शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

फायनान्स कंपन्यांची दादागिरी

By admin | Updated: August 12, 2016 02:13 IST

जिल्ह्यात केळापूरसारख्या मागास भागात कार्यरत असलेल्या मायक्रो फायनान्स कंपन्या आता जिल्ह्यात सर्वत्र दिसू लागल्या आहे.

शेतकऱ्यांची होतेय लूट : जिल्ह्यात कार्यरत कंपन्यांची होणार सखोल चौकशी यवतमाळ : जिल्ह्यात केळापूरसारख्या मागास भागात कार्यरत असलेल्या मायक्रो फायनान्स कंपन्या आता जिल्ह्यात सर्वत्र दिसू लागल्या आहे. झटपट कर्ज मिळत असल्याने ज्यादा व्याजदर असूनही शेतकरी या कंपन्यांच्या आमिषाला बळी पडत आहे. या फायनान्स कंपनीच्या तगाद्यामुळे आत्महत्या केलेली प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कार्यरत अशा कंपन्यांची माहिती घ्यावी, त्यानंतर त्यांची कार्यकक्षा आणि त्यावरील नियंत्रणाबाबत कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना द्यावयाच्या मदतीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, वसंता राठोड याने मायक्रो फायनान्स कंपनीकडून होत असल्यामुळे छळामुळे आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणांमध्ये आता फायनान्स कंपन्यांचा तगादा हे कारण समोर येत आहे. शासनाच्या पातळीवर राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्जाची सुविधा केलेली असली तरी झटपट कर्ज मिळणे सोयीचे आणि कमी कागदपत्रांवर कर्ज मिळत असल्यामुळे शेतकरी अडचणीच्या वेळी या फायनान्स कंपन्यांना बळी पडत आहे. अत्यंत चढ्या दराने हे व्याजदर उपलब्ध असतानाही शेतकरी कर्ज घेत आहे. जिल्ह्यात या कंपन्यांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे त्यांच्या तक्रारीही वाढत आहेत. हे प्रकार वेळीच रोखण्यासाठी जिल्ह्यात कार्यरत सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांची माहिती घेण्यात येणार आहे. त्यांची एकदा माहिती तयार झाल्यानंतर त्यांची कार्यपद्धती आणि त्यावरील नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्यात येतील. जिल्ह्यातील पवन राठोड या शेतकऱ्याच्या आत्महत्याप्रकरणी चौकशीत त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देण्यात आली होती, त्यामुळे त्याने आत्महत्या केली. मात्र केवळ शेतकरी असल्याने त्याची शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून हे प्रकरण शेतकरी आत्महत्येचे नसून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. साहेबराव पवार याने ज्वारीचे बियाणे शेतात उगविले नसल्यामुळे आत्महत्या केली आहे. या प्रकरणी कृषि विभागाने त्याने कोणत्या कंपनीचे बियाणे पेरले होते, त्या कंपनीची माहिती घ्यावी, त्या बियाणे कंपनीवर कारवाई करावी, अशा सूचना केल्या. त्यामुळे आता मायक्रो फायनान्सच्या अरेरावीला चाप बसणार यात कोणतीही शंका नाही. (प्रतिनिधी) अवैध सावकारीचे गुन्हे दडपतात शेतकरी आत्महत्येत शेतकऱ्याचा अपघात किंवा घातपाताने मृत्यू झाला तरी पोलिसांकडून केवळ आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात येतो. या प्रकारामुळे समाजात होत असलेल्या गुन्ह्यांकडे डोळेझाक होत आहे. सजगता पाळणे गरजेचे आहे. शेतकरी आत्महत्या म्हणून अशा अपघात आणि घातपाताची प्रकरणे समितीसमोर येत आहे. याबाबत गावातील पोलीस पाटील, सरपंच यांनी जागरूक राहून केवळ मदत मिळते, म्हणून अशी प्रकरणे समितीसमोर आणू नये, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना जगण्याची उभारी मिळावी, यासाठी बळीराजा चेतना अभियानातर्फे तालुकास्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी शाळांना दहा हजार रुपए देण्यात येतील.