शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
4
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
5
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
6
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
7
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
8
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
9
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
10
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
11
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
12
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
14
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
15
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
17
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
18
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा

By admin | Updated: August 17, 2015 02:39 IST

शहराकरिता शुद्ध पाणीपुरवठा योजनेला गती देण्यासाठी निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी....

आर्णी : शहराकरिता शुद्ध पाणीपुरवठा योजनेला गती देण्यासाठी निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेला लेखी स्वरूपात दिले आहे. त्यामुळे आर्णीतील पाणीपुरवठ्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या प्रयत्नातून आर्णीसाठी शुद्ध पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली होती. परंतु या योजनेचे काम करण्याच्या वादातून एक कंत्राटदार व एक नगरसेविका यांच्यात न्यायालयीन वाद सुरू झाल्याने योजनेला ग्रहण लागले होते. मागील २०१२ पासून ही योजना रखडलेली होती. यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेविकेच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यावर आर्णी नगरपरिषदेने अमरावती विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. विभागीय आयुक्तांनी नगरपरिषदेच्या बाजूने निर्णय दिला. विद्यमान जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांचा निर्णय पाहता आर्णी पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया त्वरित राबविण्यात यावी, असे आदेश आर्णी नगरपरिषदेला देण्यात आले आहे. त्यामुळे आता योजनेला गती मिळणार आहे. ४२ कोटी रुपयांची ही योजना जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यासाठी राष्ट्रवादीच्या ठेकेदारी क्षेत्रात असणाऱ्या एका आमदाराने बराच दबावतंत्राचा वापर करून पाहिला. परंतु जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजना यशस्वी न झाल्याने आर्णी नगरपरिषदेने सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला. ही योजना आर्णीकरांसाठी कायमस्वरूपी मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा करू शकते. त्यासाठीच नगरपालिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळेच ही योजना कचाट्यातही अडकली होती. परंतु आता पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घातले आहे. योजनेकरिता पहिला टप्पा नऊ कोटी रुपयांचा प्राप्त झाला असून जिल्हाधिकाऱ्यांचे आर्णी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना आदेशही आले आहेत. त्यावरून पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेला वेग देऊन त्वरित योजना सुरू करण्याच्या दृष्टीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचेही आदेशात म्हटले आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या या योजनेला गती मिळणार असल्याने वरिष्ठांच्या आदेशाचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी तथा आर्णीकर नागरिकांनी स्वागत केले आहे. (तालुका प्रतिनिधी)