शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

आर्णी तालुक्यात हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 23:55 IST

ऐन हिवाळ्यातच तालुक्यातील शेलू येथे पाणी पेटले आहे. गावकºयांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असल्याने त्यांनी गुरूवारी थेट तहसीलवर धडक दिली.

ठळक मुद्देशेलूचे नागरिक तहसीलवर धडकले : ग्रामपंचायत उदासीन, सचिव, तलाठी गावातच येत नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : ऐन हिवाळ्यातच तालुक्यातील शेलू येथे पाणी पेटले आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असल्याने त्यांनी गुरूवारी थेट तहसीलवर धडक दिली.शेलू येथे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली. गेल्या अनेक दिवसांपासून गावकऱ्यांना कामधंदा सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लाग तांहे. महिला आणि पुरूषांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने कोणतेही नियोजन न केल्याचा आरोप गावकरी करीत आहे. गावकºयांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना रस्त्यांनी माभ धो-धो पाणी वाहात आहे. यामुळे गावकरी प्रचंड संतापले आहे.ग्रामपंचायत सचिव आणि तलाठी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल देण्यास टाळाटाळ करतात. ते गावात उपस्थित नसतात. त्यामुळे गावकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. आता ऐन हिवाळ्यातच गावात पाणी संकट निर्माण झाले. दरवर्षी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहीर अधीग्रहण केले जाते. मात्र यावर्षी अद्याप विहिरी अधिग्रहीत करण्यात आली नाही. त्यामुळे पाण्यासाठी महिलांसह पुरुषांना पायपीट करावी लागत आहे.पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या शेलू येथील महिला, नागरिकांनी गुरूवारी थेट तहसीलवर धडक दिली. तहसीलदार यू. डी. तुंडलवार यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी पाणीटंचाई सुपुष्टात आणावी अशी मागणी केली. यावेळी बाबूसिंग चव्हाण, विजय घंगाळे, नितीन गावंडे, ऊमेश राठोड, संदीप कातकीडे, बाळू देवकर, सुभाष पवार, संतोष घंगाळे, सुनील कातकीडे, विलास गावंडे, हिम्मत नागमोडे, संदीप चव्हाण, माया गावंडे, शांताबाई पवार, पार्वता कुडमते, गिरजाबाई मुधळकर, लिलाबाई चव्हाण, रेखा पवार, कांदा पवार, पंचफुला जाधव यांच्यासह गावकरी उपस्थित होते.पाणीटंचाई पाचवीलाच पूजलीशेलू येथे दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. प्रशासन केवळ विहीर अधिग्रहण करून तात्पुरती उपाययोजना करते. यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना केल्यास गावाची पाणी समस्या निकाली निघू शकते. प्रशासनच्या उदासीनतेमुळे गावकऱ्यांना दरवर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. ही पाणीटंचाई शेलू वासीयांच्या पाचवीलाच पूजली आहे. प्रशासनाने आता कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.लोणबेहळ येथे पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात शेलू ग्रामपंचायतीला तथा पंचायत समिती अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. याची तातडीने अंमलबजावणी केल्यास पाणीटंचाई दूर होईल.- स्वाती येंडेजिल्हा परिषद सदस्य