शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शेतकरी पुत्राची विष घेऊन आत्महत्या

By admin | Updated: August 22, 2014 00:08 IST

सततची नापिकी आणि बँकेच्या कर्जाचा वाढता बोझा याला कंटाळून एका शेतकरी पूत्राने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना लगतच्या बेचखेडा येथे घडली. या घटनेने

बेचखेडा : कर्जापायी मृत्यूला कवटाळलेहिवरी : सततची नापिकी आणि बँकेच्या कर्जाचा वाढता बोझा याला कंटाळून एका शेतकरी पूत्राने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना लगतच्या बेचखेडा येथे घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. राजू रामेश्वर मडावी (३३) रा.बेचखेडा असे मृत शेतकरी पूत्राचे नाव आहे. सततच्या नापिकीने त्याच्या वडिलांवर पीक कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. त्यातच वडील आजारी पडल्याने ती जबाबदारी राजूवर येवून पडली. अशातच स्वत:चे आणि भावाचे लग्न कसे करायचे याची चिंता त्याला भेडसावत होती. काही दिवसांपूर्वी त्याने कर्जाचे पुनर्गठन करावे यासाठी बँकेकडे पाठपुरावा केला. मात्र कर्जाच्या पुनर्गठनाला बँकेने नकार दिला. त्यामुळे हताश होवून राजूने १७ आॅगस्टला दुपारी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच राजूच्या नातेवाईकांनी त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर बुधवारी २० आॅगस्टला त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर राजूचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. राजूच्या मागे वृद्ध आई, वडील आणि भाऊ असा आप्त परिवार आहे. राजूच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.शिवाय या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कर्ज पुनर्गठनास नकार देणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही मृत राजूच्या कुटुंबीयांनी केली आहे. (वार्ताहर)