शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आर्णी तालुक्यात हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 23:55 IST

ऐन हिवाळ्यातच तालुक्यातील शेलू येथे पाणी पेटले आहे. गावकºयांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असल्याने त्यांनी गुरूवारी थेट तहसीलवर धडक दिली.

ठळक मुद्देशेलूचे नागरिक तहसीलवर धडकले : ग्रामपंचायत उदासीन, सचिव, तलाठी गावातच येत नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : ऐन हिवाळ्यातच तालुक्यातील शेलू येथे पाणी पेटले आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असल्याने त्यांनी गुरूवारी थेट तहसीलवर धडक दिली.शेलू येथे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली. गेल्या अनेक दिवसांपासून गावकऱ्यांना कामधंदा सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लाग तांहे. महिला आणि पुरूषांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने कोणतेही नियोजन न केल्याचा आरोप गावकरी करीत आहे. गावकºयांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना रस्त्यांनी माभ धो-धो पाणी वाहात आहे. यामुळे गावकरी प्रचंड संतापले आहे.ग्रामपंचायत सचिव आणि तलाठी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल देण्यास टाळाटाळ करतात. ते गावात उपस्थित नसतात. त्यामुळे गावकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. आता ऐन हिवाळ्यातच गावात पाणी संकट निर्माण झाले. दरवर्षी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहीर अधीग्रहण केले जाते. मात्र यावर्षी अद्याप विहिरी अधिग्रहीत करण्यात आली नाही. त्यामुळे पाण्यासाठी महिलांसह पुरुषांना पायपीट करावी लागत आहे.पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या शेलू येथील महिला, नागरिकांनी गुरूवारी थेट तहसीलवर धडक दिली. तहसीलदार यू. डी. तुंडलवार यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी पाणीटंचाई सुपुष्टात आणावी अशी मागणी केली. यावेळी बाबूसिंग चव्हाण, विजय घंगाळे, नितीन गावंडे, ऊमेश राठोड, संदीप कातकीडे, बाळू देवकर, सुभाष पवार, संतोष घंगाळे, सुनील कातकीडे, विलास गावंडे, हिम्मत नागमोडे, संदीप चव्हाण, माया गावंडे, शांताबाई पवार, पार्वता कुडमते, गिरजाबाई मुधळकर, लिलाबाई चव्हाण, रेखा पवार, कांदा पवार, पंचफुला जाधव यांच्यासह गावकरी उपस्थित होते.पाणीटंचाई पाचवीलाच पूजलीशेलू येथे दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. प्रशासन केवळ विहीर अधिग्रहण करून तात्पुरती उपाययोजना करते. यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना केल्यास गावाची पाणी समस्या निकाली निघू शकते. प्रशासनच्या उदासीनतेमुळे गावकऱ्यांना दरवर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. ही पाणीटंचाई शेलू वासीयांच्या पाचवीलाच पूजली आहे. प्रशासनाने आता कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.लोणबेहळ येथे पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात शेलू ग्रामपंचायतीला तथा पंचायत समिती अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. याची तातडीने अंमलबजावणी केल्यास पाणीटंचाई दूर होईल.- स्वाती येंडेजिल्हा परिषद सदस्य