शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

विषाची बॉटल घेऊन शेतकरी जिल्हा कचेरीत

By admin | Updated: May 2, 2017 00:01 IST

शेताच्या धुऱ्याचा वाद तक्रार करूनही सुटत नसल्याने उद्विग्न झालेल्या बाभूळगाव तालुक्यातील वृद्ध शेतकऱ्याने विषाची बॉटल घेऊन थेट जिल्हा कचेरीत प्रवेश केला.

धुऱ्याचा वाद : बंदोबस्तावरील पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळलायवतमाळ : शेताच्या धुऱ्याचा वाद तक्रार करूनही सुटत नसल्याने उद्विग्न झालेल्या बाभूळगाव तालुक्यातील वृद्ध शेतकऱ्याने विषाची बॉटल घेऊन थेट जिल्हा कचेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र दिनाच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. गत पाच दिवसात चौघांनी जिल्हाधिकारी कक्षासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील एकाचा मृत्यू झाला. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे प्रशासनाची चांगलीच पाचावरधारण बसली आहे. पंजाबराव शामराव थाळे (८७) रा. सौजना ता. बाभूळगाव असे विषाची बॉटल घेऊन जिल्हा कचेरीत पोहोचलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची बाभूळगाव तालुक्यातील सीमेवरील कासारखेड शिवारात पाच एकर शेती आहे. लगतच्या शेतकऱ्याने त्यांच्या धुऱ्यावरील कडूनिंबाचे झाड तोडून अतिक्रमण केले. तसेच त्यांच्या शेताचा बांधही फोडला. या प्रकाराची तक्रार पंजाबरावने प्रशासनाकडे केली. परंतु कोणतीच कारवाई झाली नाही. दरम्यान महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा कचेरीत लोकशाही दिन असतो. याची त्यांना माहिती होती. त्यामुळे ते सोमवारी सकाळी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. मात्र महाराष्ट्र दिन असल्याने शासकीय सुटी होती. मात्र महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विविध आंदोलने होणार हे गृहित धरुन जिल्हा कचेरीसमोर सोमवारी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. पंजाबराव तेथे पोहोचताच बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी आपबिती सांगितली. पोलिसांना संशय बळावला. त्यामुळे त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या पिशवीत विषाची बॉटल आढळून आली. विषाची बॉटल दिसताच पोलीस सतर्क झाले. त्यांनी तत्काळ पंजाबराव घेऊन शहर ठाणे गाठले. तेथे त्यांची समजूत काढण्यात आली. विषाची बॉटल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या वृद्ध शेतकऱ्याच्या विरोधात मुंबई पोलीस कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय आत्महत्या न करण्याचे हमीपत्रही घेण्यात आले. लागोपाठ विष प्राशनाच्या घटना जिल्हा कचेरीत घडत असल्याने प्रशासनाची पाचावर धारण बसली आहे. सोमवारी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला. (कार्यालय प्रतिनिधी) पाच दिवसातील तिसरी घटना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी घडलेली तिसरी घटना होय. पाच दिवसापूर्वी दारव्हा तालुक्यातील डोल्हारीदेवी येथील तीन गौतम बंधूंनी शेतीच्या वादात जिल्हाधिकारी कक्षाच्या बाहेर विष प्राशन केले होते. त्यापैकी कुंदन रामचंद्र गौतम याचा मृत्यू झाला. या घटनेची शाई वाळत नाही तोच रविवारी सायंकाळी ४.३० वाजता दारव्हा तालुक्यातील बानायत येथील संतोष शालीकराम शिंदे (३५) या युवकाने जिल्हाधिकारी कक्षासमोर विष प्राशन केले. तर सोमवारी बाभूळगाव तालुक्यातील पंजाबराव थाळे विषाची बॉटल घेऊन जिल्हा कचेरीत पोहोचला. सातत्याने विष प्राशनाच्या घटना घडत असल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.