शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मारेगावच्या जंगलातून २०० पोलिसांची फौज मागे घेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 21:35 IST

सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या खुनातील आरोपीचा आठवडाभर २१०० किलोमीटरचे जंगल पालथे घालूनही शोध न लागल्याने अखेर मारेगावच्या जंगलातील सुमारे २०० पोलिसांची फौज हटविण्यात आली. मात्र आरोपीचा शोध सुरू राहणार असून त्याच्या गावावर वॉचही ठेवला जाणार आहे.

ठळक मुद्देसहायक फौजदाराचे खूनप्रकरण : मारेकरी अनिलचा शोध सुरूच, घरावर वॉच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या खुनातील आरोपीचा आठवडाभर २१०० किलोमीटरचे जंगल पालथे घालूनही शोध न लागल्याने अखेर मारेगावच्या जंगलातील सुमारे २०० पोलिसांची फौज हटविण्यात आली. मात्र आरोपीचा शोध सुरू राहणार असून त्याच्या गावावर वॉचही ठेवला जाणार आहे.मारेगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुडमेथे (रा. वणी) यांचा फरार आरोपीच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. या आरोपीचा शोध घेण्यासाठी २०० वर पोलिसांची फौज तैनात करण्यात आली होती. मात्र गेल्या आठवडाभरात त्याचा शोध लागला नाही. तो जंगलातच लपून असावा व त्याचा पोलिसांवर वॉच असावा, असा कयास आहे. म्हणून जंगलातील पोलिसांची फौज सोमवारपासून हटविण्यात आली. जंगलात पोलीस नाहीत याची खात्री पटल्यानंतर तो गावात येईल असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस फौज हटली असली तरी मारेगाव पोलिसांचा आरोपी अनिल मेश्रामच्या हिवरी गावावर कायमच वॉच राहणार आहे. त्यासाठी साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आल्याचे सांगितले जाते. पोलिसाच्या खुनातील आरोपीच आठ-आठ दिवस सापडत नसेल तर सामान्यांचे काय? असा प्रश्न वणी विभागात जनतेतून उपस्थित केला जात आहे.आरोपीची अजब हिस्ट्री : म्हणे, नागपूरपर्यंतचे पोलीस ठाणे उडविणारपोलीस सूत्रानुसार, २०११-१२ मध्ये अनिलवर मारेगाव पोलीस ठाण्यात भादंवि ३२४, ३५४ कलमान्वये गुन्हा नोंदविला गेला होता. त्यावेळी त्याला अटक केली गेली. अटकेदरम्यान मिळालेल्या ट्रीटमेंटमुळे त्याचा पोलिसांवर राग होता. आता मारेगावपासून नागपूरपर्यंतचे सर्व पोलीस ठाणे मी उडवितो, असे बोलून तो आपला पोलिसांवरील राग व्यक्त करीत होता. त्यासाठी तो ब्लास्टचे चित्रपटही पहायचा. मोठ्या आवाजात बोलणे, शिवीगाळ करणे त्याला आवडायचे नाही. याच कारणावरून त्याने वडिलांवरही कुºहाडीने हल्ला केला होता. लाठ्याकाठ्या फिरविण्यात तो पटाईत असल्याचे सांगितले जाते. न्यायालयातून वारंवार वॉरंट येऊनही पोलिसांकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचा ठपका न्यायालयाने ठेवल्यामुळे मारेगाव ठाणेदारांनी अनिल हिवरी गावात असल्याची टीप मिळताच त्याच रात्री आपले पोलिसांचे पथक रवाना केले. चालकासह पाच पोलीस कर्मचारी शासकीय वाहन घेऊन आरोपीच्या अटकेसाठी हिवरी गावात गेले. आरोपीचे वर्तन माहीत असतानाही या पोलीस पथकाने कोणतीच सावधगिरी बाळगली नाही. त्यांच्याकडे शस्त्रे तर सोडा साधी काठीही नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अनिलने हल्ला करताच या पोलिसांपुढे बचावासाठी काहीच नव्हते. अखेर त्यातच सहायक पोलीस उपनिरीक्षकाला आपला जीव गमवावा लागला. अविवाहित असलेला अनिल आपल्या गाई-म्हशी व गावातील जनावरे चारायला न्यायचा. त्यातून मिळणाऱ्या पैशातच तो गुजरान करायचा. त्याच्याकडे बोकड होता. त्याला १४ हजाराचा खरेदीदार मिळाला. मात्र आपला बोकड आपण एक लाखात विकू असे तो गावकºयांना सांगायचा. यावरून त्याचे वागणे-बोलणे व एकूणच वर्तवणुकीचा अंदाज येतो.