शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पुत्र ‘एजबार’

By admin | Updated: January 8, 2016 03:16 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. याच बँकेत आपल्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून शेतकरी हक्काने धडपड करतात.

जिल्हा बँक : साडेतीनशे जागांच्या प्रस्तावाला ‘प्रभारी’ंचा अडसरयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. याच बँकेत आपल्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून शेतकरी हक्काने धडपड करतात. मात्र ‘प्रभारी’ संचालक मंडळामुळे गेल्या तीन वर्षांपासून ३५० जागांच्या नोकर भरतीचा प्रस्ताव पडून आहे. पर्यायाने या बँकेतील बाबू होण्याच्या प्रतीक्षेत शेकडो शेतकऱ्यांची मुले ‘ऐजबार’ झाली आहेत. तर काही त्या उंबरठ्यावर आहेत. जिल्ह्यात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. जिल्हा परिषदेत तलाठी पदाच्या नुकत्याच झालेल्या भरतीत ही बाब सिद्ध झाली. एका जागेसाठी चक्क एक हजार उमेदवार अशी स्पर्धा तेथे पहायला मिळाली. आधीच जिल्ह्यात मोठे उद्योग नाहीत, पर्यायाने सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळविण्यासाठी घरापासून दूर महानगरात जावे लागते. आतापर्यंत शेतीवर गुजरान करणाऱ्या शेतकऱ्यांना ही शेती परवडेनासी झाली आहे. म्हणून कित्येक शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुलाला-मुलीला लिपिक किंवा चपराशी म्हणूनच का होईना नोकरीवर लावून देण्याचे स्वप्न पाहिले होते. कित्येकांनी त्यासाठी काळाची गरज ओळखून आर्थिक तडजोडही करुन ठेवली. मात्र गेल्या तीन वर्षात जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरभरतीच झाली नाही. बँकेने नाबार्डकडे ३५० जागांचा प्रस्तावही सादर केला. बँकेच्या नवीन शाखांचा विस्तार व निवृत्तीची संख्या पाहता या प्रस्तावात आणखी १०० जागांची भर पडण्याची शक्यता आहे. परंतु प्रभारी संचालक मंडळ आणि कोणत्याही क्षणी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचे कारण सांगून नाबार्डने नोकरभरतीचा हा प्रस्ताव नाकारला. मात्र या प्रस्तावावरुन तीन वर्षे लोटून गेली, ना निवडणूक झाली ना नोकरभरती होऊ शकली. या भरतीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांची कित्येक मुले वयातून (ऐजबार) बाद झाली आहे. ही भरती तत्काळ न झाल्यास आणखी शेकडो उमेदवार बाद होतील. मात्र ही भरती घेण्यासाठी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लागणे गरजेचे झाले आहे. कर्मचाऱ्यांची १५१ पदे रिक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकूण ३७३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ २२२ पदे कार्यरत आहेत. दरवर्षी होणारी सेवानिवृत्ती आणि नवी नोकर भरती न झाल्याने आजच्या घडीला तब्बल १५१ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये उपव्यवस्थापकांची तब्बल १४ पदे रिक्त आहेत. यातील केवळ एकच पद भरलेले आहे. व्यवस्थापकांचे २९, सहायक व्यवस्थापकाची ४०, तर वरिष्ठ लिपिकाच्या ६८ पदांचा समावेश आहे. नोकरभरती न झाल्याने सध्या कंत्राटी तत्त्वावर लिपिक व शिपायाची पदे भरून बँकेचे कामकाज चालविले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आता बँकेत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचाही वाद पुढे आला आहे. अपात्र असलेल्या संचालकांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना नियमबाह्यरीत्या पदोन्नती देण्याचा घाट घातला जात आहे. सेवा नियमाप्रमाणे पात्र कर्मचारींची परीक्षा घेवून त्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय २९ आॅक्टोबर २०१५ रोजी सेवक समितीच्या सभेत घेतला गेला होता. मात्र पदोन्नतीची प्रक्रिया संथगतीने होत आहे. बँकेत पात्र कर्मचारी असताना अपात्रांना पदोन्नती देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे. त्यात बँक प्रमुखाच्या एका नातेवाईकाचा पुढाकार असून त्याच्याकडून या प्रमुखाच्या नावाचा गैरवापरही अनेकदा केला जात असल्याचे सांगण्यात आले. पुन्हा गाडगीळांच्या संस्थेलाच पसंती ! या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा घेण्याची तयारी नागपूर येथील धनंजयराव गाडगीळ या संस्थेने दर्शविली आहे. विशेष असे, याच संस्थेने काही वर्षांपूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक व शिपाई पदासाठी घेतलेली भरती वादग्रस्त ठरली होती. या भरतीत अनेक गैरप्रकार पुढे आले होते. आता केवळ पात्र कर्मचाऱ्यांनाच परीक्षेनंतर बढती द्यावी, असा बँकेच्या यंत्रणेतील सूर आहे.