शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी शेतात गाळ टाकून समृद्धीची गुढी उभारावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:56 IST

ऑनलाईन लोकमतघाटंजी : ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या महत्त्वाकांक्षी योजनेतून धरणातून सुपीक गाळ काढून शेतकऱ्यांनी तो आपल्या शेतात टाकून शेतीसमृद्धीची गुढी उभारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.तालुक्यातील सावरगड येथे तलावातील गाळ काढण्याच्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, शेतात गाळ टाकल्याने शेती उत्पादनात ...

ठळक मुद्देराजेश देशमुख : सावरगड येथे जलयुक्त शिवारअंतर्गत धरणातील गाळ उपसा कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतघाटंजी : ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या महत्त्वाकांक्षी योजनेतून धरणातून सुपीक गाळ काढून शेतकऱ्यांनी तो आपल्या शेतात टाकून शेतीसमृद्धीची गुढी उभारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.तालुक्यातील सावरगड येथे तलावातील गाळ काढण्याच्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, शेतात गाळ टाकल्याने शेती उत्पादनात वाढ होणार आहे. गाव क्षेत्रात पाणीसाठा वाढून पिण्याच्या पाण्याची समस्याही दूर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गुढीपाडव्याचे औचित्य साधून पंचायत समिती सदस्य सुनंदा भुजाडे यांच्या अध्यक्ष्यतेत सावरगड येथे गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात झाली. अस्मिता संस्था, यवतमाळ यांनी केअरिंग फ्रेंड्स मुंबई व विकासगंगा संस्था घाटंजी यांच्या सहकार्याने हे काम सुरू केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, यवतमाळचे तहसीलदार सचिन शेजाळ, सूरज शिंदे, रणजीत बोबडे, सरपंच हरिदास खडसे, उपसरपंच सुहास सरगर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. धरणांमध्ये दरवर्षी साठत असलेल्या गाळामुळे पाणी साठवणूक क्षमतेत घट होत आहे. हा गाळ उपसा करून शेतात टाकल्यास धरणांची मूळ साठवणूक क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होते, असे मत उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी व्यक्त केले. तहसीलदार सचिन शेजाळ, शिंदे, रणजीत बोबडे यांनीही मार्गदर्शन केले.सावरगड सिंचन तलावातून ४० हजार घनमीटर गाळ निघणार असून तो शेतात टाकण्याची तयारी शेतकऱ्यांनी दर्शविली. या कामाचा लाभ सावरगड परिसरातील पाच गावांतील शेतकºयांना होणार असल्याचे संगीता गायकवाड यांनी सांगितले. अमित गाडबैल, विनोद गुजलवार यांनी क्षेत्रीय प्रक्रिया पूर्ण केली.