शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

शेतकऱ्यांनो लगेच पेरणी करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

सध्या मान्सून केरळपर्यंतच मर्यादित आहे. राज्याकडे त्याने वाटचाल केली नाही. मान्सून मुंबईत आल्यानंतर विदर्भात येतो. सध्या ही प्रक्रिया रेंगाळली आहे. मुबलक पाऊस झाल्यानंतरच जमिनीतील उष्णता बाहेर पडते. पुढील काळात अधिक पाऊस वर्तविण्यात आला आहे. यामुळे कापसाची लवकर लागवड केली तर कापसाला बोंडसडीचाही धोका आहे. मान्सूनपूर्व लागवडीने गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भीती आहे.

ठळक मुद्देकृषितज्ज्ञांचा सल्ला : पावसाला पडणार खंड

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मान्सूनपूर्व पावसाच्या अंदाजावर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहे. हा पाऊस मान्सूनचा नसल्याने मध्ये मोठा खंड आहे. अशा स्थितीत झालेली टोबणी उलटण्याचा धोका आहे. यामुळे तूर्त शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवाव्या, असा सल्लापेरणी करण्यासाठी किमान १०० मिमी पावसाची गरज असते. १०० मिमी पाऊस बरसल्यानंतर केलेली पेरणी पावसाचा विलंब झाला तरी सुरक्षित अंकुरते. मात्र जिल्ह्यात जेमतेम १६ मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने ११ जूनपर्यंत पावसाचा खंड सांगितला आहे. या काळात उन तापणार आहे. यामुळे अंकुरलेले बियाणे अपुऱ्या पावसाने करपण्याचा अधिक धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी घाई करू नये. १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.सध्या मान्सून केरळपर्यंतच मर्यादित आहे. राज्याकडे त्याने वाटचाल केली नाही. मान्सून मुंबईत आल्यानंतर विदर्भात येतो. सध्या ही प्रक्रिया रेंगाळली आहे. मुबलक पाऊस झाल्यानंतरच जमिनीतील उष्णता बाहेर पडते. पुढील काळात अधिक पाऊस वर्तविण्यात आला आहे. यामुळे कापसाची लवकर लागवड केली तर कापसाला बोंडसडीचाही धोका आहे. मान्सूनपूर्व लागवडीने गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भीती आहे.सध्याचा पाऊस मान्सूनपूर्व आहे. चक्रीवादळाने त्यात भर घातली. हा पाऊस पेरणीचा समजून काहींनी पेरणीला सुरूवात केली. मुळात हा पाऊस मान्सूनचा नाही. त्याला १७ जूनपर्यंत विलंब आहे. तूर्त शेतकऱ्यांनी पेरणी करू नये.- पंकज बर्डे, प्रभारी, कृषी विकास अधिकारी, यवतमाळमान्सूनपूर्व कपाशीची लागवड शेतकऱ्यांना संकटात टाकणारी ठरू शकते. पावसाचा खंड असल्याने पेरणी उलटू शकते. यामुळे तूर्त शेतकºयांनी पेरणी थांबवावी. जांभुळवाई करून १०० मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी.- डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संचालक (संशोधन) केव्हीके, यवतमाळ.वेधशाळेने ११ जूनपर्यंत पावसात खंड सांगितला आहे. शेतशिवारात १६ मिमी पावसाची नोंद आहे. अशा स्थितीत पेरणी करणे धोक्याचे आहे. १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी.- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक, यवतमाळ

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती