शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा

By admin | Updated: March 31, 2017 02:22 IST

आर्थिक विवंचनेत अडकलेल्या राज्यातील नऊ हजार शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. याउपरही सरकारला शेतकऱ्याची चिंता नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधकांची मागणी : शेतकरी कर्जमुक्तीसाठीच्या संघर्ष यात्रेची जाहीर सभायवतमाळ : आर्थिक विवंचनेत अडकलेल्या राज्यातील नऊ हजार शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. याउपरही सरकारला शेतकऱ्याची चिंता नाही. कर्जमाफीसाठी अद्याप योग्यवेळ नसल्याचे सरकार सांगत आहे. आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची प्रतीक्षा सरकार करणार आहे, असा सवाल करीत शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवरच कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा नोंदवावा, असे मत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. ते यवतमाळातील महात्मा फुले चौकात बुधवारी आयोजित शेतकरी संघर्ष यात्रेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, प्रा. वसंतराव पुरके, अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, गोपालदास अग्रवाल, अबू आझमी, विजय वडेट्टीवार, जोगेंद्र कवाडे, ख्वाजा बेग,संदीप बाजोरीया, यशोमती ठाकूर, मनोहरराव नाईक, माजी आमदार विजय खडसे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांच्यासह अनेक आजी, माजी आमदार उपस्थित होते.अशोकराव चव्हाण पुढे बोलताना म्हणाले, हे सरकार ‘कर लो दुनिया मुठ्ठी मे’ म्हणण्यासोबत गरीबाला मारून टाकणार आहे. आमचे सरकार सर्वांचे विचार जाणून निर्णय घेत होते. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. अशांना धडा शिकवला पाहिजे, असे ते म्हणाले. विरोधकांची ही आघाडी भविष्यातही कायम राहणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. केवळ ‘मन की बात’ चालणार नाही - अजित पवारमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारवर सडकून टीका करताना म्हणाले, सरकार वाट्टेल तसे वागत आहे. ‘हम करे सो कायदा’ यानुसार कायदा व्यवस्था आहे. शेतमालाला भाव नाही. अशा स्थितीत नुसती ‘चाय पे चर्चा’ आणि ‘मनकी बात’ चालणार नाही. या सरकारचे डोळे उघडण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली. सरकारला धडा शिकविल्याखेरीज शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही. कर्जमाफी होईपर्यंत ही यात्रा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शेतकरीच युती सरकारला जागा दाखविणार - वडेट्टीवारआमदार विजय वडेट्टीवार सरकारवर जोरदार प्रहार करताना म्हणाले, शेतकऱ्यांचा बळी सरकारी धोरणाने घेतला आहे. ‘अच्छे दिन’ म्हणत त्यांनी ४०० चे सिलींडर ८०० वर नेले. सोयाबिनला ४५०० रूपयांचा भाव असताना ५४ रूपये किलो असणारे तेल ८४ रूपयांवर गेले. सोयाबीन २६०० वर आले. तुरीचे भाव घसरले. हे सरकार भूलथापा देणारे आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबला, तर शेतकरी तुम्हाला जागा दाखवतील, असा इशारा त्यांनी दिला.आमदारांचा सभागृहात आवाज दाबण्याचा प्रयत्न - कवाडेजोगेंद्र कवाडे यांनी दगडाला वाचा फुटेल, पण हे सरकार शेतकऱ्यांना मदत करणार नाही, असा घणाघात केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी करा असे म्हणणे गुन्हा आहे का असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी याच कारणासाठी सरकारने विरोधी १९ आमदारांना निलंबित केल्याचा आरोप केला. आम्हाला सभागृहात बोलू दिले जात नाही म्हणून जनतेपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.यशोमती ठाकूर यांनी वदवून घेतल्या घोषणाआमदार यशोमती ठाकूर यांनी संघर्ष यात्रेत जोश निर्माण केला. उपस्थितांकडून त्यांनी विविध घोषणा वदवून घेतल्या. त्यांनीही सरकारचा खरपूस समाचार घेतला. प्रथम महात्मा फुले यांच्या पुतळयाला सर्वांनी हार अर्पण केले. नंतर कुठलेही सोपस्कार न करता संघर्ष यात्रेच्या मूळ उद्देशाला हात घालत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती. (शहर वार्ताहर)