शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

आदिवासी शेतकऱ्यांच्या नशिबी फरपट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:38 IST

महागाव : ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी एका ॲग्रोटेक कंपनीने दाखवलेले स्वप्न २० वर्षानंतरही पूर्णत्वास गेले नाही. परिणामी ...

महागाव : ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी एका ॲग्रोटेक कंपनीने दाखवलेले स्वप्न २० वर्षानंतरही पूर्णत्वास गेले नाही. परिणामी प्रकल्पाकरिता ज्या आदिवासी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

तालुक्यातील उमरखेड रोडवर असलेल्या बिजोरा, घानमुख या परिसरातील आदिवासी बांधवांच्या जमिनी एका ॲग्रोटेक कंपनीने कवडीमोल भावात खरेदी केल्या. तेथे ३० मेगावॅटपर्यंत वीज निर्मिती, इथेनॉल व साखर उत्पादन करणार असल्याचे सांगितले. उद्योग उभारणीकरिता परिसरातील ५०० एकर जमीन खरेदी केली. तेथे सुरू होणाऱ्या उद्योगांत ४० हजार कामगार लागणार असल्याचे सांगितले गेले. ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले. यामुळे शेकडो आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावामध्ये कंपनीला दिल्या.

गेल्या २० वर्षांपासून या ठिकाणी कंपनीने कोणताही उद्योग उभारला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला. मात्र, बहुतांश शेतकरी आता भूमिहीन झाले आहे. शेतीच्या भरवशावर ज्यांचे कुटुंब होते, ते उघड्यावर आले. अशा कुटुंबातील आदिवासी शेतकऱ्यांनी त्या ॲग्रोटेक कंपनीला विकलेल्या जमिनी परत मिळवण्यासाठी संघर्ष सुरू केला आहे. गजानन वानोळे, जांबुवंत वानोळे, उत्तम वानोळे, दिगंबर बुरकुले, अशोक मानतुटे, भाऊराव वाघमारे, विश्वास मानतुटे, किसन काळे, तुकाराम पिंपळे आदी शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयापर्यंत हा वाद नेला होता. तो आता न्यायालयाच्या परवानगीने तहसीलदारांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे.

बॉक्स

जमिनी मूळ मालकांना परत करा

आदिवासीच्या जमिनी गैरआदिवासींनी घेतल्या असेल, तर त्या मूळ मालकांना परत कराव्यात, हा आधार घेऊन तालुक्यातील बिजोरा, घानमुख परिसरातील शेकडो शेतकरी कंपनीविरुद्ध संघर्ष करीत आहे. ५ ऑगस्ट रोजी या प्रकरणात महागाव तहसीलदारांसमोर सुनावणी आहे. त्यात नेमका काय निर्णय येतो, याकडे संपूर्ण आदिवासी शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.

कोट

त्या ॲग्रोटेक कंपनीने आदिवासींच्या जमिनी खरेदी करून घेताना कुटुंबातील व्यक्तीला नोकरीवर घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु गेल्या २० वर्षात या ठिकाणी कोणताही उद्योग उभारला नाही. उलट जमिनी अन्य कंपनीला दिल्या. हा एक प्रकारे आदिवासी बांधवांवर अन्याय आहे. यासाठी आम्ही संघर्ष करीत आहोत.

देविदास मोहकर, माजी जिल्हा परिषद सदस्य