शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

विविध संकटांनी शेतकरी त्रस्त

By admin | Updated: October 22, 2014 23:26 IST

पावसाने मारलेली दडी, उभे पीक वाळून जाणे, दुबार, तिबार पेरणी आणि युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी त्रस्त झाले. त्यातच शेतमाल खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नांदेपेरा : पावसाने मारलेली दडी, उभे पीक वाळून जाणे, दुबार, तिबार पेरणी आणि युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी त्रस्त झाले. त्यातच शेतमाल खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या घरात जेवढा पैसा होता, तेवढा मजुरांना वाटप करण्यात गेला आहे़ त्यामुळे आता त्यांच्या घरी एक पैकाही उरला नाही़ यातच खरीप पिकांना फटका बसला. जी पिके निघाली, ती विकायची कुठे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ शेतकरी संकटात असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन येण्यास कुणीही पुढाकार घेतला नाही़ नेते मंडळी आत्तापर्यंत विधानसभा निवडणुकीत व्यस्त होती. निकाल लागल्यानंतर आता सर्वांना मुख्यमंत्री कोण होईल, याची चिंता लागली आहे. मात्र शेतकऱ्यांचे काय हाल होत आहे, याचे त्यांना काही देणे-घेणे नाही़आता दिवाळी सण तोंडावर आला आहे. सर्वत्र खरेदी सुरू आहे. मात्र हा सण कसा साजरा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे़ त्यातून मार्ग काढण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून आपल्या जनावरांची विक्री करण्याचा सपाटा सुरू केला आहे. आता ते जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवित आहेत. बाजारात कवडीमोल दराने जनावरे विक्री करावी लागत आहे़ ज्या जनावरांनी वर्षभर शेतकऱ्यांना साथ दिली, ती जनावरे विकताना त्यांना यातना होत आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या मनात दु:ख आहे, तर दुसरीकडे दिवाळी सण साजरा करायचा असल्यामुळे ते दुविधेत सापडले आहे. या व्दिधा मनस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नेहमी संकटाचा सामना करावा लागतो़ पीक ऐन भरात असताना पावसाने दडी मारल्याने सोयाबिनच्या शेंगा भरल्याच नाही, तर कापसाचे पीक वाळू लागले आहे़ पिकांना लावला एवढा खर्चही निघणे अवघड झाले आहे़ (वार्ताहर)