शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

शेतकरी पुत्राने द्यावा आपल्या वडिलांना धीर

By admin | Updated: September 15, 2016 01:24 IST

शेतकऱ्याच्या मुलाने दररोज आपला बाप शेतात राब राब राबून सायंकाळी घरी परतल्यावर त्याच्या चेहऱ्याचा अभ्यास करावा.

मधुकर खोडे महाराज : किसान गणेश मंडळाद्वारे बळीराजा चेतना अभियानाद्वारा कीर्तनउमरखेड : शेतकऱ्याच्या मुलाने दररोज आपला बाप शेतात राब राब राबून सायंकाळी घरी परतल्यावर त्याच्या चेहऱ्याचा अभ्यास करावा. चिंताग्रस्त, तणावग्रस्त भाव ओळखून संवाद साधावा. तणावाचे कारण ओळखून धीर द्यावा. यातून आत्महत्येसारख्या घातक विचारातून शेतकऱ्यांचे मत परिवर्तन होईल, असे प्रतिपादन व्यसनमुक्ती सम्राट मधुकर महाराज खोडे यांनी येथे केले.येथील शिवाजी वॉर्डातील किसान गणेश मंडळाद्वारे आयोजित बळीराजा चेतना अभियानांतर्गत आयोजित कीर्तनात ते बोलत होते. शेतातील सोयाबीनने माना टाकल्या. कापूस वाळायला लागला, तरी घरातील माणसांनी एकजुटीने व धीराने शेतकऱ्यांचे मनोबल वाढेल, निसर्गाच्या लहरीपणात शेतकऱ्यांना घरातील सदस्यांकडून खंबीर साथ मिळणे गरजेचे आहे. शेतीचे गणित तोट्यात असल्यामुळे इतर जोडधंद्यांची साथ द्या, व्यसनांपासून दूर राहा, असे आवाहन मधुकर महाराज खोडे यांनी केले. माणसाने दारू, मटका, गुटखा, चहा, बीडी, सिगरेट आदी व्यसनांचा त्याग केल्यास कुटुंबाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार असे त्यांनी सांगितले. यावेळी अनेकांनी महाराजांच्या झोळीत व्यसनांचे दान दिले. तसेच व्यसनांच्या आहारी जाणार नाही, अशी शपथ घेतली. कीर्तनाला बिटरगाव येथील भजनी मंडळाने साथसंगत केली. कार्यक्रमाला माजी आमदार विजय खडसे, वसंत साखर कारखान्याचे संचालक आनंदराव चिकणे, यवतमाळ अर्बनचे संचालक सुदर्शन कदम, नितीन माहेश्वरी, आदेश जैन, विलास देवसरकर आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी किसान गणेश मंडळ व महात्मा बसवेश्वर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)