शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आर्णी तालुक्यात हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 23:55 IST

ऐन हिवाळ्यातच तालुक्यातील शेलू येथे पाणी पेटले आहे. गावकºयांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असल्याने त्यांनी गुरूवारी थेट तहसीलवर धडक दिली.

ठळक मुद्देशेलूचे नागरिक तहसीलवर धडकले : ग्रामपंचायत उदासीन, सचिव, तलाठी गावातच येत नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : ऐन हिवाळ्यातच तालुक्यातील शेलू येथे पाणी पेटले आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असल्याने त्यांनी गुरूवारी थेट तहसीलवर धडक दिली.शेलू येथे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली. गेल्या अनेक दिवसांपासून गावकऱ्यांना कामधंदा सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लाग तांहे. महिला आणि पुरूषांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने कोणतेही नियोजन न केल्याचा आरोप गावकरी करीत आहे. गावकºयांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना रस्त्यांनी माभ धो-धो पाणी वाहात आहे. यामुळे गावकरी प्रचंड संतापले आहे.ग्रामपंचायत सचिव आणि तलाठी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल देण्यास टाळाटाळ करतात. ते गावात उपस्थित नसतात. त्यामुळे गावकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. आता ऐन हिवाळ्यातच गावात पाणी संकट निर्माण झाले. दरवर्षी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहीर अधीग्रहण केले जाते. मात्र यावर्षी अद्याप विहिरी अधिग्रहीत करण्यात आली नाही. त्यामुळे पाण्यासाठी महिलांसह पुरुषांना पायपीट करावी लागत आहे.पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या शेलू येथील महिला, नागरिकांनी गुरूवारी थेट तहसीलवर धडक दिली. तहसीलदार यू. डी. तुंडलवार यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी पाणीटंचाई सुपुष्टात आणावी अशी मागणी केली. यावेळी बाबूसिंग चव्हाण, विजय घंगाळे, नितीन गावंडे, ऊमेश राठोड, संदीप कातकीडे, बाळू देवकर, सुभाष पवार, संतोष घंगाळे, सुनील कातकीडे, विलास गावंडे, हिम्मत नागमोडे, संदीप चव्हाण, माया गावंडे, शांताबाई पवार, पार्वता कुडमते, गिरजाबाई मुधळकर, लिलाबाई चव्हाण, रेखा पवार, कांदा पवार, पंचफुला जाधव यांच्यासह गावकरी उपस्थित होते.पाणीटंचाई पाचवीलाच पूजलीशेलू येथे दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. प्रशासन केवळ विहीर अधिग्रहण करून तात्पुरती उपाययोजना करते. यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना केल्यास गावाची पाणी समस्या निकाली निघू शकते. प्रशासनच्या उदासीनतेमुळे गावकऱ्यांना दरवर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. ही पाणीटंचाई शेलू वासीयांच्या पाचवीलाच पूजली आहे. प्रशासनाने आता कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.लोणबेहळ येथे पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात शेलू ग्रामपंचायतीला तथा पंचायत समिती अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. याची तातडीने अंमलबजावणी केल्यास पाणीटंचाई दूर होईल.- स्वाती येंडेजिल्हा परिषद सदस्य