शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दारव्हा तहसील कार्यालयाला आग; संगणकासह महत्त्वाचे दस्तावेज खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 16:25 IST

प्रथम तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागात आग लागली.

दारव्हा : येथील तहसील कार्यालयात गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन संगणक संच, प्रिंटर यासह संपूर्ण वायरींग व काही महत्त्वाचे दस्तावेज खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहिती मिळताच तहसीलचे अधिकारी, कर्मचारी, नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.

प्रथम तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागात आग लागली. नंतर वायरिंगमुळे बाहेरील बाजूस आग पसरली. आग इतकी भीषण होती की पाहता-पाहता संपूर्ण तहसील कार्यालय धुराने वेढले गेले. त्याचवेळी तहसील कार्यालयातून धूर निघत असल्याचे काही पोलीस कर्मचा-यांना दिसले. त्यांनी लगेच कार्यालयात धाव घेतली. तेव्हा आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तहसीलदारांना माहिती दिली. तहसीलदार अरुण शेलार व इतर अधिकारी, कर्मचा-यांनी लगेच तहसीलमध्ये पोहोचून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.

अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. या आगीत आवक-जावक विभागातील दोन संगणक संच, प्रिंटर, पंखा, काही दस्तावेज व कार्यालयातील संपूर्ण वायरिंग जळून खाक झाली. तसेच माहिती पत्रके, पोस्टर, सागवान लाकूड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.मोठा अनर्थ टळलातहसीलला आग लागल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तहसीलदारांना माहिती दिली. नंतर अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझविली. वेळीच सर्वांनी धावपळ केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा कार्यालयातील सर्व महत्त्वाचे दस्तावेज, जुने रेकॉर्ड, संगणक संच व इतर साहित्य जळून खाक झाले असते. इंग्रजकालीन असलेल्या या कार्यालयातील इलेक्ट्रिक वायरिंग खूप जुनी झाली. यापूर्वीही आग लागून वायरिंग जळाली होती. यावेळीसुद्धा वायरींमधील शॉर्ट सर्किटमुळेच आग लागली. त्यामुळे तहसीलमधील संपूर्ण वायरिंग दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ