शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो लगेच पेरणी करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

सध्या मान्सून केरळपर्यंतच मर्यादित आहे. राज्याकडे त्याने वाटचाल केली नाही. मान्सून मुंबईत आल्यानंतर विदर्भात येतो. सध्या ही प्रक्रिया रेंगाळली आहे. मुबलक पाऊस झाल्यानंतरच जमिनीतील उष्णता बाहेर पडते. पुढील काळात अधिक पाऊस वर्तविण्यात आला आहे. यामुळे कापसाची लवकर लागवड केली तर कापसाला बोंडसडीचाही धोका आहे. मान्सूनपूर्व लागवडीने गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भीती आहे.

ठळक मुद्देकृषितज्ज्ञांचा सल्ला : पावसाला पडणार खंड

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मान्सूनपूर्व पावसाच्या अंदाजावर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहे. हा पाऊस मान्सूनचा नसल्याने मध्ये मोठा खंड आहे. अशा स्थितीत झालेली टोबणी उलटण्याचा धोका आहे. यामुळे तूर्त शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवाव्या, असा सल्लापेरणी करण्यासाठी किमान १०० मिमी पावसाची गरज असते. १०० मिमी पाऊस बरसल्यानंतर केलेली पेरणी पावसाचा विलंब झाला तरी सुरक्षित अंकुरते. मात्र जिल्ह्यात जेमतेम १६ मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने ११ जूनपर्यंत पावसाचा खंड सांगितला आहे. या काळात उन तापणार आहे. यामुळे अंकुरलेले बियाणे अपुऱ्या पावसाने करपण्याचा अधिक धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी घाई करू नये. १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.सध्या मान्सून केरळपर्यंतच मर्यादित आहे. राज्याकडे त्याने वाटचाल केली नाही. मान्सून मुंबईत आल्यानंतर विदर्भात येतो. सध्या ही प्रक्रिया रेंगाळली आहे. मुबलक पाऊस झाल्यानंतरच जमिनीतील उष्णता बाहेर पडते. पुढील काळात अधिक पाऊस वर्तविण्यात आला आहे. यामुळे कापसाची लवकर लागवड केली तर कापसाला बोंडसडीचाही धोका आहे. मान्सूनपूर्व लागवडीने गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भीती आहे.सध्याचा पाऊस मान्सूनपूर्व आहे. चक्रीवादळाने त्यात भर घातली. हा पाऊस पेरणीचा समजून काहींनी पेरणीला सुरूवात केली. मुळात हा पाऊस मान्सूनचा नाही. त्याला १७ जूनपर्यंत विलंब आहे. तूर्त शेतकऱ्यांनी पेरणी करू नये.- पंकज बर्डे, प्रभारी, कृषी विकास अधिकारी, यवतमाळमान्सूनपूर्व कपाशीची लागवड शेतकऱ्यांना संकटात टाकणारी ठरू शकते. पावसाचा खंड असल्याने पेरणी उलटू शकते. यामुळे तूर्त शेतकºयांनी पेरणी थांबवावी. जांभुळवाई करून १०० मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी.- डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संचालक (संशोधन) केव्हीके, यवतमाळ.वेधशाळेने ११ जूनपर्यंत पावसात खंड सांगितला आहे. शेतशिवारात १६ मिमी पावसाची नोंद आहे. अशा स्थितीत पेरणी करणे धोक्याचे आहे. १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी.- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक, यवतमाळ

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती