शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

‘केम’ प्रकल्पावर भर

By admin | Updated: July 19, 2015 02:32 IST

गत दोन वर्षांपासून जिल्ह्यातील ३५२ गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या समन्वयिक कृषी विकास प्रकल्पाची (केम) सद्यस्थिती ...

प्रधान सचिवांकडून आढावा : शेतकरी आत्महत्या उपाययोजनायवतमाळ : गत दोन वर्षांपासून जिल्ह्यातील ३५२ गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या समन्वयिक कृषी विकास प्रकल्पाची (केम) सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याचे कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव तसेच अपर मुख्य सचिव डी.के. जैन यांनी शनिवारी जिल्हा दौरा केला. गत दोन वर्षात या प्रकल्पांतर्गत आठ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून सर्वाधिक खर्च कृषीपूरक व्यवसायावर करण्यात आल्याचे आढावा बैठकीत सांगण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षात यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने जिल्ह्यात दोन वर्षांपासून राबविल्या जात असलेल्या कन्व्हर्जन आॅफ अ‍ॅग्रीकल्चर इंटरवेशन इन महाराष्ट्रा (केम) या प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी प्रधान सचिवांनी जिल्हा दौरा केला. गत दोन वर्षात या प्रकल्पांतर्गत ३५२ गावांमध्ये उपाययोजना करण्यात आल्या. यासाठी आठ कोटी रुपयांचा खर्च झाला असून यातील सर्वाधिक खर्च कृषीपूरक व्यवसायावर करण्यात आला. या सोबतच प्रशिक्षणावरही मोठा खर्च करण्यात आला आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधान सचिवांनी तब्बल चार तास या प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. प्रारंभापासून ते आतापर्यंत किती गावांची केममध्ये अंमलबजावणी झाली याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून किती निधी मिळाला याचीही माहिती जैन यांनी जाणून घेतली. प्रधान सचिवांनी मारेगाव तालुक्यातील श्रीरामपूर, बोटोणी आदी गावांना भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. रविवारी पुन्हा केम प्रकल्पाचा आढावा घेतला जाणार आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना सूचविण्यात येणार आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर सखोल चर्चा होणार आहे.प्रधान सचिव डी.के. जैन यांच्यासोबत ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज, महसूल उपायुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, प्रभारी कृषी अधीक्षक अनिल इंगळे, झोनल अ‍ॅग्रीकल्चर रिसर्च स्टेशनचे डॉ.सी.व्ही. पाटील, जिल्हा प्रकल्प समन्वयक प्रभाकर मिश्रा उपस्थित होते. (शहर वार्ताहर)अपर मुख्य सचिवांची शेतकऱ्यांशी चर्चाराज्याचे कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव तसेच अपर मुख्य सचिव डी.के. जैन यांच्यासह ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज आणि इतर अधिकाऱ्यांनी शनिवारी तालुक्यातील मारेगाव, चोपन, श्रीरामपूर, बोटोणी या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. मारेगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले लोकसंचालित महिला गटाच्या कृषी केंद्राला भेट दिली. तेथे महिलांशी संवाद साधला. त्यानंतर सर्व अधिकारी चोपन येथे पोहोचले. तेथे शेतकरी पुरुष गटाला शेती साहित्याचे वाटप करण्यात आले. यानंतर श्रीरामपूर येथे कृषी समृद्धी प्रकल्पा भेट देवून शेतकऱ्यांची चर्चा केली. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.