शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा

By admin | Updated: March 31, 2017 02:22 IST

आर्थिक विवंचनेत अडकलेल्या राज्यातील नऊ हजार शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. याउपरही सरकारला शेतकऱ्याची चिंता नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधकांची मागणी : शेतकरी कर्जमुक्तीसाठीच्या संघर्ष यात्रेची जाहीर सभायवतमाळ : आर्थिक विवंचनेत अडकलेल्या राज्यातील नऊ हजार शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. याउपरही सरकारला शेतकऱ्याची चिंता नाही. कर्जमाफीसाठी अद्याप योग्यवेळ नसल्याचे सरकार सांगत आहे. आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची प्रतीक्षा सरकार करणार आहे, असा सवाल करीत शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवरच कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा नोंदवावा, असे मत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. ते यवतमाळातील महात्मा फुले चौकात बुधवारी आयोजित शेतकरी संघर्ष यात्रेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, प्रा. वसंतराव पुरके, अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, गोपालदास अग्रवाल, अबू आझमी, विजय वडेट्टीवार, जोगेंद्र कवाडे, ख्वाजा बेग,संदीप बाजोरीया, यशोमती ठाकूर, मनोहरराव नाईक, माजी आमदार विजय खडसे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांच्यासह अनेक आजी, माजी आमदार उपस्थित होते.अशोकराव चव्हाण पुढे बोलताना म्हणाले, हे सरकार ‘कर लो दुनिया मुठ्ठी मे’ म्हणण्यासोबत गरीबाला मारून टाकणार आहे. आमचे सरकार सर्वांचे विचार जाणून निर्णय घेत होते. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. अशांना धडा शिकवला पाहिजे, असे ते म्हणाले. विरोधकांची ही आघाडी भविष्यातही कायम राहणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. केवळ ‘मन की बात’ चालणार नाही - अजित पवारमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारवर सडकून टीका करताना म्हणाले, सरकार वाट्टेल तसे वागत आहे. ‘हम करे सो कायदा’ यानुसार कायदा व्यवस्था आहे. शेतमालाला भाव नाही. अशा स्थितीत नुसती ‘चाय पे चर्चा’ आणि ‘मनकी बात’ चालणार नाही. या सरकारचे डोळे उघडण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली. सरकारला धडा शिकविल्याखेरीज शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही. कर्जमाफी होईपर्यंत ही यात्रा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शेतकरीच युती सरकारला जागा दाखविणार - वडेट्टीवारआमदार विजय वडेट्टीवार सरकारवर जोरदार प्रहार करताना म्हणाले, शेतकऱ्यांचा बळी सरकारी धोरणाने घेतला आहे. ‘अच्छे दिन’ म्हणत त्यांनी ४०० चे सिलींडर ८०० वर नेले. सोयाबिनला ४५०० रूपयांचा भाव असताना ५४ रूपये किलो असणारे तेल ८४ रूपयांवर गेले. सोयाबीन २६०० वर आले. तुरीचे भाव घसरले. हे सरकार भूलथापा देणारे आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबला, तर शेतकरी तुम्हाला जागा दाखवतील, असा इशारा त्यांनी दिला.आमदारांचा सभागृहात आवाज दाबण्याचा प्रयत्न - कवाडेजोगेंद्र कवाडे यांनी दगडाला वाचा फुटेल, पण हे सरकार शेतकऱ्यांना मदत करणार नाही, असा घणाघात केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी करा असे म्हणणे गुन्हा आहे का असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी याच कारणासाठी सरकारने विरोधी १९ आमदारांना निलंबित केल्याचा आरोप केला. आम्हाला सभागृहात बोलू दिले जात नाही म्हणून जनतेपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.यशोमती ठाकूर यांनी वदवून घेतल्या घोषणाआमदार यशोमती ठाकूर यांनी संघर्ष यात्रेत जोश निर्माण केला. उपस्थितांकडून त्यांनी विविध घोषणा वदवून घेतल्या. त्यांनीही सरकारचा खरपूस समाचार घेतला. प्रथम महात्मा फुले यांच्या पुतळयाला सर्वांनी हार अर्पण केले. नंतर कुठलेही सोपस्कार न करता संघर्ष यात्रेच्या मूळ उद्देशाला हात घालत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती. (शहर वार्ताहर)