शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बोगस दिव्यांगांवर फौजदारी दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 22:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांगांवर कारवाईसाठी मार्गदर्शन मागण्याची आवश्यकताच नसून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाच हे अधिकार असल्याचे ग्रामविकास खात्याच्या उपसचिवांनी स्पष्ट केले आहे. शिवाय या प्रकरणात नियमानुसार शिस्तभंग व फौजदारी कारवाई करण्याचे आदेशही जारी करण्यात आले.उपसचिव गिरीष भालेराव यांच्या स्वाक्षरीने १२ फेब्रुवारी २०१८ रोजी हे आदेश जारी करण्यात ...

ठळक मुद्देजिल्हा परिषद : उपसचिवांचे आदेश, अधिकार सीईओंनाच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांगांवर कारवाईसाठी मार्गदर्शन मागण्याची आवश्यकताच नसून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाच हे अधिकार असल्याचे ग्रामविकास खात्याच्या उपसचिवांनी स्पष्ट केले आहे. शिवाय या प्रकरणात नियमानुसार शिस्तभंग व फौजदारी कारवाई करण्याचे आदेशही जारी करण्यात आले.उपसचिव गिरीष भालेराव यांच्या स्वाक्षरीने १२ फेब्रुवारी २०१८ रोजी हे आदेश जारी करण्यात आले. जिल्हा परिषदेमध्ये बोगस दिव्यांगांविरुद्ध नेहमीच ओरड ऐकायला मिळते. स्थायी समिती, सर्वसाधारण सभेतही अनेकदा हा मुद्दा गाजला. बहुतांश बदल्यांच्यावेळी दिव्यांगांचा हा मुद्दा ऐरणीवर येतो. या प्रकरणात कारवाईबाबत तत्कालीन सीईओंनी शासनाला मार्गदर्शन मागितले होते. परंतु त्यांच्या या कृतीवर उपसचिवांनी आक्षेप घेतला आहे. १८ एप्रिल २०१३ व १५ मे २०१४ च्या शासन निर्णयात बोगस दिव्यांगांवरील कारवाईबाबत स्वयंस्पष्ट सूचना दिल्या आहेत. असे असताना मार्गदर्शन मागण्याची गरज काय असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. बोगस दिव्यांग प्रकरणात तातडीने नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना सीईओंना देण्यात आल्या आहेत. कारवाईचे हे अधिकार सीईओंनाच असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे अनेक कर्मचाऱ्यांनी बदल्या व प्राप्तीकरात लाभ घेतला आहे. कायमस्वरूपी दिव्यांगांची संख्या बरीच कमी आहे. नियमानुसार प्रत्येक तीन वर्षांनी दिव्यांगांची तपासणी बंधनकारक आहे. त्यात एक तर कर्मचाºयाचे दिव्यांगत्व वाढू शकते किंवा कमीही होऊ शकते. मात्र जाणीवपूर्वक ही तपासणी टाळली जात आहे. तत्कालीन सीईओ नवलकिशोर राम यांच्या काळात ४० टक्क्यापेक्षा कमी दिव्यांगत्व असलेल्या ३८ कर्मचाऱ्यांचा पर्दाफाश झाला होता. त्यांच्या विरोधात शासनाकडे कारवाईही प्रस्तावित करण्यात आली होती. यापूर्वी बदल्यांच्या प्रकरणात सीईओंनी मुंबईच्या जेजे रुग्णालयात दिव्यांगत्वाची तपासणी करण्याची तयारी चालविली होती. या तपासणीच्या भीतीने अनेक कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी आॅनलाईन अर्जच केला नव्हता. दिव्यांगत्व सांगणारे कर्मचारी नेमके केव्हा व कसे दिव्यांग झाले, त्या काळात त्यांनी कुठे उपचार घेतले, किती दिवस सुट्या काढल्या, वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले होते का, अशा विविध मुद्यांवर चौकशी होणे अपेक्षित आहे. या बोगस दिव्यांगांनी प्राप्तीकरातूनही लाखो रुपयांची सूट मिळविल्याचे सांगितले जाते. बोगस दिव्यांगांचा हा मुद्दा विधीमंडळातही गाजला होता.