शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
2
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
3
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
4
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
5
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
6
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
7
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
8
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
9
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
10
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
11
बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; नितीश कुमार अन् भाजपाने पुन्हा केली जबरदस्त कमाल
12
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
13
टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
14
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
15
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! ५ विकेट्सचा डाव साधत सेट केले अनेक विक्रम
16
भरला संसार विस्कटून टाकला! आधी पत्नी अन् तीन मुलांना संपवलं; नंतर स्वतःचाही जीव घेतला
17
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
18
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
19
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
20
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या गोंधळात शेतकरी कर्जास मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 01:01 IST

कर्जमाफीच्या गोंधळात जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख शेतकरी खरीप पीक कर्जाला मुकल्याचे वास्तव बँकांनी वितरित केलेल्या कर्जाच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे.

ठळक मुद्देसाडेतीन लाख शेतकरी : आता नवीन कर्ज पुढील वर्षी

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफीच्या गोंधळात जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख शेतकरी खरीप पीक कर्जाला मुकल्याचे वास्तव बँकांनी वितरित केलेल्या कर्जाच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे. तीन लाख ९९ हजार ६६८ शेतकºयांना १८३६ कोटी रुपये कर्ज वितरणाचे उद्दीष्ट असताना बँकांनी प्रत्यक्षात ५९ हजार १६० शेतकºयांना ४८५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. आता या शेतकºयांना नवीन कर्जासाठी पुढील वर्षाचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकºयांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली. शासनाने शेतकºयांच्या आंदोलनानंतर कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अद्यापपर्यंत या कर्जमाफीचा गोंधळ संपायचे नाव घेत नाही. शेतकºयांच्या खात्यात कर्जाची रक्कम अद्यापही पडली नाही. परंतु या दरम्यान निर्माण झालेल्या गोंधळात अनेक बँकांनी शेतकºयांचे पीक कर्ज वितरितच केले नाही. सहकार विभागाने जिल्ह्यातील पीक कर्जाच्या स्थितीचा अहवाल नुकताच तयार केला. त्यात ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी वितरित केलेल्या कर्जाची आकडेवारी दिली आहे. यातून जिल्ह्यातील केवळ २६ टक्के शेतकºयांनाच खरीप हंगामात कर्ज मिळाल्याचे दिसून येते.यवतमाळ जिल्ह्यात तीन लाख ९९ हजार ६६८ शेतकºयांना कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. त्यांना १८३६ कोटी ३१ लाख रुपये कर्ज देण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात बँकांनी ५९ हजार १६० शेतकºयांना ४८५ कोटी ७४ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. सुमारे ७४ टक्के कर्जवाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात बँका असमर्थ ठरल्या. यातही राष्टÑीयकृत बँकांनी आपला हात आखडता घेतला. जिल्ह्यातील १७ राष्टÑीयकृत बँकांनी १४ टक्के कर्जाचे वितरण केले. त्यात चार राष्टÑीयकृत बँकांनी केवळ पाच ते दहा टक्केच कर्ज वितरित केले. प्रत्यक्षात १७ राष्टÑीयकृत बँकांनी १७१ कोटी ५२ लाख रुपयांचेच कर्ज शेतकºयांना दिले. बँक आॅफ इंडियाने केवळ पाच टक्के, इंडियन ओव्हरसीस बँकेने ९ टक्के तर युको आणि युबीआय बँकेने केवळ सहा टक्के कर्ज वितरित केले.सर्वाधिक कर्जमाफीचा गोंधळ जिल्हा बँकेला सोसावा लागला. त्याउपरही या बँकेने ५४ टक्के शेतकºयांना कर्जाचे वितरण केले. यामुळे बहुतांश शेतकºयांना दिलासा मिळाला. परंतु राष्टÑीयकृत बँकांवर अवलंबून राहणाºया शेतकºयांना मात्र कर्जास मुकावे लागले. ऐन हंगामात कर्ज न मिळाल्याने शेतकºयांना सावकाराच्या दारात जावे लागले. आता धान्य माल घरी येत असताना सावकार वसुलीसाठी तगादा लावत आहे. एकंदरित कर्जमाफीचा फायदा अद्याप झाला नसलातरी कर्जाला मुकल्याचे दिसत आहे. आता नवीन कर्जासाठी पुढील वर्षीचीच प्रतीक्षा करणेच शेतकºयांच्या नशिबी आहे.केवळ दोन हजार शेतकºयांनाच दहा हजारांची मदतशासनाने कर्जमाफीची घोषणा करताना शेतकºयांना खरीप हंगाम पेरणीसाठी तत्काळ दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात यवतमाळ जिल्ह्यातील दोन हजार १५९ शेतकºयांनाच दहा हजार रुपयांचे कर्ज मिळाले. दहा हजार रुपये आज-उद्या मिळतील या आशेवर शेतकरी होते. परंतु शासनाच्या घोषणेनंतरही हजारो शेतकरी दहा हजार रुपयालाही मुकले.