शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

पिता-पुत्राची माघार

By admin | Updated: August 12, 2014 23:59 IST

दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या नेटवर्कपुढे आपला टिकाव लागणार नाही याची जाणीव झाल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे आणि त्यांचे पूत्र राहुल ठाकरे

दिग्रस विधानसभा : आता बळीचा बकरा कुणाला बनविणार ?मुकेश इंगोले - दारव्हादिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या नेटवर्कपुढे आपला टिकाव लागणार नाही याची जाणीव झाल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे आणि त्यांचे पूत्र राहुल ठाकरे यांनी या मतदारसंघातून माघार घेतली आहे. आता या मतदारसंघात कुणाला तरी काँग्रेसची उमेदवारी देऊन बळीचा बकरा बनविले जाणार एवढे निश्चित.गेल्या १५ वर्षांपासून दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणण्यासाठी स्वत: प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी निवडणूक रिंगणात उतरावे, अशी या मतदारसंघातील काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांची मागणी आहे. कारण याच मतदारसंघाने ठाकरे यांना आमदार, मंत्री बनविले आहे. त्यांनी आपला बहुतांश विकास निधी याच मतदारसंघावर खर्ची घातला आहे. त्यांचे चिरंजीव राहुल यांनीही आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात दिग्रस-दारव्हा मतदारसंघच विकासाचे टार्गेट ठेवले होते. विविध मार्गाने या मतदारसंघासाठी त्यांनी निधी खेचून आणला. माणिकरावांचा हा परंपरागत मतदारसंघ असल्यानेच त्यांनी अथवा मुलाने दिग्रसमधून निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. ही भावना रविवारी या मतदारसंघातील प्रमुख नेत्यांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी बोलूनही दाखविली. परंतु शिवसेनेचा संपर्क पाहता ठाकरे पिता-पुत्रांनी तेथून माघार घेतली. प्रदेशाध्यक्ष असल्याने पक्ष आपल्याला निवडणूक लढण्याची परवानगी देणार नाही, असा बचाव माणिकरावांनी घेतला. तर राहुल ठाकरे यांनी दिग्रसला नाकारुन यवतमाळातून लढण्याची तयारी दर्शविली. आपला परंपरागत मतदारसंघ सोडून राहुल ठाकरे यवतमाळकडे धाव घेत असल्याने या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. वास्तविक ठाकरे पिता-पुत्राने सन २००९ पासून यवतमाळ मतदारसंघावर आपली नजर फिरविली आहे. गेल्या वेळीही माणिकरावांनी अखेरपर्यंत स्वत:साठी प्रयत्न चालविले होते. मात्र अखेरच्या क्षणी नीलेश पारवेकर यांचे नाव निश्चित झाले आणि ते २० हजारांवर मतांच्या आघाडीने विजयीही झाले.दरम्यान त्यांच्या अपघाती निधनाने नंदिनी पारवेकर यांच्यावर निवडणूक रिंगणात उतरण्याची वेळ आली. त्यांनीही नीलेश पारवेकरांनी केलेली कामे आणि सहानुभूतीची लाट या बळावर १६ हजार मतांनी विजय मिळविला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही नंदिनी पारवेकर याच प्रबळ दावेदार आहेत. मात्र राजकीय गोटात मुंबईपर्यंत त्यांच्याबाबत अपप्रचार केला जात आहे. मुलाच्या स्वार्थापायी प्रदेशाध्यक्षच नंदिनी पारवेकरांचे तिकीट कापण्याचा प्रयत्न करीत असल्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. या कार्यकर्त्यांमध्ये ठाकरे पिता-पूत्राविरुद्ध रोषही पहायला मिळतो आहे. जिल्ह्यातील पाच पैकी चार आमदारांना पक्ष पुन्हा तिकीट देणार आहे. अनेक वर्षांपासून त्याच त्या चेहऱ्यांना काँग्रेस उमेदवारी देत आले आहे. असे असताना दीड वर्षांपूर्वी आमदार झालेल्या नंदिनी पारवेकरांचे तिकीट कोणत्या आधारावर कापणार, असा सवाल पक्षातच कार्यकर्ते उपस्थित करित आहेत. दिग्रस मतदारसंघ काँग्रेसचाच म्हणून ओळखला जात असताना ठाकरे पिता-पुत्राने आपल्या या परंपरागत मतदारसंघाकडे पाठ फिरविल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. या मतदारसंघातील दोन नगरपरिषदांवर काँग्रेसची सत्ता आहे. राहुल ठाकरेंचे जिल्हा परिषद सर्कल याच मतदारसंघात आहे. त्यामुळे राहुल ठाकरेंनी दिग्रसमधूनच निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. राहुल ठाकरेंनी यवतमाळसाठी आग्रह धरला असला तरी मुळात यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील जनता बाहेरील उमेदवारांना स्वीकारण्याच्या मानसिकतेत नाही. तसा उमेदवार आल्यास त्याला धडा शिकविण्याचा निर्धार मतदार बोलून दाखवित आहे.