शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

‘केम’ प्रकल्पावर भर

By admin | Updated: July 19, 2015 02:32 IST

गत दोन वर्षांपासून जिल्ह्यातील ३५२ गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या समन्वयिक कृषी विकास प्रकल्पाची (केम) सद्यस्थिती ...

प्रधान सचिवांकडून आढावा : शेतकरी आत्महत्या उपाययोजनायवतमाळ : गत दोन वर्षांपासून जिल्ह्यातील ३५२ गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या समन्वयिक कृषी विकास प्रकल्पाची (केम) सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याचे कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव तसेच अपर मुख्य सचिव डी.के. जैन यांनी शनिवारी जिल्हा दौरा केला. गत दोन वर्षात या प्रकल्पांतर्गत आठ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून सर्वाधिक खर्च कृषीपूरक व्यवसायावर करण्यात आल्याचे आढावा बैठकीत सांगण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षात यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने जिल्ह्यात दोन वर्षांपासून राबविल्या जात असलेल्या कन्व्हर्जन आॅफ अ‍ॅग्रीकल्चर इंटरवेशन इन महाराष्ट्रा (केम) या प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी प्रधान सचिवांनी जिल्हा दौरा केला. गत दोन वर्षात या प्रकल्पांतर्गत ३५२ गावांमध्ये उपाययोजना करण्यात आल्या. यासाठी आठ कोटी रुपयांचा खर्च झाला असून यातील सर्वाधिक खर्च कृषीपूरक व्यवसायावर करण्यात आला. या सोबतच प्रशिक्षणावरही मोठा खर्च करण्यात आला आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधान सचिवांनी तब्बल चार तास या प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. प्रारंभापासून ते आतापर्यंत किती गावांची केममध्ये अंमलबजावणी झाली याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून किती निधी मिळाला याचीही माहिती जैन यांनी जाणून घेतली. प्रधान सचिवांनी मारेगाव तालुक्यातील श्रीरामपूर, बोटोणी आदी गावांना भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. रविवारी पुन्हा केम प्रकल्पाचा आढावा घेतला जाणार आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना सूचविण्यात येणार आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर सखोल चर्चा होणार आहे.प्रधान सचिव डी.के. जैन यांच्यासोबत ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज, महसूल उपायुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, प्रभारी कृषी अधीक्षक अनिल इंगळे, झोनल अ‍ॅग्रीकल्चर रिसर्च स्टेशनचे डॉ.सी.व्ही. पाटील, जिल्हा प्रकल्प समन्वयक प्रभाकर मिश्रा उपस्थित होते. (शहर वार्ताहर)अपर मुख्य सचिवांची शेतकऱ्यांशी चर्चाराज्याचे कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव तसेच अपर मुख्य सचिव डी.के. जैन यांच्यासह ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज आणि इतर अधिकाऱ्यांनी शनिवारी तालुक्यातील मारेगाव, चोपन, श्रीरामपूर, बोटोणी या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. मारेगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले लोकसंचालित महिला गटाच्या कृषी केंद्राला भेट दिली. तेथे महिलांशी संवाद साधला. त्यानंतर सर्व अधिकारी चोपन येथे पोहोचले. तेथे शेतकरी पुरुष गटाला शेती साहित्याचे वाटप करण्यात आले. यानंतर श्रीरामपूर येथे कृषी समृद्धी प्रकल्पा भेट देवून शेतकऱ्यांची चर्चा केली. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.