शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

शेतीचे बळकट धोरण आवश्यक

By admin | Updated: July 10, 2017 01:02 IST

शेती आणि शेतकऱ्यांचा श्वाश्वत विकास व्हावा यासाठी बळकट कृषी धोरण आवश्यक असल्याची महत्वपूर्ण सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज केली.

किशोर तिवारी : शेतकरी आयोगांच्या अध्यक्षांची बैठकलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेती आणि शेतकऱ्यांचा श्वाश्वत विकास व्हावा यासाठी बळकट कृषी धोरण आवश्यक असल्याची महत्वपूर्ण सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज केली.नीती आयोगामध्ये दिल्ली येथे विविध राज्यातील शेतकरी आयोगांच्या अध्यक्षांची बैठक बोलविण्यात आली होती. नीती आयोगाच्या कृषी विभागाचे सदस्य प्रो. रमेश चंद यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. यावेळी विविध राज्यांचे शेतकरी आयोगाचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी तिवारी म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांसाठी मजबूत अशा कृषी धोरणाची आवश्यकता आहे. या धोरणात शेतकऱ्यांचा संपूर्ण विकास अपेक्षित आहे. याबाबत त्यांनी यावेळी काही सूचना मांडल्या, यामध्ये शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात तसेच योग्य वेळी पतपुरवठा होणे गरजेचे आहे. हा पतपुरवठा गरीबातील गरीब शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. यासह शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज हे चार टक्के दराने असावे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांवरील कर्ज फेडीची मर्यादा वाढवून मिळावी, कृषी जोखीम निधीची स्थापन व्हावी ज्यातून आपतकालीन परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून दयावा, शेतकरी महिलांना किसान क्रेडीट कार्ड वितरीत करावे, शेतकऱ्यांसाठी तसेच शेतीत उपयोगी असणाऱ्या पशुंसाठी एकत्रीत एकात्मिक क्रेडिट-पीक पशुधन आरोग्य विमा योजना असावी, सर्व पीकांसाठी वीमा आवश्यक असून तो कमी दराचा असावा यासह ग्रामीण वीमा विकास निधी असावा, ज्यामाध्यमातून गावातील विकास कामांचा देखील विमा उतरविला जाऊ शकतो, आदी सूचना किशोर तिवारी यांनी केल्या. त्यांच्या या सूचना नीती आयोगाने नोंदवून घेतल्या असून या सूचनांचे काटेकोरपणे पालन झाल्यास शेतकऱ्यांना समृद्धी येईल.राज्याने नुकतेच शेतकऱ्यांचे कर्जमाफ केलेले आहे. केंद्र शासनाने ४० हजार कोटींची आर्थिक मदत करावी अशी मागणी, स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यावेळी केली.