शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

बळकावलेल्या शेतजमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार

By admin | Updated: July 1, 2015 00:23 IST

अवैध सावकार तारण म्हणून शेतकऱ्यांकडून शेतजमिनी लिहून घेतात.

तक्रार नोंदवा : कर्मचारी सावकारी करीत असल्यास कारवाई यवतमाळ : अवैध सावकार तारण म्हणून शेतकऱ्यांकडून शेतजमिनी लिहून घेतात. कालांतराने या जमिनी आपल्या नावे करून घेत असल्याचे आढळून आले आहे. अवैध सावकारीत एखाद्या सावकाराने अशाप्रकारची जमीन हडपली असल्यास ती जमीन शेतकऱ्यांना परत देण्याची तरतूद सावकारी कायद्यात आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या अशा शेतकऱ्यांनी सहकार विभाग किंवा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे मंगळवारी अवैध सावकारीबाबत प्राप्त तक्रारींचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आवाहन केले. बैठकीला अपर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.के.ए.डोळे, जिल्हा उपनिबंधक जितेंद्र कंडारे यांच्यासह सर्व तालुक्यातील सहकारचे सहाय्यक निबंधक उपस्थित होते.शासनाने अवैध सावकारीवर प्रतिबंध घातला आहे. असे सावकार शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर व्याजाची वसुली करून त्यांची फसवणूक करतात. तसेच त्यांनी तारण म्हणून ठेवलेल्या वस्तुंसह शेतजमीनी हडप करीत असल्याचे अनेक प्रकार जिल्ह्यासह राज्यात उघडकीस आले आहेत. जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून अशा सावकारांनी शेतजमीनी खरेदी करून घेतल्या असल्यास त्या जमीनी शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याबाबत चर्चा झाली. महाराष्ट्र सावकारी अधिनियमामध्ये अशा जमिनी सावकारी व्यवहारात खरेदी करून घेतल्या असल्यास सदर जमिनी शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याची स्पष्ट तरतूद आहे. विशेष म्हणजे गेल्या १५ वर्षातील झालेल्या व्यवहारांचाही यात समावेश आहे. त्यामुळे यादरम्यान एखाद्या सावकाराने शेतकऱ्याची जमीन घेतली असल्यास संबंधीत शेतकऱ्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधक, जिल्हास्तरावर उपनिबंधक किंवा थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.महसूल भवन येथे झालेल्या बैठकीत गावपातळीवर काही शासकीय कर्मचारीही अवैध सावकारीचा व्यवसाय करीत असल्याची बाब मांडण्यात आली. कर्मचाऱ्यांकडून अशी सावकारी आढळून आल्यास सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे कडक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. (प्रतिनिधी)शोध व जप्ती मोहीमसहकार कायद्यान्वये सावकारीच्या सहायक निबंधकांना तक्रार प्राप्त झाल्यास थेट संबंधित सावकाराची झडती घेऊन दस्तऐवज ताब्यात घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे तक्रारी प्राप्त झाल्यास तातडीने कार्यवाही केली जावी. तसेच अवैध सावकारीबाबत शोध व जप्ती मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. तसेच दर १५ दिवसांतून अवैध सावकारीबाबत प्राप्त तक्रारींचा आढावा घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व सबंधितांना केल्या.