शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी ‘उपोषण सत्याग्रह’

By admin | Updated: April 29, 2015 23:57 IST

भाजप सरकारने सत्तेत येण्यापुर्वी कर्जबाजारी शेतकऱ्यांना एकदाचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे अभिवचन दिले होते.

‘विजस’ : १ मेपासून आंदोलनयवतमाळ : भाजप सरकारने सत्तेत येण्यापुर्वी कर्जबाजारी शेतकऱ्यांना एकदाचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे अभिवचन दिले होते. आता याच अभिवचनाची पूर्तता शासनाने करावी यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिला उपोषण सत्यासग्रह करणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासूनच या सत्याग्रहाची सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवडणूक प्रचार सभेत २१ मार्च वर्धा व दाभाडी येथे शेतकरी आत्महत्या कजार्मुळे व शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे होत असून मला सत्तेवर आणा मी सर्व शेतकऱ्यांना नव्याने बँकांची दारे खुली करतो व पिक कर्ज देतो, तसेच शेती नफ्याची होण्यासाठी शेतीमालाचा हमीभाव लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा व या हमीभावावर सर्व शेतीमालाची सरकारकडून खरेदी करण्याची गाव्ही दिली होती. केंद्रात व राज्यात अमर्याद सत्ता आल्यानंतर सातबारा कोरा करण्याचे, लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव देण्याच्या आश्वासनाचा केंद्र व राज्य सरकारला सोयीने विसर पडला आहे. आता कर्ज मुक्तीसाठी शेतकऱ्यांना सरकारला बाध्य करण्यासाठी शेतकऱ्यांचे सर्व पक्ष, पंथ व विचार सोडून करा वा मारा असे टोकाचे आंदोलन सुरु करण्याची घोषणा शेतकरी नेते व विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी केली आहे. येत्या १ मे महाराष्ट्र दिनी सरकारला निर्वाणीचा ईशारा देण्यासाठी शेकडो शेतकरी विधवा व दुष्काळग्रस्त शेतकरी पांढरकवडा येथे उपोषण सत्ताग्रह करतील, अशी माहीती विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या सचिव अपर्णा मालीकर यांनी दिली. विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या नेत्या बेबीताई बैस, भारती पवार, चंद्रकला मेश्राम, अर्चना राऊत, अंजूबाई भुसारी, इंदूताई आष्टेकर, सुनीता पेंदोरे, जनाबाई घोडाम यांनी सर्व शेतकऱ्यांना ‘सात बारा कोरा करा’ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात, पीककर्ज, दुष्काळग्रस्त, तणावग्रस्त मदतीच्या पॅकेजमुळे शेतकरी आत्महत्या कमी होऊ शकत नाही. यासाठी फक्त नाले रुंदीकरण हाच एकमेव पर्याय आहे, अशी मुक्ताफळे दररोज फोडत आहे, भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेती विकास व तणावग्रस्त शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी कर्जमुक्ती व हमीभाव वाढ या गरजापूतीर्साठी आवश्यक असलेली दिशा, धोरणे राबविण्यास अपयशी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे पीक आले आहे. या अपयशाची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या नेत्या बेबीताई बैस यांनी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)आश्वासन पूर्ततेची मागणीपंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आता सत्तेत आल्यानंतर त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याची गरज आहे.