शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

शेती ठेक्याने देण्याकडे कल

By admin | Updated: May 21, 2016 02:25 IST

कृषिप्रधान समजल्या जाणाऱ्या देशात आता शेतकरीच पराधीन झाले असून शेती व्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे.

शेती झाली बिनभरवशाची : सालगडी महागले, मजुरांचेही भाव वधारलेवणी : कृषिप्रधान समजल्या जाणाऱ्या देशात आता शेतकरीच पराधीन झाले असून शेती व्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे. शेती उत्पादनाचा वाढता खर्च, पावसाचे बिघडलेले तापमान आणि शेतमालाला मिळणारा अत्यंत कमी भाव, यामुळे हा व्यवसाय सदोदीत नुकसानीचा ठरत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे बहुतेक सधन शेतकरीसुद्धा आता शेती ठेक्याने देण्याचा विचार करीत आहे. ज्यांना शेती करण्याशिवाय पर्यायच नाही व घरचे चार जण शेतीत राबू शकतात, असे शेतकरी शेती ठेक्याने करून परंपरागत व्यवसाय जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे.देशातील ९० टक्के ग्रामीण जनता शेती व्यवसायाशी निगडित आहे. मात्र विदर्भातील ८३ टक्के शेती कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. बहुतांश शेतकऱ्यांना दरवर्षी संस्थांकडून किंवा बँकांकडून शेती कर्ज घेऊनच शेती कसावी लागते. शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करण्याच्या अटीवर शासन शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देते. तरीही शेतातील लागवडीचा खर्च व उत्पादनातून येणारा पैसा, याचा ताळेबंद तोट्याचाच होतो. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जाचे मुद्दलही भरू शकत नाही. एकदा कर्ज थकले की ते दरवर्षी शेतकऱ्यांच्या डोक्यावर भार बनून राहते. आता तर माणसोमाणसी शेती करणे म्हणजे जुगार खेळल्यासारखेच बनले आहे. सालदाराचे वर्षाचे वेतन एक लाखाचेवर पोहोचले आहे. शेतीसाठी आवश्यक बैलजोडीच्या किंमतीही लाखावर पोहोचल्या आहे. शेतीत राबणाऱ्या मजुरांची टंचाई होत असल्याने मजुरीचे दरही शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके यांच्या किंमती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या ठरल्या आहेत. शेतकऱ्यांची नड बघून कृषी केंद्रांचे चालक शेतकऱ्यांना लुबाडून त्यांना कंगाल करण्याच्या बेतात असल्याचेही कित्येकदा शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. वर्षभर राबराब राबून वर्षाअखेर सर्व खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हाती नफा शिल्लक राहतच नाही. त्यामुळे शेती ठेक्याने देऊन एक रकमी पैसा हातात पाडून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.कधीकाळी शेतकऱ्यांकडे गोधन असायचे. त्यापासूनच शेतात राबण्यासाठी बैल तयार व्हायचे. आता चारा-पाण्याची टंचाई, राखणदार गड्याची मजुरी परवडत नसल्याने शेतकऱ्यांकडे गायींची वानवाच दिसते. त्यामुळे बैलजोडी म्हातारी झाल्यास शेतकऱ्यांना नव्याने बैलजोडी खरेदी करावी लागते. सर्वसाधारण शेतकऱ्यांना ही खरेदी शक्यच होत नाही. त्यामुळे नाईलाजाने शेती ठेक्याने द्यावी लागते. काळ एवढा बदलला की, शेतकऱ्यांनाही पॉकेटचे दुध विकत घेऊन चहा बनवावा लागतो. शेतात टाकायला शेणखत नाही. त्यामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. तो भरून काढण्यासाठी रासायनिक खताचा मारा करावा लागतो. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कापसाचे भाव वाढलेले नाही. त्यामुळे कापूस पिकासाठी लागवडीचा खर्च अधिक, तर उत्पादन कमी, असा जुगार शेतकरी खेळत आहे. दोन वर्षांपासून सोयाबिनचे पीक शेकऱ्यांना दगा देत आहे. सिंचनाची पुरेशी सोय नसल्याने दुबार पीक घेण्याची किमया शेतकऱ्यांना करता येत नाही. शेतकऱ्यांना पैशासाठी बँकांवर अवलंबून राहावे लागते. शेती करण्यासाठी सालदार व मजुरांवर अवलंबून राहवे लागते. शेतमाल विकण्यासाठी दलाल व व्यापारी यांच्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेती व्यवसाय पूर्णत: परावलंबी बनला आहे. शेतकऱ्यांपेक्षा आता शेतमजूर सुखी असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसते. त्यामुळे शेती व्यवसाय मोडकळीस तर येणार नाही ना, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या मुली म्हणतात, शेतकरी नवरा नकोच शेती व्यवसायामध्ये स्थैर्य उरले नसल्याने आता लग्नाची मुलगी व तिचे पालकसुद्धा जावई म्हणून शेतकरी मुलाला पसंत करीत नाही. चार पैसे अधिक गेले तरी चालतील, परंतु मुलगी सुखात पडावी ही वधुपित्याची ईच्छा असते. शेतकरी बापाने शेतीचे चटके सोसलेले असतात. त्यामुळे जावई चाकरमानी किंवा स्वत:चा व्यवसाय करणारा असावा, अशी बापाची ईच्छा असते. मग तो चपराशी असला तरी हरकत नाही. त्याचे एखादे टपरी दुकान असो, आॅटो चालविणारा असो, पण शेतकरी जावई नको, ही खुद्द शेतकऱ्यांचीही भावना बनली आहे. शेती व्यवसायाचे हरविलेले महात्म्यच याला कारणीभूत ठरत आहे.