शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

भाग्य मशीन बंद

By admin | Updated: October 15, 2014 23:23 IST

जिल्ह्यातील सात मतदारसंघात लढतीत असलेल्या १०३ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ६७ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान वणी आणि उमरखेड येथे झाले आहे.

१०३ उमेदवार : पार्डी नस्करी, वसंतनगर येथे मतदानाला गालबोटयवतमाळ : जिल्ह्यातील सात मतदारसंघात लढतीत असलेल्या १०३ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ६७ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान वणी आणि उमरखेड येथे झाले आहे. घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी येथील मतदान केंद्राबाहेर ग्रामस्थ व पोलिसांत वाद झाला. याचे पर्यवसान मारहाणीत झाले. यामध्ये पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांच्यासह एक कर्मचारी जखमी झाला. तसेच दिग्रस तालुक्यातील वसंतनगर आणि पुसद तालुक्यातील गोपवाडी येथे गालबोट लागले. हे तीन अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. वणी, राळेगाव, आर्णी, यवतमाळ, दिग्रस, पुसद आणि उमरखेड या सात मतदारसंघात बुधवारी मतदान पार पडले. सकाळपासूनच मतदारामध्ये उत्साह दिसत होता. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात सकाळच्या टप्प्यात अधिक मतदान झाले. स्वयंस्फूर्तीने मदतान करण्यासाठी नागरिक मतदान केंद्रावर जाताना दिसत होते. निवडणूक आयोगाने दोन हजार ३३६ मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त लावला होता. बंदोबस्तातील मिझोरामचे पोलीस सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले होते. काही ठिकाणी डमी मतपत्रिकेवर असलेल्या रद्दच्या शिक्क्याने संभ्रम निर्माण झाला होता. राळेगाव येथे सायंकाळी ४ पर्यंत संपूर्ण बाजारपेठ बंद होती. मुक्कामी आलेल्या पोलिंग पार्ट्यांना सोई-सुविधा न मिळाल्याने त्रास सहन करावा लागला. यवतमाळातील मोठे वडगाव परिसरातील शाळेत पिण्याचे पाणी आणि शौचालय नसल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली. (कार्यालय प्रतिनिधी) वणी, उमरखेडमध्ये सर्वाधिक मतदानजिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रातील एकूण मतदानाच्या टक्केवारीत वणी आणि आर्णीने आघाडी घेतली आहे. या दोन क्षेत्रात ७० टक्के पेक्षा अधिक मतदान झाले आहे. ग्रामीण भागातील मतपेट्या पोहोचण्यास उशीर झाल्याने सायंकाळी ५ नंतर झालेल्या अंतिम मतदानाची सरासरीच निवडणूक विभागाकडून सांगण्यात आली. नवमतदारांमध्ये उत्साह जिल्ह्यातील २० लाख २५ हजार ९१८ मतदारांमध्ये १८ ते १९ वयोगटातील २० हजार ३३५ नवमतदार आहे. या मतदारांनीच उत्साहाने पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. हे वाढलेल्या टक्केवारीत दिसून येते. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक विभागाकडून विविध उपक्रमही जिल्हाभर राबविण्यात आले होते.