शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाग्य मशीन बंद

By admin | Updated: October 15, 2014 23:23 IST

जिल्ह्यातील सात मतदारसंघात लढतीत असलेल्या १०३ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ६७ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान वणी आणि उमरखेड येथे झाले आहे.

१०३ उमेदवार : पार्डी नस्करी, वसंतनगर येथे मतदानाला गालबोटयवतमाळ : जिल्ह्यातील सात मतदारसंघात लढतीत असलेल्या १०३ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ६७ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान वणी आणि उमरखेड येथे झाले आहे. घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी येथील मतदान केंद्राबाहेर ग्रामस्थ व पोलिसांत वाद झाला. याचे पर्यवसान मारहाणीत झाले. यामध्ये पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांच्यासह एक कर्मचारी जखमी झाला. तसेच दिग्रस तालुक्यातील वसंतनगर आणि पुसद तालुक्यातील गोपवाडी येथे गालबोट लागले. हे तीन अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. वणी, राळेगाव, आर्णी, यवतमाळ, दिग्रस, पुसद आणि उमरखेड या सात मतदारसंघात बुधवारी मतदान पार पडले. सकाळपासूनच मतदारामध्ये उत्साह दिसत होता. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात सकाळच्या टप्प्यात अधिक मतदान झाले. स्वयंस्फूर्तीने मदतान करण्यासाठी नागरिक मतदान केंद्रावर जाताना दिसत होते. निवडणूक आयोगाने दोन हजार ३३६ मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त लावला होता. बंदोबस्तातील मिझोरामचे पोलीस सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले होते. काही ठिकाणी डमी मतपत्रिकेवर असलेल्या रद्दच्या शिक्क्याने संभ्रम निर्माण झाला होता. राळेगाव येथे सायंकाळी ४ पर्यंत संपूर्ण बाजारपेठ बंद होती. मुक्कामी आलेल्या पोलिंग पार्ट्यांना सोई-सुविधा न मिळाल्याने त्रास सहन करावा लागला. यवतमाळातील मोठे वडगाव परिसरातील शाळेत पिण्याचे पाणी आणि शौचालय नसल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली. (कार्यालय प्रतिनिधी) वणी, उमरखेडमध्ये सर्वाधिक मतदानजिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रातील एकूण मतदानाच्या टक्केवारीत वणी आणि आर्णीने आघाडी घेतली आहे. या दोन क्षेत्रात ७० टक्के पेक्षा अधिक मतदान झाले आहे. ग्रामीण भागातील मतपेट्या पोहोचण्यास उशीर झाल्याने सायंकाळी ५ नंतर झालेल्या अंतिम मतदानाची सरासरीच निवडणूक विभागाकडून सांगण्यात आली. नवमतदारांमध्ये उत्साह जिल्ह्यातील २० लाख २५ हजार ९१८ मतदारांमध्ये १८ ते १९ वयोगटातील २० हजार ३३५ नवमतदार आहे. या मतदारांनीच उत्साहाने पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. हे वाढलेल्या टक्केवारीत दिसून येते. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक विभागाकडून विविध उपक्रमही जिल्हाभर राबविण्यात आले होते.