शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाचशे रुपयांसाठी जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे उद्योग व्यवसाय थांबले आहे. याठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नाही. चहाटपरी, पानठेले, फुटपाथवरील व्यवसाय आणि इतर ठिकाणी असलेल्या कामगारांचा जगण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सुरुवातीचे काही दिवस निभावले गेले. आता मात्र त्यांना जगण्याची चिंता लागली आहे. घरातील एखाद्या व्यक्तीला मिळत असलेला निराधारचा निधी, जनधनच्या खात्यात पडलेले ५०० रुपये या भरवशावर कसेतरी दिवस त्यांना ढकलावे लागत आहे.

ठळक मुद्देनिराधारांची व्यथा : चिक्कार गर्दी व उन्हातही रांगा, धान्य मिळते पण तिखट-मिठाचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : इकडे उन्हामुळे जीव व्याकूळ होत आहे, तर दुसरीकडे कोरोना महामारीच्या संकटातही गर्दीत उभे राहावे लागत आहे. ५०० रुपये काढण्यासाठी या लोकांचा जीवाशी खेळ सुरू आहे. त्याला नाईलाज आहे, असेच म्हणावे लागेल. आज अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा रोजगार थांबला आहे. घरात सरकारने दिलेले धान्य पडून असले तरी तिखटमिठाचा खर्च भागवायचा प्रश्न आहे. म्हणूनच ५०० रुपये काढण्यासाठी या लोकांची धडपड आहे.लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे उद्योग व्यवसाय थांबले आहे. याठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नाही. चहाटपरी, पानठेले, फुटपाथवरील व्यवसाय आणि इतर ठिकाणी असलेल्या कामगारांचा जगण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सुरुवातीचे काही दिवस निभावले गेले. आता मात्र त्यांना जगण्याची चिंता लागली आहे. घरातील एखाद्या व्यक्तीला मिळत असलेला निराधारचा निधी, जनधनच्या खात्यात पडलेले ५०० रुपये या भरवशावर कसेतरी दिवस त्यांना ढकलावे लागत आहे.जनधन आणि निराधारचा पैसा काढण्यासाठी बॅका आणि मिनी एटीएमपुढे लांबच्या लांब रांगा आहे. सकाळपासूनच रांगेत उभे असलेल्या शेवटच्या व्यक्तीला घरी जाण्यासाठी संध्याकाळ होत आहे. या दिवसभरात त्याला घोटभर पाणीही मिळत नाही, जेवण तर दूर. अन्न-पाण्याविना रांगेत राहणाºया या गरजूंच्या आरोग्याचा प्रश्नही आता निर्माण होण्याची भीती आहे.तालुक्यातील निराधारांच्या खात्यात दरमहा एक हजार रुपये पडतात. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारने जनधनच्या खात्यात ५०० रुपये टाकले. सोबतच उज्ज्वला गॅसची सबसिडी आणि प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत दोन हजार रुपयांचा हप्ता आला आहे. या रकमा काढण्यासाठी नेर शहरातील मध्यवर्ती बँक, स्टेट बँक, स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र आदी ठिकाणी गर्दी होत आहे.पैसे काढण्यासाठी प्रत्यक्ष खातेदाराला हजेरी लावावी लागते. अनेक खातेदार ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना बँक किंवा ग्राहक सेवा केंद्रापर्यंत पोहोचणे कठीण आहे. परंतु पैशांची गरज असल्याने जीवावर उदार होऊन त्यांना तेथे पोहोचावे लागत आहे. अशा लोकांसाठी घरपोच पैसा पोहोचण्याची व्यवस्था व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.बँकांचीही ढीलव्यवहार करण्यासाठी बँकेत आलेल्या लोकांनी नियमांचे पालन करावे यासाठी बँकांकडूनही ठोस असे प्रयत्न केले जात नाही. अधिकाऱ्यांकडून या लोकांना कुठलीही समज दिली जात नाही. या प्रकारात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडत आहे. पोलीस असेल त्याच ठिकाणी काही प्रमाणात पालन होत आहे. इतर ठिकाणची गर्दी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या