शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

विविध संकटांनी शेतकरी त्रस्त

By admin | Updated: October 22, 2014 23:26 IST

पावसाने मारलेली दडी, उभे पीक वाळून जाणे, दुबार, तिबार पेरणी आणि युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी त्रस्त झाले. त्यातच शेतमाल खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नांदेपेरा : पावसाने मारलेली दडी, उभे पीक वाळून जाणे, दुबार, तिबार पेरणी आणि युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी त्रस्त झाले. त्यातच शेतमाल खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या घरात जेवढा पैसा होता, तेवढा मजुरांना वाटप करण्यात गेला आहे़ त्यामुळे आता त्यांच्या घरी एक पैकाही उरला नाही़ यातच खरीप पिकांना फटका बसला. जी पिके निघाली, ती विकायची कुठे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ शेतकरी संकटात असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन येण्यास कुणीही पुढाकार घेतला नाही़ नेते मंडळी आत्तापर्यंत विधानसभा निवडणुकीत व्यस्त होती. निकाल लागल्यानंतर आता सर्वांना मुख्यमंत्री कोण होईल, याची चिंता लागली आहे. मात्र शेतकऱ्यांचे काय हाल होत आहे, याचे त्यांना काही देणे-घेणे नाही़आता दिवाळी सण तोंडावर आला आहे. सर्वत्र खरेदी सुरू आहे. मात्र हा सण कसा साजरा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे़ त्यातून मार्ग काढण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून आपल्या जनावरांची विक्री करण्याचा सपाटा सुरू केला आहे. आता ते जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवित आहेत. बाजारात कवडीमोल दराने जनावरे विक्री करावी लागत आहे़ ज्या जनावरांनी वर्षभर शेतकऱ्यांना साथ दिली, ती जनावरे विकताना त्यांना यातना होत आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या मनात दु:ख आहे, तर दुसरीकडे दिवाळी सण साजरा करायचा असल्यामुळे ते दुविधेत सापडले आहे. या व्दिधा मनस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नेहमी संकटाचा सामना करावा लागतो़ पीक ऐन भरात असताना पावसाने दडी मारल्याने सोयाबिनच्या शेंगा भरल्याच नाही, तर कापसाचे पीक वाळू लागले आहे़ पिकांना लावला एवढा खर्चही निघणे अवघड झाले आहे़ (वार्ताहर)