शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून चेतना अभियानास आर्थिक मदत

By admin | Updated: January 18, 2016 02:34 IST

शासन स्तरावरुन बळीराजा चेतना अभियानाला गती देण्यासाठी निधी तर उपलब्ध होतच आहे.

कृषी प्रदर्शन : स्वयंसेवी संस्थांकडून सामूहिक विवाह मेळावे, संस्थांनी पुढाकार घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहनयवतमाळ : शासन स्तरावरुन बळीराजा चेतना अभियानाला गती देण्यासाठी निधी तर उपलब्ध होतच आहे. मात्र या बळीराजा चेतना अभियानाला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सामाजिक उत्तरदायित्त्व म्हणून आर्थिक स्वरुपात मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या विचारात घेता, त्यांना या गतेर्तून बाहेर काढण्यासाठी, शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, त्यांच्यात जगण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी बळीराजा चेतना अभियान युध्द पातळीवर राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या अध्यक्षतेत तर सदस्य सचिव म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख या समितीचे सदस्य म्हणून काम करीत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. यात किर्तनकार, प्रबोधनकार, पथनाटय पथक, कलापथके, आदींच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. साहित्य, रांगोळीकार, कविता, विचारवंतांच्या लेखांची माहिती पुस्तीका शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलींचे सामूहिक विवाह मेळावे, व्यसनमुक्तीपर कार्यक्रम, संकटावर मात कशी करावी याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे शिक्षण, आरोग्यावरील खर्च भागविण्यासाठी आर्थिक मदत करणे, त्रस्त कुटुंबांना शोधून त्यांना आर्थिक मदत करणे, शेतकऱ्यांशी संबंधित शिबिरे, रॅली अशा प्रकारचे आयोजन करुन शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे.शासन स्तरावरुन निधीची उपलब्धता वेळोवेळी होणारच आहे. मात्र, संपूर्ण जिल्हाभर शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यासाठी मोठया प्रमाणात निधीची आवश्यकता पडणार आहे. त्यामुळे जिल्हयातील शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनीसुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून सहभाग असावा, यासाठी वर्ग १ मधील अधिकारी हजार रुपये, वर्ग दोन मधील अधिकारी पाचशे रुपये, वर्ग तीन मधील कर्मचारी तिनशे रुपये तर वर्ग ४ मधील कर्मचारी यांना शंभर रुपये अशी सहयोग राशी बळीराजा चेतना अभियान समिती या नावाने जिल्हाधिकारी कार्यालयातील शेतकरी विशेष कक्ष येथे देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. सामूहिक विवाह मेळावेबळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. सामाजिक संस्थांनी विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांच्या मुलींचे विवाह या सोहळ्यात लावून देण्यात येणार आहे. सदर मेळावे सर्वधर्मीय आहे. मेळाव्यात सहभागी होऊन लग्न करणाऱ्या लाभार्थ्यांस १५ हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार लाभार्थी जिल्ह्याचा रहिवासी असावा. मुलीच्या वडीलांकडे सातबारा असणे आवश्यक आहे. तसेच वडीलांचा रहिवासी पुरावा, लाभार्थ्याचे बँकेत खाते असावे.सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणाऱ्या आयोजन खर्चात शासकीय अनुदानातून वधुला एक ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र व कपडे आदी साहित्य दिले जाणार आहे. विवाह सोहळा आयोजित करणारी संस्था ही नोंदणीकृत असावी. विवाहासाठी वर किंवा वधू नाबालिक नसावी. तसे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. सामूहिक सोहळ्यात लग्न करणाऱ्या जोडप्यास इतर शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, तहसिल चौक, यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)