शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अखेर दूषित पाणी पुरवठा झाला बंद

By admin | Updated: November 19, 2016 01:32 IST

तालुक्यातील घोन्सा येथून बारमाही वाहणाऱ्या विदर्भा नदीच्या पात्रात लगतच असलेल्या कुंभारखणी येथील भूमिगत

पात्र प्रदूषित : कोळसा खाणीतून विदर्भा नदीत सोडले जात होते रसायनयुक्त पाणीवणी : तालुक्यातील घोन्सा येथून बारमाही वाहणाऱ्या विदर्भा नदीच्या पात्रात लगतच असलेल्या कुंभारखणी येथील भूमिगत कोळसा खाणीतील दूषित पाणी सोडण्यात येत होते. याबाबत १६ नोव्हेंबर रोजी ‘वणी तालुक्यातील विदर्भा नदीचे खोरे झाले विषाक्त’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच वेकोलिने दूषित पाणी पुरवठा करणे बंद केले आहे.घोन्साजवळून वाहणाऱ्या विदर्भा नदीच्या पात्रात लगतच्या कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीतून निघणारे रसायनयुक्त व दूषित पाणी सोडण्यात येत होते. याबाबत वारंवार ग्रामपंचायतीने वेकोलि प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याची वेकोलितर्फे दखलच घेण्यात आली नाही. त्यामुळे नदी काठावरील गावांना दूषित पाणी प्राशन करावे लागत होते. नदीत सोडण्यात येणाऱ्या या पाण्यामुळे संपूर्ण नदी काळीभोर दिसू लागली होती.या नदीतील पाणी घोन्सा येथे नळाद्वारे सोडण्यात येत होते. त्यामुळे गावकऱ्यांचा आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. गावकऱ्यांचे लक्ष जावू नये म्हणून वेकोलितर्फे रात्रीच्या वेळेला दूषित पाणी सोडण्यात येत होते. गेल्या तीन वर्षांपूर्वीही वेकोलिने अशाच प्रकारे दूषित पाणी सोडणे सुरू केले होते. तेव्हा ग्रामस्थांच्या तक्रारीवरून या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. मात्र आता पुन्हा वेकोलिने हेच दूषित पाणी सोडणे सुरू केल्यामुळे अख्या गावाचे आरोग्य धोक्यात सापडले होते.याबाबत ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे वेकोलि प्रशासनात चांगलीच खळबळ माजली व लगेच वृत्ताची दखल घेऊन वेकोलिमधून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्याचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे आता नदीला जीवनदा मिळण्याची शक्यता आहे. खाणीतून सोडण्यात येणारे हे पाणी वेकोलिने फिल्टर करून सोडावे, अशी मागणी आहे. (कार्यालय प्रतिनिधी)