शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 05:00 IST

जिल्ह्यात बियाणे आणि खतांची मुबलकता आहे. काही बियाणे उपलब्ध व्हायचे आहेत तर काही बियाणे पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित बियाणे उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. याशिवाय पेरणीचे नियोजन करण्यासाठी लागणारा पैसा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांमध्ये गर्दी केली आहे. प्रत्येक बँकेमध्ये ही गर्दी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी नेटवर्कचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

ठळक मुद्देकृषी विभागाचा इशारा : जोरदार पावसामुळे बियाणे दडपण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भात मान्सूनचे आगमन झाले आहे. प्रारंभीचा टप्पा मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटांसह आहे. अशा परिस्थितीत पेरणी केल्यास अतिपावसामुळे पेरण्या वाहून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे तूर्त १७ जूनपर्यंत पेरण्या थांबवाव्यात, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १३ जूनपर्यंत जोरदार पाऊस आणि वादळवारा राहणार आहे. यासोबतच विजाही पडतील असा अंदाज आहे. काही भागांमध्ये पाऊस जास्त सांगण्यात आला आहे तर काही भागांमध्ये कमी पाऊस आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पहिल्याच पावसात सर्वत्र दाणादाण पाहायला मिळत आहे. त्यामुळे पेरणीची घाई न करता शंभर मि.मी. पाऊस झाल्यानंतर योग्य ओलाव्यासह पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यामध्ये सध्या २४ हजार ४४० हेक्टरवर खरिपातील पेरण्या आटोपल्या आहे. त्यामध्ये ५५३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे तर १९ हजार ९०० हेक्टरवर कापसाची टोबणी झाली आहे. तीन हजार ९८७ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. एकूणच पेरणीच्या कामाला वेग आला आहे. यासोबतच पावसाचाही प्रचंड वेग आहे. त्यामुळे पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका आहे. शेतात पुरेशी ओल तयार झाल्यानंतर पेरणी केली तर त्याचा धोका होत नाही, पेरलेले बियाणे निघून येते. अतिपावसामध्ये या पेरण्या झाल्या तर त्या दडपण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधानता पाळीत तूर्त पेरण्या लांबाव्या, असा इशारा कृषी विभागाने हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिला आहे.जिल्ह्यात बियाणे आणि खतांची मुबलकता आहे. काही बियाणे उपलब्ध व्हायचे आहेत तर काही बियाणे पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित बियाणे उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. याशिवाय पेरणीचे नियोजन करण्यासाठी लागणारा पैसा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांमध्ये गर्दी केली आहे. प्रत्येक बँकेमध्ये ही गर्दी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी नेटवर्कचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे- जिल्ह्यामध्ये साडेचार लाख हेक्टरवर कापसाची लागवड होणार  आहे. त्यापैकी १९ हजार ९०० हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. सर्वाधिक लागवड कळंब तालुक्यात झाली आहे. यावरून कापसाचे लागवड क्षेत्र यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार १३ जूनपर्यंत विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज प्रत्येक ठिकाणी खरा ठरेल असे नाही. मात्र, शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेता १७ जूनपर्यंत पेरणी करणे टाळावे. त्यानंतर पेरणी करावी. या काळात तासी ३० ते ४० किलाेमीटर वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक, यवतमाळ

शेतकऱ्यांनी पुढील परतीच्या पावसाचा अंदाज घेत प्रथम कापसाची लागवड करावी, त्यानंतर सोयाबीनची लागवड करावी. लागवड करताना सोयाबीनच्या पेरणीसाठी घाई करू नये. प्रक्रिया करूनच बियाणे वापरावे.- डॉ. प्रमोद यादगीरवारसहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळ.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती