शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पीक कजार्साठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे

By admin | Updated: May 27, 2015 02:11 IST

दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांना कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर फटका बसला. उत्पन्न चांगले नसल्याने त्यांची स्थिती पीक कर्ज भरण्यासारखी नाही.

यवतमाळ : दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांना कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर फटका बसला. उत्पन्न चांगले नसल्याने त्यांची स्थिती पीक कर्ज भरण्यासारखी नाही. त्यामुळे शासनाने पीक कर्जाचे रुपांतरण केले आहे. गेल्या हंगामातील कर्जाचा एक पैसाही न भरलेल्या शेतकऱ्यांना रुपांतरण योजनेअंतर्गत पीक कर्ज मिळणार आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंग यांनी केले आहे. गेल्या खरीप हंगामात पाऊस समाधानकारक झाला नाही. जिल्ह्यावर दुष्काळी स्थिती ओढवली होती. अनेक शेतकऱ्यांना या दुष्काळाचा फटका बसला. उत्पन्न समाधानकारक न झाल्याने घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीमुळे शासनाने गेल्या वर्षातील २०१४-०१५ मधील पिककर्जाचे रुपांतरण केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना कर्जाचे पाच हप्ते पाडुन दिले जाणार आहे. पुढील पाच वर्षात हे हप्ते भरता येईल. या रुपांतरीत हप्त्यातील पहीला हप्ता या वर्षी भरायची गरज नाही. यावर्षी नव्याने घेतलेले कर्ज भरतांना पुढील वर्षी पहीला हप्ता भरण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानंतरचे चार हप्ते पुढे भरता येईल. पीक कर्जाबाबत नुकतीच सर्व बँकांच्या शाखा व्यवस्थापकांची बैठक घेवून खरीप पीक कर्जाचा आढावा घेतला. (कार्यालय प्रतिनिधी)