शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

अखेर भाजी मंडी हटविली

By admin | Updated: January 20, 2016 03:37 IST

येथील आठवडी बाजारातील भाजी मंडीचे अतिक्रमण खुद्द व्यापाऱ्यांनीच मंगळवारी काढून प्रशासनाचा मार्ग मोकळा

यवतमाळ : येथील आठवडी बाजारातील भाजी मंडीचे अतिक्रमण खुद्द व्यापाऱ्यांनीच मंगळवारी काढून प्रशासनाचा मार्ग मोकळा केला. मात्र पर्यायी जागेवर कुठल्याच सुविधा नसल्याने ठोक भाजी विक्रेते संपावर गेले आहे. त्यामुळे मंगळवारी भाज्यांचा लिलावच झाला नाही. याचा फटका शहरातील ३६०० भाजी विक्रेत्यांना बसला.यवतमाळच्या आठवडी बाजारात गेल्या कित्येक वर्षांपासून पहाटे भाज्यांचा लिलाव होतो. आता या ठिकाणी नगर परिषद व्यापारी संकुल उभारणार आहे. त्यासाठी ही भाजी मंडी उचलण्याची सूचना व्यापाऱ्यांंना देण्यात आली. त्यावेळी भाजी व्यापाऱ्यांनी पर्यायी जागेची मागणी केली. त्यांंना विठ्ठलवाडी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीलगत जागा देण्यात आली. मात्र या जागेवर कोणत्याही सुविधा नसल्याने भाजी विक्रेत्यांनी प्रशासनाचे दार ठोठावले. तसेच सोमवारपासून बेमुदत बंद पुकारण्याचा इशाराही देण्यात आला. तर दुसरीकडे प्रशासनाने सोमवारपर्यंत आठवडी बाजारातील दुकाने हटविण्याची मुदत दिली होती. सोमवारी भाजी मंडीतील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. परंतु हा मुद्दा नगर परिषदेच्या अखत्यारीत येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आता कोणताही उपाय नाही म्हणून व्यापाऱ्यांनी स्वत:च आपले अतिक्रमण काढणे सुरू केले. मंगळवारी सुमारे ४५ दुकाने हटविण्यात आली. दुसरीकडे नगर परिषद प्रशासनानेही येथील अतिक्रमण हटविण्याची जोरदार तयारी चालविली होती. परंतु स्वत:हूनच व्यापाऱ्यांनी अतिक्रमण काढल्याने नगर परिषदेला काही करावे लागले नाही. दरम्यान ठोक भाजी विक्रेत्यांच्या संपाचा परिणाम सोमवारी मंडी बंद असल्याने दिसला नाही. परंतु मंगळवारी भाजी बाजारात लिलावच झाला नाही. जिल्हाभरातून शेतकरी आपला भाजीपाला मंडीत घेऊन आले होते. परंतु व्यापाऱ्यांनी लिलाव करण्यास नकार दिला. दुसरीकडे शहरातील चिल्लर विक्रेते भाजी खरेदीसाठी आले होते. त्यांनाही भाजी मिळाली नाही. शहरात आज कुठेच भाजी मिळाली नाही. याचा फटका ग्राहकांनाही बसला. (शहर वार्ताहर)४यवतमाळच्या भाजी बाजारात यवतमाळ जिल्ह्यासह वाशिम, अकोला, अमरावती, कारंजा, खामगाव आणि मध्य प्रदेशातून दररोज १०० टन भाजीपाला येतो. त्यातून दर दिवसाला १५ ते २० लाख रुपयांची उलाढाल होते. या संपाने ही उलाढाल ठप्प झाली आहे. अनेकांचा रोजगार बुडाला४ठोक भाजी मंडीवर ३६०० व्यावसायिकांचा रोजगार अवलंबून आहे. त्यात तीन हजार हॉकर्स, दोनशे रिक्षा चालक, १०० आॅटोरिक्षा, २०० हमाल आणि १०० व्यापारी व दलालांचा समावेश आहे. त्यांचा उदरनिर्वाह यावरच चालतो. परंतु भाजी मंडीच्या संपाने या सर्वांचा रोजगार बुडाला.