शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

विषाची बॉटल घेऊन शेतकरी जिल्हा कचेरीत

By admin | Updated: May 2, 2017 00:01 IST

शेताच्या धुऱ्याचा वाद तक्रार करूनही सुटत नसल्याने उद्विग्न झालेल्या बाभूळगाव तालुक्यातील वृद्ध शेतकऱ्याने विषाची बॉटल घेऊन थेट जिल्हा कचेरीत प्रवेश केला.

धुऱ्याचा वाद : बंदोबस्तावरील पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळलायवतमाळ : शेताच्या धुऱ्याचा वाद तक्रार करूनही सुटत नसल्याने उद्विग्न झालेल्या बाभूळगाव तालुक्यातील वृद्ध शेतकऱ्याने विषाची बॉटल घेऊन थेट जिल्हा कचेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र दिनाच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. गत पाच दिवसात चौघांनी जिल्हाधिकारी कक्षासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील एकाचा मृत्यू झाला. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे प्रशासनाची चांगलीच पाचावरधारण बसली आहे. पंजाबराव शामराव थाळे (८७) रा. सौजना ता. बाभूळगाव असे विषाची बॉटल घेऊन जिल्हा कचेरीत पोहोचलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची बाभूळगाव तालुक्यातील सीमेवरील कासारखेड शिवारात पाच एकर शेती आहे. लगतच्या शेतकऱ्याने त्यांच्या धुऱ्यावरील कडूनिंबाचे झाड तोडून अतिक्रमण केले. तसेच त्यांच्या शेताचा बांधही फोडला. या प्रकाराची तक्रार पंजाबरावने प्रशासनाकडे केली. परंतु कोणतीच कारवाई झाली नाही. दरम्यान महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा कचेरीत लोकशाही दिन असतो. याची त्यांना माहिती होती. त्यामुळे ते सोमवारी सकाळी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. मात्र महाराष्ट्र दिन असल्याने शासकीय सुटी होती. मात्र महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विविध आंदोलने होणार हे गृहित धरुन जिल्हा कचेरीसमोर सोमवारी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. पंजाबराव तेथे पोहोचताच बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी आपबिती सांगितली. पोलिसांना संशय बळावला. त्यामुळे त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या पिशवीत विषाची बॉटल आढळून आली. विषाची बॉटल दिसताच पोलीस सतर्क झाले. त्यांनी तत्काळ पंजाबराव घेऊन शहर ठाणे गाठले. तेथे त्यांची समजूत काढण्यात आली. विषाची बॉटल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या वृद्ध शेतकऱ्याच्या विरोधात मुंबई पोलीस कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय आत्महत्या न करण्याचे हमीपत्रही घेण्यात आले. लागोपाठ विष प्राशनाच्या घटना जिल्हा कचेरीत घडत असल्याने प्रशासनाची पाचावर धारण बसली आहे. सोमवारी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला. (कार्यालय प्रतिनिधी) पाच दिवसातील तिसरी घटना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी घडलेली तिसरी घटना होय. पाच दिवसापूर्वी दारव्हा तालुक्यातील डोल्हारीदेवी येथील तीन गौतम बंधूंनी शेतीच्या वादात जिल्हाधिकारी कक्षाच्या बाहेर विष प्राशन केले होते. त्यापैकी कुंदन रामचंद्र गौतम याचा मृत्यू झाला. या घटनेची शाई वाळत नाही तोच रविवारी सायंकाळी ४.३० वाजता दारव्हा तालुक्यातील बानायत येथील संतोष शालीकराम शिंदे (३५) या युवकाने जिल्हाधिकारी कक्षासमोर विष प्राशन केले. तर सोमवारी बाभूळगाव तालुक्यातील पंजाबराव थाळे विषाची बॉटल घेऊन जिल्हा कचेरीत पोहोचला. सातत्याने विष प्राशनाच्या घटना घडत असल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.