शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

बंदीमुक्ती योजनेंतर्गत पालकमंत्र्यांच्याहस्ते अर्थसहाय्य

By admin | Updated: March 30, 2015 02:00 IST

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात महिला व बालविकास विभागाच्यावतीने कारागृहातून मुक्त झालेल्या बंद्यांना त्यांच्या पुनर्वसनासाठी अर्थसहाय्यचे वितरण...

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात महिला व बालविकास विभागाच्यावतीने कारागृहातून मुक्त झालेल्या बंद्यांना त्यांच्या पुनर्वसनासाठी अर्थसहाय्यचे वितरण पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कारागृहाचे अधीक्षक श्रीकृष्ण भुसारी, परमानंद अग्रवाल, तुरुंग अधिकारी भांबरे, शोभा बाविस्कर, विनीत ठाकरे उपस्थित होते. कळत न कळत अनेकांकडून गुन्हा घडत असतो. अशा गुन्ह्यात काहींना बंदी व्हावे लागते. परंतु हे बंदीही शेवटी माणूसच असतो. बंदी मुक्त झाल्यानंतर अशा व्यक्तींना समाजाकडून वाईट वागणूक मिळण्याची शक्यता असते. या व्यक्तींकडे वेगळया नरजेतून न पाहता स्वयंरोजगारांच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे व त्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.कारागृहातून मुक्त झालेले वसंत नारायण मिलमिले, दिपक नारायण ससाने, चंद्रशेखर नारायण मुंदे, सलीम शाह मज्जीद शाह, सुरेश विठ्ठलराव एकोणकार यांना प्रत्येकी पाच हजार रूपयाच्या अर्थसहाय्यचे वितरण करण्यात आले. शासनाच्यावतीने बंदीबांधवांच्या पुनर्वसनासाठी देण्यात येत असलेली पाच हजाराची रक्कम कमी असून ही रक्कम वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री.राठोड म्हणाले. तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर बंदीबांधवांना पुनर्वसनासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, ते शासन व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी अभ्यास करणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले. एखादी व्यक्ती कारागृहात असतांना त्यांचे कुटुंब अडचणी असते. अशा कुटुंबांना मदत देण्यासंदर्भातही विचार केला जाणार आहे. कारागृहात बंदी मुक्त वातावरणात राहिल्या पाहिजे. त्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यावर भर राहणार असून कारागृह प्रशासनाने त्याबाबतीत अवगत करावे. बंद्यांना अडचणी असल्यास त्यांनी हक्काने सांगाव्यात. त्याची दखल घेतली जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले.प्रास्ताविक कारागृह अधीक्षक श्रीकृष्ण भुसारी यांनी तर संचलन धनंजय नंदपटेल यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांनी कारागृहातील स्वयंपाकगृहास भेट देऊन तेथील भोजन व्यवस्थेची पाहणी केली. तसेच बंदी वास्तव्यास असलेल्या बॅरेक्स व तेथील सुविधांची माहिती घेतली. (कार्यालय प्रतिनिधी)