शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

शेतकरी आत्महत्येचे राजकारण करू नका

By admin | Updated: September 24, 2015 03:02 IST

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे राजकारण करू नका, असा फलक बुधवारी पिंपरी गावाच्या वेशीवरच ग्रामस्थांनी लावला होता.

ग्रामस्थांनी लावले फलक : वेगळ्या विदर्भाचीही केली मागणीयवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे राजकारण करू नका, असा फलक बुधवारी पिंपरी गावाच्या वेशीवरच ग्रामस्थांनी लावला होता. निमित्त होते राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या दौऱ्याचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेल्या पिंपरी बुटी याच गावाला पवारांनीसुद्धा बुधवारी भेट दिली. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे केवळ राजकारण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला. यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्येचे मूळ कारण शोधण्यासाठी माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी पिंपरी बुटी गावाला भेट देऊन सर्वसामान्य नागरिकांसोबत संवाद साधला. तसेच शेतकरी, शेतमजुरांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी त्यांच्याकडे वेगळ्या विदर्भाची मागणी करून तसे फलक त्यांना दाखविले. यवतमाळ जिल्हा दौऱ्यात पिंप्री बुटीसह, भांब राजा आणि बोथबोडन या गावांनाही भेट देऊन पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पिंप्री येथे ग्रामपंचायतने लावलेल्या फलकावर शरद पवारांना शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी कापलेल्या शेअर्सची ४ टक्के रक्कम अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळाली नाही, ही रक्कम परत देण्याची मागणी करण्यात आली. सरकारने कापूस एकाधिकार योजनेत कपात केलेली तीन टक्के रक्कम परत मिळावी, त्यानंतर आत्महत्या थांबतील अशा सुचनांचे फलक लखनसिंह ठाकूर, प्रफुल बोबडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी आपल्या नावांसह लावले होते. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी वेगळया विदर्भाशिवाय पर्याय नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव देण्यात यावा याही मागण्या करण्यात आल्या. चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यांप्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन स्वामिनीच्या नेतृत्वात महिलांनी शरद पवारांकडे सादर केले. यावेळी महेश पवार, प्रज्ञा चौधरी, नितीन कापसे, अंजली चिलोरकर, मनिषा काटे, रिना घावडे, प्रशांत उगले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक असताना ६० टक्के आणेवारी जाहीर करण्यात आली, ही आणेवारी चुकीची आहे. याबाबत शरद पवारांनी स्वत: लक्ष घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.बोथबोडन येथील शेतकऱ्यांनी शरद पवार यांना आपले गाव दत्तक घ्यावे, अशी मागणी केली. यावेळी शरद पवार यांनी ही मागणी फेटाळून लावली. यामुळे ग्रामस्थांची निराशा झाली. त्यांच्या नाराजीचा सूरही व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)