता काँग्रेसचा सर्व जागांवर झालेला पराभव लक्षात घेता वामनराव कासावार काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देतात का याकडे लक्ष लागले आहे.