शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोडली भाजीपाला शेतात गुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 15:35 IST

शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाजीमंडीत कवडीमोल भाव आहे. परिणामी यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्याच्या बिजोरा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाजीपाल्याच्या शेतात गुरे सोडली आहेत.

ठळक मुद्देकवडीमोल भाव, वाहतूक खर्चही निघत नाही

सदानंद लाहेवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाजीमंडीत कवडीमोल भाव आहे. बाजारापर्यंत भाजीपाला नेण्याचा वाहतूक खर्चही निघत नाही. परिणामी यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्याच्या बिजोरा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाजीपाल्याच्या शेतात गुरे सोडली आहेत. शासनाच्या उदासीन धारेणामुळे शेतकरी देशोधडीस लागला असताना आता बागायती शेतकरीही त्याच वाटेवर आहे.महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बागायती शेतकरी केली जाते. खरीप हंगामात काहीही उरले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भाजीपाला लावला आहे. टोमॅटो, वांगे, फुलकोबी, पानकोबी, काकडी, पालक, सांभार, वाल आदी पालेभाज्याला लावल्या आहे. परंतु या भाज्यांना सध्या बाजारात भावच नाही. कोबीच्या एका कट्ट्याला २५ ते ३० रुपयेच मिळत आहे. पालकाला तर कुणी हातही लावत नाही. टोमॅटो चिल्लर बाजारात दहा रुपयाला दीड किलो मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल कुणी घेत नाही. दूरच्या बाजारपेठेत भाजीपाला पाठवावा तर वाहतूक खर्चही निघत नाही. लावलागवड, बियाणे, फवारणी यासह तोडणीची मजुरी असा प्रचंड खर्च शेतकऱ्यांला करावा लागत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आता गुरे सोडली आहे. जनावरांना चारा तरी होईल, अशी आशा आहे.

शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडाअनेक शेतकऱ्यांचे कुटुंब केवळ भाजीपाल्यावर चालविले जाते. नगदी पैसे हातात येत असल्याने कोणतीही अडचण जात नाही. परंतु यावर्षी भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे. त्यामुळे घर खर्च चालवावा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. भाजीपाल्यातून समृद्धीच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे.

टॅग्स :agricultureशेती