शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 22:46 IST

अपुरा पाऊस आणि बोंडअळीच्या आक्रमणाने जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट घोंगावत होते. अखेर या दुष्काळावर जिल्हा प्रशासनाने शिक्कामोर्तब केले असून जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४७ टक्के घोषित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदुष्काळ : अपुरा पाऊस व बोंडअळीचे आक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपुरा पाऊस आणि बोंडअळीच्या आक्रमणाने जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट घोंगावत होते. अखेर या दुष्काळावर जिल्हा प्रशासनाने शिक्कामोर्तब केले असून जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४७ टक्के घोषित करण्यात आली आहे. या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच दुष्काळाचे सावट होते. यंदा अपुरा पाऊस झाल्याने त्याचा खरिपावर मोठा परिणाम झाला तर बोंडअळीने संपूर्ण कपाशीचा हंगाम उद्ध्वस्त केला. अशा स्थितीत शासनाने सुरुवातीला सुधारित आणेवारी ५६ टक्के घोषित केली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा अंतिम आणेवारीकडे लक्ष लागले होते. जिल्हा प्रशासनाने ३१ डिसेंबर रोजी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी घोषित केली. त्यात १६ तालुक्यातील २१५८ गावांपैकी २०४९ गावांची पैसेवारी ४७ घोषित केली आहे. या अंतिम पैसेवारीने जिल्ह्यातील दुष्काळावर शिक्कामोर्तब केले आहे.आर्णी तालुक्याची सर्वात कमी म्हणजे ४४ पैसेवारी घोषित करण्यात आली. तर यवतमाळ ४५, कळंब, बाभूळगाव, दारव्हा, नेर, उमरखेड, महागाव, घाटंजी, मारेगाव, झरीजामणी या तालुक्यांची अंतिम पैसेवारी ४७ तर दिग्रस, पुसद, केळापूर, राळेगाव, वणी या तालुक्यांची पैसेवारी ४६ घोषित करण्यात आली आहे.असा मिळणार शेतकऱ्यांना लाभजिल्ह्याची पैसेवारी ४७ टक्के जाहीर झाली आहे. ५० टक्केच्या आत पैसेवारी जाहीर झाली तर दुष्काळी परिस्थिती मानली जाते. दुष्काळ निवारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने काही निकष जाहीर केले. त्यानुसार जिल्ह्याला लाभ मिळणार आहे. त्यात कर्जवसुली थांबविणे, कर्जाचे पुनर्गठन करणे, एनडीआरएफच्या निकषानुसार दुष्काळी भागात कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी ६८०० तर ओलिताच्या क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये मदत देणे, कृषी पंपाच्या वीज बिलात ३३ टक्के कपात, महसुली शेतसारा माफ, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ, चारा छावण्या उघडणे आदी प्रमुख बाबींचा समावेश आहे.सलग चौथ्या वर्षी दुष्काळजिल्ह्यात सलग चौथ्या वर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. २०१४ पासून सलग तीन वर्ष जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्केच्या खाली आहे. यंदाही पुन्हा पैसेवारी ४७ टक्के निघाली आहे. अशा भयावह स्थितीत शेतकरी मदतीची आस लावून बसले आहे.