शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कृषीपंप चोरट्यांची शेतकऱ्यांत दहशत

By admin | Updated: November 6, 2014 02:20 IST

यवतमाळ उपविभागात केवळ एका वर्षाच्या कालावधीत तब्बल दोन हजारांवर कृषी पंप चोरीस गेले. स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये या घटनांची नोंदही घेण्यात आली.

शिवानंद लोहिया हिवरीयवतमाळ उपविभागात केवळ एका वर्षाच्या कालावधीत तब्बल दोन हजारांवर कृषी पंप चोरीस गेले. स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये या घटनांची नोंदही घेण्यात आली. मात्र एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागला नाही. मोटरपंप चोरणारे रॅकेटच जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये सक्रीय आहे. ते मोटरपंपाबरोबर केबल, सिंचनासाठी ठेवलेले पाईप याच साहित्यावर डल्ला मारत असल्याचेही अनेक घटनांवरून दिसून येते. असे असताना ग्रामीण भागात पोलिसांची नेमकी गस्त होते कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.यवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरात मोटरपंप चोरणाऱ्या रॅकेटमुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. आठ दिवसांपूर्वी येथील एका शेतकऱ्याचे मोटरपंप चोरीस गेल्याचे लक्षात आले. मात्र कोर्टकचेरीच्या भानगडीत कोण पडेल म्हणून त्याने याची पोलिसात तक्रार केली नाही. शेतामधील मोटरपंप चोरण्यापूर्वी जिवंत विद्युत पुरवठ्याची केबल तोडायची, त्यानंतर एका साथीदाराला विहिरीत उतरवून दोराच्या सहाय्याने ही मोटर बाहेर काढायची. त्यानंतर शेताच्या बाहेर ठेवलेल्या दुचाकीवरून ती लंपास करायची, अशी या चोरट्यांची मोडस आॅपरेंडी आहे. मोटरपंपाबरोबरच स्प्रिंकलर पाईप, नोझल, वीज पुरवठ्याची केबल, रोहित्रातील आॅईल आदी साहित्यही हे चोरटे लक्ष्य करीत आहेत. आता तर गोठ्यातील जनावरे चोरून नेण्याचाही सपाटा त्यांनी चालविला आहे. अत्यल्प पर्जन्यमानाने पिके धोक्यात येतात. गेल्या काही वर्षात दरवर्षीच ही परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेकांनी कर्ज करून, पोटाला चिमटा घेवून एकेक पैसा गोळा करीत सिंचनाचे साहित्य खरेदी केले.