शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

भाग्य मशीन बंद

By admin | Updated: October 15, 2014 23:23 IST

जिल्ह्यातील सात मतदारसंघात लढतीत असलेल्या १०३ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ६७ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान वणी आणि उमरखेड येथे झाले आहे.

१०३ उमेदवार : पार्डी नस्करी, वसंतनगर येथे मतदानाला गालबोटयवतमाळ : जिल्ह्यातील सात मतदारसंघात लढतीत असलेल्या १०३ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ६७ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान वणी आणि उमरखेड येथे झाले आहे. घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी येथील मतदान केंद्राबाहेर ग्रामस्थ व पोलिसांत वाद झाला. याचे पर्यवसान मारहाणीत झाले. यामध्ये पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांच्यासह एक कर्मचारी जखमी झाला. तसेच दिग्रस तालुक्यातील वसंतनगर आणि पुसद तालुक्यातील गोपवाडी येथे गालबोट लागले. हे तीन अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. वणी, राळेगाव, आर्णी, यवतमाळ, दिग्रस, पुसद आणि उमरखेड या सात मतदारसंघात बुधवारी मतदान पार पडले. सकाळपासूनच मतदारामध्ये उत्साह दिसत होता. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात सकाळच्या टप्प्यात अधिक मतदान झाले. स्वयंस्फूर्तीने मदतान करण्यासाठी नागरिक मतदान केंद्रावर जाताना दिसत होते. निवडणूक आयोगाने दोन हजार ३३६ मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त लावला होता. बंदोबस्तातील मिझोरामचे पोलीस सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले होते. काही ठिकाणी डमी मतपत्रिकेवर असलेल्या रद्दच्या शिक्क्याने संभ्रम निर्माण झाला होता. राळेगाव येथे सायंकाळी ४ पर्यंत संपूर्ण बाजारपेठ बंद होती. मुक्कामी आलेल्या पोलिंग पार्ट्यांना सोई-सुविधा न मिळाल्याने त्रास सहन करावा लागला. यवतमाळातील मोठे वडगाव परिसरातील शाळेत पिण्याचे पाणी आणि शौचालय नसल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली. (कार्यालय प्रतिनिधी) वणी, उमरखेडमध्ये सर्वाधिक मतदानजिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रातील एकूण मतदानाच्या टक्केवारीत वणी आणि आर्णीने आघाडी घेतली आहे. या दोन क्षेत्रात ७० टक्के पेक्षा अधिक मतदान झाले आहे. ग्रामीण भागातील मतपेट्या पोहोचण्यास उशीर झाल्याने सायंकाळी ५ नंतर झालेल्या अंतिम मतदानाची सरासरीच निवडणूक विभागाकडून सांगण्यात आली. नवमतदारांमध्ये उत्साह जिल्ह्यातील २० लाख २५ हजार ९१८ मतदारांमध्ये १८ ते १९ वयोगटातील २० हजार ३३५ नवमतदार आहे. या मतदारांनीच उत्साहाने पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. हे वाढलेल्या टक्केवारीत दिसून येते. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक विभागाकडून विविध उपक्रमही जिल्हाभर राबविण्यात आले होते.