शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

आदिवासी शेतकऱ्यांच्या नशिबी फरपट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:38 IST

महागाव : ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी एका ॲग्रोटेक कंपनीने दाखवलेले स्वप्न २० वर्षानंतरही पूर्णत्वास गेले नाही. परिणामी ...

महागाव : ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी एका ॲग्रोटेक कंपनीने दाखवलेले स्वप्न २० वर्षानंतरही पूर्णत्वास गेले नाही. परिणामी प्रकल्पाकरिता ज्या आदिवासी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

तालुक्यातील उमरखेड रोडवर असलेल्या बिजोरा, घानमुख या परिसरातील आदिवासी बांधवांच्या जमिनी एका ॲग्रोटेक कंपनीने कवडीमोल भावात खरेदी केल्या. तेथे ३० मेगावॅटपर्यंत वीज निर्मिती, इथेनॉल व साखर उत्पादन करणार असल्याचे सांगितले. उद्योग उभारणीकरिता परिसरातील ५०० एकर जमीन खरेदी केली. तेथे सुरू होणाऱ्या उद्योगांत ४० हजार कामगार लागणार असल्याचे सांगितले गेले. ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले. यामुळे शेकडो आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावामध्ये कंपनीला दिल्या.

गेल्या २० वर्षांपासून या ठिकाणी कंपनीने कोणताही उद्योग उभारला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला. मात्र, बहुतांश शेतकरी आता भूमिहीन झाले आहे. शेतीच्या भरवशावर ज्यांचे कुटुंब होते, ते उघड्यावर आले. अशा कुटुंबातील आदिवासी शेतकऱ्यांनी त्या ॲग्रोटेक कंपनीला विकलेल्या जमिनी परत मिळवण्यासाठी संघर्ष सुरू केला आहे. गजानन वानोळे, जांबुवंत वानोळे, उत्तम वानोळे, दिगंबर बुरकुले, अशोक मानतुटे, भाऊराव वाघमारे, विश्वास मानतुटे, किसन काळे, तुकाराम पिंपळे आदी शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयापर्यंत हा वाद नेला होता. तो आता न्यायालयाच्या परवानगीने तहसीलदारांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे.

बॉक्स

जमिनी मूळ मालकांना परत करा

आदिवासीच्या जमिनी गैरआदिवासींनी घेतल्या असेल, तर त्या मूळ मालकांना परत कराव्यात, हा आधार घेऊन तालुक्यातील बिजोरा, घानमुख परिसरातील शेकडो शेतकरी कंपनीविरुद्ध संघर्ष करीत आहे. ५ ऑगस्ट रोजी या प्रकरणात महागाव तहसीलदारांसमोर सुनावणी आहे. त्यात नेमका काय निर्णय येतो, याकडे संपूर्ण आदिवासी शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.

कोट

त्या ॲग्रोटेक कंपनीने आदिवासींच्या जमिनी खरेदी करून घेताना कुटुंबातील व्यक्तीला नोकरीवर घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु गेल्या २० वर्षात या ठिकाणी कोणताही उद्योग उभारला नाही. उलट जमिनी अन्य कंपनीला दिल्या. हा एक प्रकारे आदिवासी बांधवांवर अन्याय आहे. यासाठी आम्ही संघर्ष करीत आहोत.

देविदास मोहकर, माजी जिल्हा परिषद सदस्य