शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

शेतकरी कर्जमाफीचा भोपळा

By admin | Updated: June 30, 2017 02:00 IST

थकबाकीदार शेतकऱ्यांसोबतच कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.

दुष्काळ वगळला : ३०९ कोटी पुनर्गठित कर्जमाफीला शेतकरी मुकणार रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : थकबाकीदार शेतकऱ्यांसोबतच कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. प्रत्यक्षात अध्यादेशामध्ये पुनर्गठनाच्या कर्जमाफीत २०१२ पूर्वीचे पुनर्गठन वगळले. या निकषामुळे पुनर्गठन झालेले २००९ व २०१० आणि २०१० व २०११ मधील ३०९ कोटींचे कर्ज कर्जमाफीतून बाद होणार आहे. याचा फटका एक लाख शेतकऱ्यांना बसणार आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या अध्यादेशात निकषांमध्ये अनेक अडथळे निर्माण करून ठेवले. यामुळे कर्जप्रवाहातून दूर गेलेले शेतकरी पुन्हा मुख्य प्रवाहात येतील की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्हा २००० पासून सतत दुष्काळी स्थितीत आहे. त्याची शासन दप्तरी नोंद आहे. तरीही २०१२ ते २०१६ च्या दुष्काळी स्थितीचा उल्लेख अध्यादेशात नाही. या चार वर्षातील थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. याच काळातील थकीत पुनर्गठन माफ होणार आहे.या चार वर्षांच्या कालखंडपेक्षाही भीषण स्थिती २००९-२०१० आणि २०१०-२०११ च्या कालखंडात होती. त्याचाही अध्यादेशात उल्लेख नाही. यामुळे या कालखंडातील पुनर्गठीत कर्जाचे शेतकरी कर्जमाफीला मुकणार आहेत. या थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा सर्वात मोठा आहे. २००९-२०१० मध्ये ८५ हजार शेतकऱ्यांच्या २४६ कोटी ८९ लाख रूपयांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले होते. हा आजपर्यंतच्या पुनर्गठनातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा सर्वात मोठा आकडा आहे. कर्जमाफीच्या अध्यादेशात २००९-१० आणि २०१०-११ मधील दुष्काळाचा उल्लेख नाही. या काळात मोठ्या प्रमाणात पुनर्गठन झाले. हे पुनर्गठीत शेतकरी कर्जमाफीला मुकणार आहेत. जिल्हा बँक राज्य शासनाकडे याचे वास्तव मांडणार आहे.- अविनाश सिंगमसीईओ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ