शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अखेर भाजी मंडी हटविली

By admin | Updated: January 20, 2016 03:37 IST

येथील आठवडी बाजारातील भाजी मंडीचे अतिक्रमण खुद्द व्यापाऱ्यांनीच मंगळवारी काढून प्रशासनाचा मार्ग मोकळा

यवतमाळ : येथील आठवडी बाजारातील भाजी मंडीचे अतिक्रमण खुद्द व्यापाऱ्यांनीच मंगळवारी काढून प्रशासनाचा मार्ग मोकळा केला. मात्र पर्यायी जागेवर कुठल्याच सुविधा नसल्याने ठोक भाजी विक्रेते संपावर गेले आहे. त्यामुळे मंगळवारी भाज्यांचा लिलावच झाला नाही. याचा फटका शहरातील ३६०० भाजी विक्रेत्यांना बसला.यवतमाळच्या आठवडी बाजारात गेल्या कित्येक वर्षांपासून पहाटे भाज्यांचा लिलाव होतो. आता या ठिकाणी नगर परिषद व्यापारी संकुल उभारणार आहे. त्यासाठी ही भाजी मंडी उचलण्याची सूचना व्यापाऱ्यांंना देण्यात आली. त्यावेळी भाजी व्यापाऱ्यांनी पर्यायी जागेची मागणी केली. त्यांंना विठ्ठलवाडी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीलगत जागा देण्यात आली. मात्र या जागेवर कोणत्याही सुविधा नसल्याने भाजी विक्रेत्यांनी प्रशासनाचे दार ठोठावले. तसेच सोमवारपासून बेमुदत बंद पुकारण्याचा इशाराही देण्यात आला. तर दुसरीकडे प्रशासनाने सोमवारपर्यंत आठवडी बाजारातील दुकाने हटविण्याची मुदत दिली होती. सोमवारी भाजी मंडीतील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. परंतु हा मुद्दा नगर परिषदेच्या अखत्यारीत येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आता कोणताही उपाय नाही म्हणून व्यापाऱ्यांनी स्वत:च आपले अतिक्रमण काढणे सुरू केले. मंगळवारी सुमारे ४५ दुकाने हटविण्यात आली. दुसरीकडे नगर परिषद प्रशासनानेही येथील अतिक्रमण हटविण्याची जोरदार तयारी चालविली होती. परंतु स्वत:हूनच व्यापाऱ्यांनी अतिक्रमण काढल्याने नगर परिषदेला काही करावे लागले नाही. दरम्यान ठोक भाजी विक्रेत्यांच्या संपाचा परिणाम सोमवारी मंडी बंद असल्याने दिसला नाही. परंतु मंगळवारी भाजी बाजारात लिलावच झाला नाही. जिल्हाभरातून शेतकरी आपला भाजीपाला मंडीत घेऊन आले होते. परंतु व्यापाऱ्यांनी लिलाव करण्यास नकार दिला. दुसरीकडे शहरातील चिल्लर विक्रेते भाजी खरेदीसाठी आले होते. त्यांनाही भाजी मिळाली नाही. शहरात आज कुठेच भाजी मिळाली नाही. याचा फटका ग्राहकांनाही बसला. (शहर वार्ताहर)४यवतमाळच्या भाजी बाजारात यवतमाळ जिल्ह्यासह वाशिम, अकोला, अमरावती, कारंजा, खामगाव आणि मध्य प्रदेशातून दररोज १०० टन भाजीपाला येतो. त्यातून दर दिवसाला १५ ते २० लाख रुपयांची उलाढाल होते. या संपाने ही उलाढाल ठप्प झाली आहे. अनेकांचा रोजगार बुडाला४ठोक भाजी मंडीवर ३६०० व्यावसायिकांचा रोजगार अवलंबून आहे. त्यात तीन हजार हॉकर्स, दोनशे रिक्षा चालक, १०० आॅटोरिक्षा, २०० हमाल आणि १०० व्यापारी व दलालांचा समावेश आहे. त्यांचा उदरनिर्वाह यावरच चालतो. परंतु भाजी मंडीच्या संपाने या सर्वांचा रोजगार बुडाला.