शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

खरिपात शेतकऱ्यांचे हाल

By admin | Updated: June 19, 2016 02:24 IST

नैसर्गिक आपत्ती व दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऐन खरीप हंगामात तगमग सुरू आहे. बी-बियाणे घेण्याकरिताही त्यांच्याकडे पैसा नाही.

बियाणांची सोय नाही : दुष्काळी स्थितीमुळे चारा डेपोची गरजपुसद : नैसर्गिक आपत्ती व दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऐन खरीप हंगामात तगमग सुरू आहे. बी-बियाणे घेण्याकरिताही त्यांच्याकडे पैसा नाही. त्यामुळे पीककर्जाचे तातडीने पुनर्गठन करून चारा डेपो सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. शासनाकडून यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाला. परंतु अद्यापपर्यंत सन २०१० ते १३-१४ पर्यंतच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी गांजला आहे. तो आर्थिक हलाखीचा सामना करीत आहे. त्यामुळे शासनाने केवळ एक-दोन वर्षाचे नव्हे तर मागील पाच वर्षातील पीककर्जाचे पुनर्गठन करण्याची नितांत आवश्यकता आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता शासनाने चारा डेपो सुरू करण्याची गरज होती. परंतु त्या दृष्टीने हालचाली झालेल्या नाही. जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने दुभत्या जनावरांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहे. एकीकडे खरीप हंगामात लागवड कशी करावी, या चिंतेत शेतकरी असताना पीक विम्याची रक्कम कर्जात कपात केली जात आहे. प्रशासनाकडून या प्रकारे शेतकऱ्यांवर दुहेरी वार केला जात आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी मिळालेली पीक विम्याची २७ कोटींची रक्कम कर्जात कपात न करता तत्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्याची गरज आहे. या मागण्यापूर्ण झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. (प्रतिनिधी)दोन संघटनांनी उठविला आवाजकर्जाचे पुनर्गठन करावे, चारा डेपो सुरू करावा, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावी या मागणीसाठी दोन संघटनांनी आवाज उठविला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण पुलाते, विश्वजीत लांडगे, भारत वानखेडे, कपिल आबाळे, रवी तायडे, महादेव तोडकर, दिनेश ठाकूर, सुभाष कांगळे, अवधूत मस्के, राजाभाऊ डहाके, अवधूत शेळके, संजय बोटवारे आदींनी या संदर्भात तहसीलदार डॉ.संजय गरकल यांना शनिवारी निवेदन दिले. तर परिवर्तन सामाजिक संघटनेचे बळवंत मनवर, रिपब्लिकन सेना प्रमुख संजय इंगोले, आनंद कांबळे, संतोष अंभोरे, बाबुराव वाघमारे, सुनील पवार, ओंकार राठोड, तुकाराम राठोड, विजय पवार, दिलीप घाटे, प्रभाकर खंदारे, शेषराव डाखोरे, रामजी पाईकराव, लक्ष्मी खंदारे, कमल कांबळे, प्रमोद राऊत, भगवान धुळे, सारंग आडसर, शुभम देवकुळे, भारत साठे, सुनील दवने, अविनाश आखरे आदींनी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांना निवेदन दिले.