शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

कीटकनाशकामुळे शेतकरी मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 22:37 IST

गजानन मारोती डोंगरे (वय 35, रा. उमरी पठार) असे मृताचे नाव आहे.

आर्णी(यवतमाळ) : शेतात कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा झाल्याने शेतकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना आर्णी तालुक्‍यातील उमरी (पठार) येथे घडली. यंदाच्या खरीप हंगामात कीटकनाशकामुळे आर्णी तालुक्यातील हा पहिला बळी ठरला आहे.

गजानन मारोती डोंगरे (वय 35, रा. उमरी पठार) असे मृताचे नाव आहे. वडिलांच्या नावे असलेल्या सात एकर कपाशी पिकावरील शेतात त्याने गुरुवारी 5 सप्टेंबरला कीटकनाशक फवारणी केली. फवारणी करून सायंकाळी घरी परतल्यावर गजाननला शुक्रवारी मळमळ होत उलटीचा त्रास सुरू झाला. त्याला तत्काळ आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याच दिवशी रात्री साडेदहाला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, तपासणी करताच डॉक्‍टरांनी गजाननला मृत घोषित केले. 

वडिलांच्या नावे असलेली सात एकर शेतीची वहिती करून गजानन कुटुंबाचा गाडा ओढत होता. मृताच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई-वडील, लहान भाऊ आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ