शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सर्वच पक्षांचा उडाला गोंधळ

By admin | Updated: February 2, 2017 00:17 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांवरून नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांमध्ये गोंधळ उडाला.

ऐनवेळी उमेदवार बदलविले : पुसदमध्ये भलत्यालाच एबी फॉर्म यवतमाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांवरून नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांमध्ये गोंधळ उडाला. पूर्वी घोषित केलेले उमेदवार बदलवून ऐनवेळी काही पक्षांनी भलत्यालाच एबी फॉर्म दिल्याने सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. शेवटपर्यंत कोणत्याच पक्षाने उमेदवारांची अधिकृत घोषणा केली नाही. तथापि काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने काही इच्छुकांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी काही गट व गणांचे उमेदवारही निश्चित झाले होते. मात्र मंगळवारी रात्रीतून सर्वच पक्षांच्या यादीत अचानक बदल सुरू झाले. काही ठिकाणी आधीचे उमेदवार बदलवून नवीन इच्छुकांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे सर्वच पक्षांच्या याद्या रात्रीतून बदलल्या. बुधवारी सकाळपासून बदलाचे वारे वाहू लागल्याने सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. नेमकी उमेदवारी कुणाला मिळाली, हे बराच वेळ कार्यकर्त्यांना कळलेच नाही. विशेषत: पुसद तालुक्यातील उमेदवारीवरून काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेत प्रचंड गोंधळ सुरू होता. नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या पक्षांचे उमेदवार बदलविण्यात आले. त्यामुळे सर्वच गोंधळात पडले होते. एकदाची यादी अंतिम झाल्यानंतर संभ्रमाची स्थिती नष्ट झाली. तोपर्यंत सर्वच पक्षांत गोंधळ सुरू होता. पुसदच्या याद्या रखडल्या काँग्रेस, शिवसेना व भाजपाची पुसद तालुक्यातील उमेदवारांची अंतिम यादी शेवटपर्यंत रखडून होती. या तीनही पक्षांनी यादीत अनेकदा बदल केले. एकदा टाकलेले नाव खोडून पुन्हा तेथे नवीन नाव लिहिले गेले. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे दुपारी ३ वाजतापर्यंत या पक्षांच्या याद्या सतत बदलत राहिल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. ऐनवेळी छावणी बदलली काँग्रेसच्या काही तालुक्यातील इच्छुकांना ऐनवेळी भाजपाने उमेदवारी बहाल केली. काँग्रेसनेही ऐनवेळी उमेदवार बदलले. शिवसेनेही तगडे उमेदवार देण्यासाठी काही तालुक्यात शेवटपर्यंत फेरबदल केले. राष्ट्रवादीची सर्व मदार पुसदवर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पुसद, उमरखेड व महागाव तालुक्यातील उमेदवार निश्चित केल्यानंतरच इतर तीनही पक्षांनी उमेदवारांची निश्चिती केली. परिणामी पुसद विभागात शेवटपर्यंत गोंधळाची स्थिती होती. (शहर प्रतिनिधी) जि.प.चे ५३९ तर पं.स.चे ९३३ उमेदवार जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी एकूण ५३९ तर १६ पंचायत समित्यांसाठी एकूण ९३३ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. नामांकनाच्या अखेरच्या दिवशी तहसील कार्यालयात एकच गर्दी उसळली होती. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी बुधवारी अर्ज दाखल केल्याने प्रशासकीय यंत्रणाही भांबावून गेली होती. एकाचवेळी गर्दी झाल्याने तहसीलमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती होती. उमेदवारांचे समर्थक मोठ्या प्रमाणात गोळा झाल्याने तहसील कार्यालयाला अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले होते. गोधणी, पांढरकवडा, बसस्थानक चौक, आदी मार्गावर वाहनांची लांब रांग लागली होती. कार्यकर्ते गटागटाने आपल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ गर्दी करीत होते.