शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

कर्जासाठी शेतकरी त्रस्त

By admin | Updated: June 13, 2014 00:37 IST

खरिपाचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरीसुद्धा पैशाअभावी शेतकरी या हंगामाला सामोरो जाण्यास तयार नाही. आधीच्या कर्जाची परतफेड न झाल्याने बँक पुन्हा कर्ज देण्यास तयार नाही.

यवतमाळ : खरिपाचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरीसुद्धा पैशाअभावी शेतकरी या हंगामाला सामोरो जाण्यास तयार नाही. आधीच्या कर्जाची परतफेड न झाल्याने बँक पुन्हा कर्ज देण्यास तयार नाही. कारवाईच्या बडग्याने सावकारही शेतकऱ्यांना उभे करण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकरी चांगलाच कचाट्यात सापडला आहे.

निसर्ग प्रकोपाने २०१३-१४ हे संपूर्ण वर्ष शेतकऱ्यांसाठी अतिशय वाईट गेले. आधी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातातून गेला त्यानंतर रबी हंगाम घरात येईल असे वाटत असतानाच गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास पळवून नेला. या परिस्थितीत कंबरडे मोडलेला शेतकरी पुन्हा उभा राहलाच नाही. अशावेळी आता खरीपाचा हंगाम तोंडावर आला परंतु कर्जाची सोय झाली नाही. त्यामुळे पेरणी पूर्वीच निसर्गराजा हतबल झाल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे.

खरीपाचा पेरणीचा हंगाम अठराशे ते एकोणिसशे कोटीच्या घरात जातो. प्रत्यक्षात बँकांनी १०० ते १५० कोटींच्याच कर्जाचे वितरण केले आहे. यावरून शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी लागणाऱ्या व्यवस्थेचा अंदाज येतो. यावर्षी बँकांची परतफेड साशंक अवस्थेत आहे. परतीचा पाऊस आणि रबी काढणीला झालेली गारपीट यामुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे आज अनेक शेतकरी थकबाकीदार आहेत. थकीत शेतकऱ्यांना बँक कर्ज वितरीत करीत नाही. त्यामुळे पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून असा पेच शेतकऱ्यांपुढे आहे. सावकारी कायद्याने अवैध सावकारांनी कर्ज वितरीत करताना आखडता हात घेतला आहे. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पेरणीपूर्वीच शेतकरी हताश झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी प्रयत्नाची पराकाष्टा करतांनाचे चित्र पहायला मिळत आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी सर्व काही पणाला लावले आहे. अनेकांनी होते-नव्हते ते दागिने गहाण ठेवले आहे. काहींनी तर ते चक्क विकले आहेत. अनेकांनी आपली जनावरेसुद्धा विक्रीस काढली आहे. कसेही करून खरीपात पेरणी करून गेल्या वर्षभऱ्यातील भरपाई काही प्रमाणात का होईना, भरून काढायची, असा प्रयत्न शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे. (शहर वार्ताहर)