शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शेतकरी आत्महत्येचे राजकारण करू नका

By admin | Updated: September 24, 2015 03:02 IST

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे राजकारण करू नका, असा फलक बुधवारी पिंपरी गावाच्या वेशीवरच ग्रामस्थांनी लावला होता.

ग्रामस्थांनी लावले फलक : वेगळ्या विदर्भाचीही केली मागणीयवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे राजकारण करू नका, असा फलक बुधवारी पिंपरी गावाच्या वेशीवरच ग्रामस्थांनी लावला होता. निमित्त होते राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या दौऱ्याचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेल्या पिंपरी बुटी याच गावाला पवारांनीसुद्धा बुधवारी भेट दिली. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे केवळ राजकारण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला. यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्येचे मूळ कारण शोधण्यासाठी माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी पिंपरी बुटी गावाला भेट देऊन सर्वसामान्य नागरिकांसोबत संवाद साधला. तसेच शेतकरी, शेतमजुरांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी त्यांच्याकडे वेगळ्या विदर्भाची मागणी करून तसे फलक त्यांना दाखविले. यवतमाळ जिल्हा दौऱ्यात पिंप्री बुटीसह, भांब राजा आणि बोथबोडन या गावांनाही भेट देऊन पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पिंप्री येथे ग्रामपंचायतने लावलेल्या फलकावर शरद पवारांना शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी कापलेल्या शेअर्सची ४ टक्के रक्कम अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळाली नाही, ही रक्कम परत देण्याची मागणी करण्यात आली. सरकारने कापूस एकाधिकार योजनेत कपात केलेली तीन टक्के रक्कम परत मिळावी, त्यानंतर आत्महत्या थांबतील अशा सुचनांचे फलक लखनसिंह ठाकूर, प्रफुल बोबडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी आपल्या नावांसह लावले होते. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी वेगळया विदर्भाशिवाय पर्याय नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव देण्यात यावा याही मागण्या करण्यात आल्या. चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यांप्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन स्वामिनीच्या नेतृत्वात महिलांनी शरद पवारांकडे सादर केले. यावेळी महेश पवार, प्रज्ञा चौधरी, नितीन कापसे, अंजली चिलोरकर, मनिषा काटे, रिना घावडे, प्रशांत उगले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक असताना ६० टक्के आणेवारी जाहीर करण्यात आली, ही आणेवारी चुकीची आहे. याबाबत शरद पवारांनी स्वत: लक्ष घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.बोथबोडन येथील शेतकऱ्यांनी शरद पवार यांना आपले गाव दत्तक घ्यावे, अशी मागणी केली. यावेळी शरद पवार यांनी ही मागणी फेटाळून लावली. यामुळे ग्रामस्थांची निराशा झाली. त्यांच्या नाराजीचा सूरही व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)