शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

खरिपात शेतकऱ्यांचे हाल

By admin | Updated: June 19, 2016 02:24 IST

नैसर्गिक आपत्ती व दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऐन खरीप हंगामात तगमग सुरू आहे. बी-बियाणे घेण्याकरिताही त्यांच्याकडे पैसा नाही.

बियाणांची सोय नाही : दुष्काळी स्थितीमुळे चारा डेपोची गरजपुसद : नैसर्गिक आपत्ती व दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऐन खरीप हंगामात तगमग सुरू आहे. बी-बियाणे घेण्याकरिताही त्यांच्याकडे पैसा नाही. त्यामुळे पीककर्जाचे तातडीने पुनर्गठन करून चारा डेपो सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. शासनाकडून यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाला. परंतु अद्यापपर्यंत सन २०१० ते १३-१४ पर्यंतच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी गांजला आहे. तो आर्थिक हलाखीचा सामना करीत आहे. त्यामुळे शासनाने केवळ एक-दोन वर्षाचे नव्हे तर मागील पाच वर्षातील पीककर्जाचे पुनर्गठन करण्याची नितांत आवश्यकता आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता शासनाने चारा डेपो सुरू करण्याची गरज होती. परंतु त्या दृष्टीने हालचाली झालेल्या नाही. जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने दुभत्या जनावरांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहे. एकीकडे खरीप हंगामात लागवड कशी करावी, या चिंतेत शेतकरी असताना पीक विम्याची रक्कम कर्जात कपात केली जात आहे. प्रशासनाकडून या प्रकारे शेतकऱ्यांवर दुहेरी वार केला जात आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी मिळालेली पीक विम्याची २७ कोटींची रक्कम कर्जात कपात न करता तत्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्याची गरज आहे. या मागण्यापूर्ण झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. (प्रतिनिधी)दोन संघटनांनी उठविला आवाजकर्जाचे पुनर्गठन करावे, चारा डेपो सुरू करावा, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावी या मागणीसाठी दोन संघटनांनी आवाज उठविला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण पुलाते, विश्वजीत लांडगे, भारत वानखेडे, कपिल आबाळे, रवी तायडे, महादेव तोडकर, दिनेश ठाकूर, सुभाष कांगळे, अवधूत मस्के, राजाभाऊ डहाके, अवधूत शेळके, संजय बोटवारे आदींनी या संदर्भात तहसीलदार डॉ.संजय गरकल यांना शनिवारी निवेदन दिले. तर परिवर्तन सामाजिक संघटनेचे बळवंत मनवर, रिपब्लिकन सेना प्रमुख संजय इंगोले, आनंद कांबळे, संतोष अंभोरे, बाबुराव वाघमारे, सुनील पवार, ओंकार राठोड, तुकाराम राठोड, विजय पवार, दिलीप घाटे, प्रभाकर खंदारे, शेषराव डाखोरे, रामजी पाईकराव, लक्ष्मी खंदारे, कमल कांबळे, प्रमोद राऊत, भगवान धुळे, सारंग आडसर, शुभम देवकुळे, भारत साठे, सुनील दवने, अविनाश आखरे आदींनी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांना निवेदन दिले.