शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

शेतकरी आत्महत्येचे राजकारण करू नका

By admin | Updated: September 24, 2015 03:02 IST

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे राजकारण करू नका, असा फलक बुधवारी पिंपरी गावाच्या वेशीवरच ग्रामस्थांनी लावला होता.

ग्रामस्थांनी लावले फलक : वेगळ्या विदर्भाचीही केली मागणीयवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे राजकारण करू नका, असा फलक बुधवारी पिंपरी गावाच्या वेशीवरच ग्रामस्थांनी लावला होता. निमित्त होते राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या दौऱ्याचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेल्या पिंपरी बुटी याच गावाला पवारांनीसुद्धा बुधवारी भेट दिली. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे केवळ राजकारण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला. यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्येचे मूळ कारण शोधण्यासाठी माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी पिंपरी बुटी गावाला भेट देऊन सर्वसामान्य नागरिकांसोबत संवाद साधला. तसेच शेतकरी, शेतमजुरांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी त्यांच्याकडे वेगळ्या विदर्भाची मागणी करून तसे फलक त्यांना दाखविले. यवतमाळ जिल्हा दौऱ्यात पिंप्री बुटीसह, भांब राजा आणि बोथबोडन या गावांनाही भेट देऊन पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पिंप्री येथे ग्रामपंचायतने लावलेल्या फलकावर शरद पवारांना शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी कापलेल्या शेअर्सची ४ टक्के रक्कम अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळाली नाही, ही रक्कम परत देण्याची मागणी करण्यात आली. सरकारने कापूस एकाधिकार योजनेत कपात केलेली तीन टक्के रक्कम परत मिळावी, त्यानंतर आत्महत्या थांबतील अशा सुचनांचे फलक लखनसिंह ठाकूर, प्रफुल बोबडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी आपल्या नावांसह लावले होते. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी वेगळया विदर्भाशिवाय पर्याय नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव देण्यात यावा याही मागण्या करण्यात आल्या. चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यांप्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन स्वामिनीच्या नेतृत्वात महिलांनी शरद पवारांकडे सादर केले. यावेळी महेश पवार, प्रज्ञा चौधरी, नितीन कापसे, अंजली चिलोरकर, मनिषा काटे, रिना घावडे, प्रशांत उगले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक असताना ६० टक्के आणेवारी जाहीर करण्यात आली, ही आणेवारी चुकीची आहे. याबाबत शरद पवारांनी स्वत: लक्ष घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.बोथबोडन येथील शेतकऱ्यांनी शरद पवार यांना आपले गाव दत्तक घ्यावे, अशी मागणी केली. यावेळी शरद पवार यांनी ही मागणी फेटाळून लावली. यामुळे ग्रामस्थांची निराशा झाली. त्यांच्या नाराजीचा सूरही व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)