शहरं
Join us  
Trending Stories
1
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
2
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
3
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
4
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
5
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
6
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
7
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
8
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
9
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
10
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
11
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
12
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
13
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
14
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
15
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
16
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
17
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
18
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
20
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला

फायनान्स कंपन्यांची दादागिरी

By admin | Updated: August 12, 2016 02:13 IST

जिल्ह्यात केळापूरसारख्या मागास भागात कार्यरत असलेल्या मायक्रो फायनान्स कंपन्या आता जिल्ह्यात सर्वत्र दिसू लागल्या आहे.

शेतकऱ्यांची होतेय लूट : जिल्ह्यात कार्यरत कंपन्यांची होणार सखोल चौकशी यवतमाळ : जिल्ह्यात केळापूरसारख्या मागास भागात कार्यरत असलेल्या मायक्रो फायनान्स कंपन्या आता जिल्ह्यात सर्वत्र दिसू लागल्या आहे. झटपट कर्ज मिळत असल्याने ज्यादा व्याजदर असूनही शेतकरी या कंपन्यांच्या आमिषाला बळी पडत आहे. या फायनान्स कंपनीच्या तगाद्यामुळे आत्महत्या केलेली प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कार्यरत अशा कंपन्यांची माहिती घ्यावी, त्यानंतर त्यांची कार्यकक्षा आणि त्यावरील नियंत्रणाबाबत कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना द्यावयाच्या मदतीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, वसंता राठोड याने मायक्रो फायनान्स कंपनीकडून होत असल्यामुळे छळामुळे आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणांमध्ये आता फायनान्स कंपन्यांचा तगादा हे कारण समोर येत आहे. शासनाच्या पातळीवर राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्जाची सुविधा केलेली असली तरी झटपट कर्ज मिळणे सोयीचे आणि कमी कागदपत्रांवर कर्ज मिळत असल्यामुळे शेतकरी अडचणीच्या वेळी या फायनान्स कंपन्यांना बळी पडत आहे. अत्यंत चढ्या दराने हे व्याजदर उपलब्ध असतानाही शेतकरी कर्ज घेत आहे. जिल्ह्यात या कंपन्यांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे त्यांच्या तक्रारीही वाढत आहेत. हे प्रकार वेळीच रोखण्यासाठी जिल्ह्यात कार्यरत सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांची माहिती घेण्यात येणार आहे. त्यांची एकदा माहिती तयार झाल्यानंतर त्यांची कार्यपद्धती आणि त्यावरील नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्यात येतील. जिल्ह्यातील पवन राठोड या शेतकऱ्याच्या आत्महत्याप्रकरणी चौकशीत त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देण्यात आली होती, त्यामुळे त्याने आत्महत्या केली. मात्र केवळ शेतकरी असल्याने त्याची शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून हे प्रकरण शेतकरी आत्महत्येचे नसून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. साहेबराव पवार याने ज्वारीचे बियाणे शेतात उगविले नसल्यामुळे आत्महत्या केली आहे. या प्रकरणी कृषि विभागाने त्याने कोणत्या कंपनीचे बियाणे पेरले होते, त्या कंपनीची माहिती घ्यावी, त्या बियाणे कंपनीवर कारवाई करावी, अशा सूचना केल्या. त्यामुळे आता मायक्रो फायनान्सच्या अरेरावीला चाप बसणार यात कोणतीही शंका नाही. (प्रतिनिधी) अवैध सावकारीचे गुन्हे दडपतात शेतकरी आत्महत्येत शेतकऱ्याचा अपघात किंवा घातपाताने मृत्यू झाला तरी पोलिसांकडून केवळ आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात येतो. या प्रकारामुळे समाजात होत असलेल्या गुन्ह्यांकडे डोळेझाक होत आहे. सजगता पाळणे गरजेचे आहे. शेतकरी आत्महत्या म्हणून अशा अपघात आणि घातपाताची प्रकरणे समितीसमोर येत आहे. याबाबत गावातील पोलीस पाटील, सरपंच यांनी जागरूक राहून केवळ मदत मिळते, म्हणून अशी प्रकरणे समितीसमोर आणू नये, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना जगण्याची उभारी मिळावी, यासाठी बळीराजा चेतना अभियानातर्फे तालुकास्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी शाळांना दहा हजार रुपए देण्यात येतील.