शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नजर अनुमानावर अंतिम पैसेवारी

By admin | Updated: October 24, 2015 02:24 IST

पीक पैसेवारी हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. नैसर्गिक आपत्तीत शासनाकडून विविध प्रकारचे सहाय्य पैसेवारीवरच अवलंबून असते.

समन्वयाचा अभाव : कृषीने ठरविलेले प्रमाण उत्पादन शेतकऱ्यांच्या मुळावरविवेक ठाकरे दारव्हापीक पैसेवारी हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. नैसर्गिक आपत्तीत शासनाकडून विविध प्रकारचे सहाय्य पैसेवारीवरच अवलंबून असते. मात्र पैसेवारी काढण्याच्या पद्धतीला कृषी आणि महसूल विभागाकडून हरताळ फासला जातो. प्रत्यक्ष कापणी प्रयोग न करता नजर अनुमानाच्या आधारे अंतिम पैसेवारी निश्चित केली जाते. तर कृषी विभागाकडूनही प्रमाण उत्पादनासाठी असाच कित्ता गिरवला जातो. महसूल आणि कृषी विभागात समन्वय नसल्याने खरी पैसेवारी जाहीर होत नाही आणि शेतकऱ्यांना शासनाच्या सोयी-सवलतीपासून वंचित राहावे लागते.पीक पैसेवारी काढण्यासाठी प्रमाण उत्पादन निश्चित केले जाते. कृषी विभागाकडून प्रत्येक तहसीलमध्ये प्रत्येक प्रमुख पिकाचे कमीत कमी २५ पीक कापणी प्रयोग घेण्याचा नियम आहे. मात्र कृषी विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या अभावाची सबब पुढे करण्यात येते. कर्मचारी कमी आणि गावे जास्त, त्यात शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवाव्या लागत असल्याची ओरड कृषी विभागाकडून नेहमीच होते. याच सबबीच्या आधारे प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोग केला जात नाही. कार्यालयात बसून शेतकऱ्यांच्या चर्चेवरून आकडेवारी ठरविली जाते. हीच आकडेवारी कृषी आयुक्तालयात पाठवून त्याद्वारे प्रमाण उत्पादन ठरविले जात आहे.दिवसेंदिवस शेतकरी जागरूक होवू लागला आहे. काळानुरूप पीक पद्धती बदलत आहे. नवीन तंत्रज्ञान, बियाण्यांमधील संशोधन व सुधारणा आदींमुळे शेती उत्पन्न वाढत आहे. नैसर्गिक असमतोलामुळे पावसात खंड पडणे, अतिवृष्टी याचा पिकांवर परिणाम होतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे. तसा पिकांवर होणारा खर्चही वाढत आहे. कोरडवाहू शेती करणारा शेतकरीसुद्धा परिस्थितीचा विचार करून विविध बाबी अंतर्भूत करू लागला. त्याच्या उत्पादनात वाढ झाली. मात्र कृषी विभागाने प्रमाण उत्पादन बदलविले नाही. त्याचा फटका पैसेवारी काढताना बसत आहे.महसूल विभागाची कार्यपद्धतीपैसेवारी निश्चित करण्यासाठी सर्वप्रथम ग्राम पैसेवारी समिती स्थापन करावी लागते. यात महसूल मंडळाचे अधिकारी अध्यक्ष असतात. या समितीत प्रगतिशील शेतकरी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, सहकारी पतपुरवठा संस्थेचे अध्यक्ष, अल्पभूधारक शेतकरी आणि तलाठ्यांचा समावेश असतो. समिती स्थापनेनंतर गावातील शेतीखाली असणाऱ्या जमिनीची तीन गटात विभागणी केली जाते. सदर विभागणी ही जमिनीच्या दरएकरी शेतसाऱ्यानुसार होते. साधारणत: सर्वच खरीप पिकांची पेरणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होते. त्यामुळे १ आॅगस्टपासून पीक पाहणीच्या कामास सुरुवात करणे आवश्यक असते. प्रत्येक तलाठ्याच्या कार्यक्षेत्रात जवळपास ५०० सर्वेनंबर येतात. पीक पाहणीचे काम सप्टेंबर महिन्यात पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक गावातील जमिनीची पीकवार वर्गवारी करावी लागते. गटवार आणि पीकवार सर्वेनंबरच्या चिठ्ठ्या तयार कराव्या लागतात. त्यानंतर कापणी प्रयोगासाठी जागा मिळून प्लॉटची आखणी करावी लागते आणि प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोग करावा लागतो. मात्र बोटावर मोजण्याइतकेच तलाठी हा प्रयोग करीत असल्याचे दिसून येते. तलाठ्याव्यतिरिक्त उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनीसुद्धा कापणी प्रयोग करावयाचे असते. परंतु कार्यालयीन कामकाजाच्या व्यस्ततेत ही जबाबदारी तलाठ्यांवर येते आणि तेही पूर्ण करीत नाही. यवतमाळ जिल्ह्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र पैसेवारी ५० च्या वर आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कुणीही प्रत्यक्ष पैसेवारी काढण्याच्या भानगडीत पडत नाही. केवळ नजर अनुमान महत्त्वाचे मानून त्यावरून अंतिम आणेवारी काढली आहे.