शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 22:46 IST

अपुरा पाऊस आणि बोंडअळीच्या आक्रमणाने जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट घोंगावत होते. अखेर या दुष्काळावर जिल्हा प्रशासनाने शिक्कामोर्तब केले असून जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४७ टक्के घोषित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदुष्काळ : अपुरा पाऊस व बोंडअळीचे आक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपुरा पाऊस आणि बोंडअळीच्या आक्रमणाने जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट घोंगावत होते. अखेर या दुष्काळावर जिल्हा प्रशासनाने शिक्कामोर्तब केले असून जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४७ टक्के घोषित करण्यात आली आहे. या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच दुष्काळाचे सावट होते. यंदा अपुरा पाऊस झाल्याने त्याचा खरिपावर मोठा परिणाम झाला तर बोंडअळीने संपूर्ण कपाशीचा हंगाम उद्ध्वस्त केला. अशा स्थितीत शासनाने सुरुवातीला सुधारित आणेवारी ५६ टक्के घोषित केली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा अंतिम आणेवारीकडे लक्ष लागले होते. जिल्हा प्रशासनाने ३१ डिसेंबर रोजी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी घोषित केली. त्यात १६ तालुक्यातील २१५८ गावांपैकी २०४९ गावांची पैसेवारी ४७ घोषित केली आहे. या अंतिम पैसेवारीने जिल्ह्यातील दुष्काळावर शिक्कामोर्तब केले आहे.आर्णी तालुक्याची सर्वात कमी म्हणजे ४४ पैसेवारी घोषित करण्यात आली. तर यवतमाळ ४५, कळंब, बाभूळगाव, दारव्हा, नेर, उमरखेड, महागाव, घाटंजी, मारेगाव, झरीजामणी या तालुक्यांची अंतिम पैसेवारी ४७ तर दिग्रस, पुसद, केळापूर, राळेगाव, वणी या तालुक्यांची पैसेवारी ४६ घोषित करण्यात आली आहे.असा मिळणार शेतकऱ्यांना लाभजिल्ह्याची पैसेवारी ४७ टक्के जाहीर झाली आहे. ५० टक्केच्या आत पैसेवारी जाहीर झाली तर दुष्काळी परिस्थिती मानली जाते. दुष्काळ निवारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने काही निकष जाहीर केले. त्यानुसार जिल्ह्याला लाभ मिळणार आहे. त्यात कर्जवसुली थांबविणे, कर्जाचे पुनर्गठन करणे, एनडीआरएफच्या निकषानुसार दुष्काळी भागात कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी ६८०० तर ओलिताच्या क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये मदत देणे, कृषी पंपाच्या वीज बिलात ३३ टक्के कपात, महसुली शेतसारा माफ, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ, चारा छावण्या उघडणे आदी प्रमुख बाबींचा समावेश आहे.सलग चौथ्या वर्षी दुष्काळजिल्ह्यात सलग चौथ्या वर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. २०१४ पासून सलग तीन वर्ष जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्केच्या खाली आहे. यंदाही पुन्हा पैसेवारी ४७ टक्के निघाली आहे. अशा भयावह स्थितीत शेतकरी मदतीची आस लावून बसले आहे.