शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

जिंदो से डर, मुर्दो से क्या डरना - रजीया बी रमजान शाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

मला समाजातील जिवंत माणसांची भीती वाटते. मृत माणसांची भीती काय आहे? मला मुर्द्याजवळ रखवाली कर अथवा झोप म्हटले तरी मी त्या मुर्द्याच्या अंगावर हात ठेवून बिनधास्त झोपू शकते. जिंदो से डर, मुर्दोसे क्या डरना? मुझे डर नही लगता. ये सारी वहेम की बाते है.

ठळक मुद्देभूतखेत नसतात, तो आपला भ्रम आहे

माझ्या दिवसाची सुरूवात स्मशानभूमीत होते आणि माझी रात्रही प्रेतांच्या सोबतीत असते - रजीया बी रमजान शाह, स्मशानातील महिला सेवेकरीरुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दांडगी हिंमत असणाऱ्या महिला समाजात वावरताना आपण पाहतो. मात्र स्मशान म्हटल तर भल्या भल्यांना भीती वाटते. स्मशानातून घरी परतताना प्रथम अंघोळ केली जाते. नंतरच घरात प्रवशे मिळतो. असे असले तरी एक महिला सेवेकरी अक्षरश: प्रेतांची सेवा करते. रजीया बी रमजान शाह हे तिचे नाव. या महिलेचा दिवस स्मशानात उगवतो आणि रात्रही स्मशानातच जाते. असे आगळेवेगळे जीवन जगणाºया महिलेचे धाडस कसे असावे, यासंदर्भात रजीया बी रमजान शाह यांच्याशी साधलेला संवाद...किती वर्षांपासून स्मशानात सेवेकरी म्हणून काम पाहात आहात?गत २७ वर्षांपासून मी स्मशानातच राहते. या ठिकाणी प्रेतांना सेवा देण्याचे माझे व्रत अखंड सुरू आहे. मुर्द्यांचे कपडे जमा करणे, जाळणे, ओटा लिंपणे, त्यावर झाडूपोचा करणे, रात्री कितीही वाजता मयत आली तरी त्याची रजिस्टरमध्ये नोंद करणे. प्रेत जळते आहे की नाही, याकडे लक्ष ठेवणे ही कामे मी स्वत: करीत आली आहे. आजही करीत असते.स्मशानात तुम्हाला भीती वाटत नाही काय?मला समाजातील जिवंत माणसांची भीती वाटते. मृत माणसांची भीती काय आहे? मला मुर्द्याजवळ रखवाली कर अथवा झोप म्हटले तरी मी त्या मुर्द्याच्या अंगावर हात ठेवून बिनधास्त झोपू शकते. जिंदो से डर, मुर्दोसे क्या डरना? मुझे डर नही लगता. ये सारी वहेम की बाते है.भूत, प्रेत आणि पेटत्या चिता अस्वस्थ करतात काय?मी लहान होते तेव्हा प्रेताची चिरफाड होत होती, त्या ठिकाणी जाऊन येत होती. घरचे सारेच मला रागावत होते. ओरडत होते. माझी हिंमत दांडगी आहे. खरे पाहिले तर भूत, प्रेत, पेटत्या चिता याबाबत समाजात भ्रम निर्माण केला जातो. मात्र तसे काही नाही. अशा कुठल्याही गोष्टी नसतात. हा आपला भ्रम आहे. स्मशानातली शांतता मनाला सुख देणारी आहे. माझी सेवा मी अखंड सुरू ठेवणार आहे.जात, धर्म, पंथ यामध्ये संपूर्ण समाज विखुरला जातो. मात्र मृत्यूनंतरच मानवता कळते. माझ्या दृष्टीने मानवताच महत्त्वाची आहे. कोणी आत्महत्या केली, नैसर्गिक मृत्यू, अपघात, विविध प्रकारच्या घटनेनंतर मृतदेह स्मशानात येतात. मी अंतिम संस्कार पूर्ण करते.अंतरजातीय विवाह केला म्हणून कुटुंबाने नाकारलेमी अंतरजातीय विवाह केला. तेव्हापासून साऱ्यांनीच माझ्याकडे पाठ फिरवली. माझ्या पतीने आणि मी स्मशानात राहण्याचे आणि सेवा करण्याचे ठरविले. तेव्हापासून आम्ही स्मशानातच आहोत. आज माझे पती गेले. मात्र मी माझ काम चोखपणे पार पाडते आहे. मला मृत्यूची भीती नाही. मृतात्म्याची, भूतांची भीती नाही. जिवंत माणसांची भीती वाटते. माझ्या मुलांना आणि नातवंडांनाही मी मजबूत बनविण्याचे काम केले आहे. कोणाशी देणे घेणे नाही. कुठली कुरबुर नाही. मी सेवेकरी आहे.

टॅग्स :interviewमुलाखत