शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

कर्जासाठी शेतकरी त्रस्त

By admin | Updated: June 13, 2014 00:37 IST

खरिपाचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरीसुद्धा पैशाअभावी शेतकरी या हंगामाला सामोरो जाण्यास तयार नाही. आधीच्या कर्जाची परतफेड न झाल्याने बँक पुन्हा कर्ज देण्यास तयार नाही.

यवतमाळ : खरिपाचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरीसुद्धा पैशाअभावी शेतकरी या हंगामाला सामोरो जाण्यास तयार नाही. आधीच्या कर्जाची परतफेड न झाल्याने बँक पुन्हा कर्ज देण्यास तयार नाही. कारवाईच्या बडग्याने सावकारही शेतकऱ्यांना उभे करण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकरी चांगलाच कचाट्यात सापडला आहे.

निसर्ग प्रकोपाने २०१३-१४ हे संपूर्ण वर्ष शेतकऱ्यांसाठी अतिशय वाईट गेले. आधी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातातून गेला त्यानंतर रबी हंगाम घरात येईल असे वाटत असतानाच गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास पळवून नेला. या परिस्थितीत कंबरडे मोडलेला शेतकरी पुन्हा उभा राहलाच नाही. अशावेळी आता खरीपाचा हंगाम तोंडावर आला परंतु कर्जाची सोय झाली नाही. त्यामुळे पेरणी पूर्वीच निसर्गराजा हतबल झाल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे.

खरीपाचा पेरणीचा हंगाम अठराशे ते एकोणिसशे कोटीच्या घरात जातो. प्रत्यक्षात बँकांनी १०० ते १५० कोटींच्याच कर्जाचे वितरण केले आहे. यावरून शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी लागणाऱ्या व्यवस्थेचा अंदाज येतो. यावर्षी बँकांची परतफेड साशंक अवस्थेत आहे. परतीचा पाऊस आणि रबी काढणीला झालेली गारपीट यामुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे आज अनेक शेतकरी थकबाकीदार आहेत. थकीत शेतकऱ्यांना बँक कर्ज वितरीत करीत नाही. त्यामुळे पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून असा पेच शेतकऱ्यांपुढे आहे. सावकारी कायद्याने अवैध सावकारांनी कर्ज वितरीत करताना आखडता हात घेतला आहे. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पेरणीपूर्वीच शेतकरी हताश झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी प्रयत्नाची पराकाष्टा करतांनाचे चित्र पहायला मिळत आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी सर्व काही पणाला लावले आहे. अनेकांनी होते-नव्हते ते दागिने गहाण ठेवले आहे. काहींनी तर ते चक्क विकले आहेत. अनेकांनी आपली जनावरेसुद्धा विक्रीस काढली आहे. कसेही करून खरीपात पेरणी करून गेल्या वर्षभऱ्यातील भरपाई काही प्रमाणात का होईना, भरून काढायची, असा प्रयत्न शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे. (शहर वार्ताहर)