शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचे बळकट धोरण आवश्यक

By admin | Updated: July 10, 2017 01:02 IST

शेती आणि शेतकऱ्यांचा श्वाश्वत विकास व्हावा यासाठी बळकट कृषी धोरण आवश्यक असल्याची महत्वपूर्ण सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज केली.

किशोर तिवारी : शेतकरी आयोगांच्या अध्यक्षांची बैठकलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेती आणि शेतकऱ्यांचा श्वाश्वत विकास व्हावा यासाठी बळकट कृषी धोरण आवश्यक असल्याची महत्वपूर्ण सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज केली.नीती आयोगामध्ये दिल्ली येथे विविध राज्यातील शेतकरी आयोगांच्या अध्यक्षांची बैठक बोलविण्यात आली होती. नीती आयोगाच्या कृषी विभागाचे सदस्य प्रो. रमेश चंद यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. यावेळी विविध राज्यांचे शेतकरी आयोगाचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी तिवारी म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांसाठी मजबूत अशा कृषी धोरणाची आवश्यकता आहे. या धोरणात शेतकऱ्यांचा संपूर्ण विकास अपेक्षित आहे. याबाबत त्यांनी यावेळी काही सूचना मांडल्या, यामध्ये शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात तसेच योग्य वेळी पतपुरवठा होणे गरजेचे आहे. हा पतपुरवठा गरीबातील गरीब शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. यासह शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज हे चार टक्के दराने असावे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांवरील कर्ज फेडीची मर्यादा वाढवून मिळावी, कृषी जोखीम निधीची स्थापन व्हावी ज्यातून आपतकालीन परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून दयावा, शेतकरी महिलांना किसान क्रेडीट कार्ड वितरीत करावे, शेतकऱ्यांसाठी तसेच शेतीत उपयोगी असणाऱ्या पशुंसाठी एकत्रीत एकात्मिक क्रेडिट-पीक पशुधन आरोग्य विमा योजना असावी, सर्व पीकांसाठी वीमा आवश्यक असून तो कमी दराचा असावा यासह ग्रामीण वीमा विकास निधी असावा, ज्यामाध्यमातून गावातील विकास कामांचा देखील विमा उतरविला जाऊ शकतो, आदी सूचना किशोर तिवारी यांनी केल्या. त्यांच्या या सूचना नीती आयोगाने नोंदवून घेतल्या असून या सूचनांचे काटेकोरपणे पालन झाल्यास शेतकऱ्यांना समृद्धी येईल.राज्याने नुकतेच शेतकऱ्यांचे कर्जमाफ केलेले आहे. केंद्र शासनाने ४० हजार कोटींची आर्थिक मदत करावी अशी मागणी, स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यावेळी केली.