शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पुसदमध्ये १८ दिवसांपासून उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 06:00 IST

महिनाभरापूर्वी अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पुसदला भेट दिली. ते येण्यापूर्वीच शहर ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी पोलीस चौकीच्या आजूबाजूच्या फळ व भाजी विक्रेत्यांना हातगाडे हटविण्यासाठी लेखी सूचना पत्र दिले होते. त्यानंतर पोलिसांनी जबरीने त्यांचे फळगाडे हटविले. तेव्हापासून सर्व विक्रेते बेरोजगार झाले आहे.

ठळक मुद्देफळ व भाजी विक्रेते । बिडवई कॉम्प्लेक्ससमोरील खुल्या जागेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : पोलिसांनी जबरीने हुसकावून लावलेल्या येथील फळ विक्रेत्यांनी तहसीलसमोर उपोषण सुरू केले. या उपोषणाला आता १८ दिवस लोटले. मात्र अद्याप तोडगा निघाला नाही. आता उपोषणकर्त्यांनी बीडवाई कॉम्प्लेक्ससमोरील खुल्या जागेवर हातगाड्यांवर व्यवसाय करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे.महिनाभरापूर्वी अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पुसदला भेट दिली. ते येण्यापूर्वीच शहर ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी पोलीस चौकीच्या आजूबाजूच्या फळ व भाजी विक्रेत्यांना हातगाडे हटविण्यासाठी लेखी सूचना पत्र दिले होते. त्यानंतर पोलिसांनी जबरीने त्यांचे फळगाडे हटविले. तेव्हापासून सर्व विक्रेते बेरोजगार झाले आहे. हातगाड्या न हटविल्यास कारवाई करण्याची धमकीसुद्धा पोलिसांनी दिली होती.गेल्या २० वर्षांपासून सदर फळ आणि भाजी विक्रेते तेथे व्यवसाय करीत होते. अस्थायी स्वरूपाचे हातगाडे लावून शांततेचा भंग न करता केवळ पोटापाण्यासाठी त्यांनी आपली दुकाने थाटली होती. वाहतुकीस कोणताही अडथळा नव्हता. फळ व व भाजी विक्रेते केवळ चार फुटांवर वसलेले होते. मात्र आता पोलीस चौकीच्या बाजूला १२ फूट लांब असलेले पोलीस वाहन उभे करण्यात आले. खासगी बसेसचे त्याच ठिकाणी बसस्थानक आहे. त्यांचा वाहतुकीला अडथळा होत नाही का, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला.गेल्या १८ जुलै रोजी शहर ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी या व्यावसायिकांना पत्र लिहून हातगाडीवरील व्यवसायामुळे रहदारीत अडथळा होतो, असे कारण नमूद करून दोन दिवसांत पर्यायी जागा देण्याची ग्वाही दिली होती. दुकाने हटली, मात्र अद्याप त्यांना पर्यायी जागा मिळाली नाही. त्यामुळे फळ व भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. ठाणेदारांनी हातगाड्या हटवून आता ४० दिवस झाले. मात्र जागा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे बीडवई कॉम्प्लेक्ससमोरील खुल्या जागी अथवा पर्यायी व्यवस्था होईपर्यंत जुन्याच ठिकाणी हातगाड्या लावू देण्याची मागणी एका निवेदनातून जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.निवेदनावर विष्णू सरकटे, शेख शकूर, शेख अन्सार शेख उस्मान, शेख इसराईल शेख मिया, शेख मजिद शेख मुस्तफा, योगेंद्र पारसे, गणेश खाडे, रुखमाबाई सुकळकर, अशोक चोपडे, विनोद पराते आदींच्या स्वाक्षºया आहे.लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कायमचउपोषण सुरू होऊन आता १८ दिवस लोटले. मात्र अद्यापही उपोषणाला लोकप्रतिनिधी अथववा अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. सामान्य उपोषणकर्त्यांची कुणी साधी चौकशी केली नाही. त्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान शनिवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष खान मोहमद खान यांनीही उपोषणाला भेट दिली.

टॅग्स :Strikeसंप