शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

शेतकऱ्यांनी कृषिपूरक व्यवसायाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:26 IST

पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने उत्पादन वाढीसाठी शेतकरी गटांनी निव्वळ बचत न करता आर्थिक उत्पन्न वाढीकरिता कृषिपूरक व्यवसाय सुरू करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ए.डी. जाधव यांनी केले.

ठळक मुद्देप्रशिक्षण : कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन, दिग्रसमध्ये समूह शेती प्रयोग

ऑनलाईन लोकमतदिग्रस : पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने उत्पादन वाढीसाठी शेतकरी गटांनी निव्वळ बचत न करता आर्थिक उत्पन्न वाढीकरिता कृषिपूरक व्यवसाय सुरू करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ए.डी. जाधव यांनी केले.येथील जिजामाता सभागृहात शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्यावेळी बोलताना जाधव म्हणाले, कृषी विभागातर्फे शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, कृषिमाल प्रक्रिया, पणन आदींवर लक्ष दिले जात आहे. त्याअनुषंगाने राबविण्यात येणाºया योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक डी.बी. काळे, जिल्हा रेशीम प्रकल्प अधिकारी बावगे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. नंदकिशोर हिवरे, डॉ. प्रशांत राऊत, कृषीभूषण गणेश मात्रे आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांची जमीन धारणा कमी होत असल्याने आधुनिक पद्धतीने काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकरी गटांना कृषिपूरक व्यवसायाकरिता सामूहिकरित्या दालमिल, अवजारे बँक, सेंद्रिय शेती, ग्राम बिजोत्पादन, कृषी निविष्टा विक्री केंद्र, प्रक्रिया उद्योग, प्रशिक्षण व अभ्यास दौरे, प्रात्याक्षीक आदी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गट शेतीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे शेतकरी गटांनी आता शेतकररी उत्पादक कंपनीकडे वाटचाल करावी, असे आत्माचे डी.बी. काळे यांनी केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे कृषी संवादिनीचे वाटप करण्यात आले. गुुलाबी बोंडअळी नियंत्रण व्यवस्थापन व उपाययोजना, उन्हाळी भूईमूग, तीळ पीक व्यवस्थापन, पेरणी ते काढणीपर्यंतचे मार्गदर्शन करण्यात आले. रामभाऊ मोर्शटवार, रवींद्र राऊत, रामेश्वर पवार, अमृत महिंद्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. आभार सागर बोंडे यांनी मानले.