शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी शेतात गाळ टाकून समृद्धीची गुढी उभारावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:56 IST

ऑनलाईन लोकमतघाटंजी : ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या महत्त्वाकांक्षी योजनेतून धरणातून सुपीक गाळ काढून शेतकऱ्यांनी तो आपल्या शेतात टाकून शेतीसमृद्धीची गुढी उभारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.तालुक्यातील सावरगड येथे तलावातील गाळ काढण्याच्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, शेतात गाळ टाकल्याने शेती उत्पादनात ...

ठळक मुद्देराजेश देशमुख : सावरगड येथे जलयुक्त शिवारअंतर्गत धरणातील गाळ उपसा कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतघाटंजी : ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या महत्त्वाकांक्षी योजनेतून धरणातून सुपीक गाळ काढून शेतकऱ्यांनी तो आपल्या शेतात टाकून शेतीसमृद्धीची गुढी उभारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.तालुक्यातील सावरगड येथे तलावातील गाळ काढण्याच्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, शेतात गाळ टाकल्याने शेती उत्पादनात वाढ होणार आहे. गाव क्षेत्रात पाणीसाठा वाढून पिण्याच्या पाण्याची समस्याही दूर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गुढीपाडव्याचे औचित्य साधून पंचायत समिती सदस्य सुनंदा भुजाडे यांच्या अध्यक्ष्यतेत सावरगड येथे गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात झाली. अस्मिता संस्था, यवतमाळ यांनी केअरिंग फ्रेंड्स मुंबई व विकासगंगा संस्था घाटंजी यांच्या सहकार्याने हे काम सुरू केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, यवतमाळचे तहसीलदार सचिन शेजाळ, सूरज शिंदे, रणजीत बोबडे, सरपंच हरिदास खडसे, उपसरपंच सुहास सरगर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. धरणांमध्ये दरवर्षी साठत असलेल्या गाळामुळे पाणी साठवणूक क्षमतेत घट होत आहे. हा गाळ उपसा करून शेतात टाकल्यास धरणांची मूळ साठवणूक क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होते, असे मत उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी व्यक्त केले. तहसीलदार सचिन शेजाळ, शिंदे, रणजीत बोबडे यांनीही मार्गदर्शन केले.सावरगड सिंचन तलावातून ४० हजार घनमीटर गाळ निघणार असून तो शेतात टाकण्याची तयारी शेतकऱ्यांनी दर्शविली. या कामाचा लाभ सावरगड परिसरातील पाच गावांतील शेतकºयांना होणार असल्याचे संगीता गायकवाड यांनी सांगितले. अमित गाडबैल, विनोद गुजलवार यांनी क्षेत्रीय प्रक्रिया पूर्ण केली.